शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

अकाली पावसामुळे झाडावरचा कापूस जमिनीवर

By admin | Updated: March 7, 2016 00:39 IST

सापडणाऱ्या शेतकऱ्यांवर यावेळी अकाली पावसाने आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची नामुष्की आणली आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा : मजुरी वाढल्याने ठेवला होता कापूसआशिष देरकर गडचांदूरसापडणाऱ्या शेतकऱ्यांवर यावेळी अकाली पावसाने आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची नामुष्की आणली आहे. अकाली पावसामुळे शेकडो हेक्टरमधील कापूस पीक जमिनीवर आल्याने शेतकऱ्यांचा जीव रडकुंडी आला आहे. या संकटाची झळ कापसासह अनेक पिकांना बसली आहे.कोरपना तालुक्यात आधीच दुष्काळसदृश परिस्थिती होती. मात्र शासनाने जाहीर केलेल्या आणेवारीत तालुका बसत नसल्याने सर्वच शेतकऱ्यांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. अशातच कापसाचा शेवटचा वेचा शिल्लक होता. त्यातून कसेबसे सावरले असते. मात्र निसर्गाला ते मान्य नव्हते. शेतकऱ्यांच्या शेवटच्या कापसावर अकाली पावसाने दरोडा टाकला. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाली आहे.अनेक शेतकऱ्यांचा शेवटचा वेचा शिल्लक होता. मजुरांच्या कमतरतेमुळे व मजुरी परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना कापूस वेचण्यात अडचणी येत होत्या. सध्या शेती हंगाम संपत आल्याने काही गरीब कास्तकारांनी मजुरी न देता हळूहळू घरच्याच लोकांच्या माध्यमातून कापूस वेचणी सुरु केली होती. जेनेकरुन बाहेरील मजुरांना मजुरी द्यावी लागणार नाही. पण अकाली पावसामुळे शेतकऱ्यांची ही शक्कल अपयशी ठरली. शेकडो हेक्टरमधील शेती पांढऱ्या सोन्याने फुललेली होती. मात्र अकाली पावसाने जमीन पांढरी झाली आहे.कोरपना तालुक्यातील कोरपनासह गडचांदूर, नांदा, बिबी,आवारपूर, वनसडी, उपरवाही, लखमापूर, बाखर्डी, निमणी, पालगाव, हिरापूर, सांगोडा, लोणी, पिपरी, गाडेगाव, विरुर राजुरगुडा, नैतामगुडा, पिंपळगाव,, धामणगाव, खिर्डी, वडगाव, इंजापूर, नोकारी, थुट्रा, कवठाळा, आसन, कढोली, अंतरगाव, बोरी, नवेगाव, पिपर्डा, परसोडा, कोडशी, कोडशी (बु.), नांदगाव, जैतापूर, धोपटाळा, रामपूर, कुकुडसात यांसह अनेक गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहेत.यावर्षी कापसाला चार हजार रुपयापर्यंत भाव देण्यात आला. मात्र मिळकतीपेक्षा खर्च जास्त अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. एकतर कापसाला भाव कमी आणि वेचणीची मजुरी महाग व अकाली पावसाची हजेरी अशा तिहेरी संकटात बळीराजा सापडला आहे. शासनाकडून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सरसकट मदतीची अपेक्षा शेतकरी करीत आहे.शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार द्या : सुभाष धोटेअकाली पावसामुळे फक्त कोरपना तालुक्यातीलच नाही तर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहेत. शासनाने तातडीने सर्वेक्षण करुन चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसानगस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रुपयांची मदत करावी व चंद्रपूर जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी केली आहे.