शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
4
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
5
सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
6
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
9
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
10
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
11
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
12
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
13
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
14
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
15
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
16
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
17
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
18
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
19
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
20
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?

अकाली पावसामुळे झाडावरचा कापूस जमिनीवर

By admin | Updated: March 7, 2016 00:39 IST

सापडणाऱ्या शेतकऱ्यांवर यावेळी अकाली पावसाने आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची नामुष्की आणली आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा : मजुरी वाढल्याने ठेवला होता कापूसआशिष देरकर गडचांदूरसापडणाऱ्या शेतकऱ्यांवर यावेळी अकाली पावसाने आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची नामुष्की आणली आहे. अकाली पावसामुळे शेकडो हेक्टरमधील कापूस पीक जमिनीवर आल्याने शेतकऱ्यांचा जीव रडकुंडी आला आहे. या संकटाची झळ कापसासह अनेक पिकांना बसली आहे.कोरपना तालुक्यात आधीच दुष्काळसदृश परिस्थिती होती. मात्र शासनाने जाहीर केलेल्या आणेवारीत तालुका बसत नसल्याने सर्वच शेतकऱ्यांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. अशातच कापसाचा शेवटचा वेचा शिल्लक होता. त्यातून कसेबसे सावरले असते. मात्र निसर्गाला ते मान्य नव्हते. शेतकऱ्यांच्या शेवटच्या कापसावर अकाली पावसाने दरोडा टाकला. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाली आहे.अनेक शेतकऱ्यांचा शेवटचा वेचा शिल्लक होता. मजुरांच्या कमतरतेमुळे व मजुरी परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना कापूस वेचण्यात अडचणी येत होत्या. सध्या शेती हंगाम संपत आल्याने काही गरीब कास्तकारांनी मजुरी न देता हळूहळू घरच्याच लोकांच्या माध्यमातून कापूस वेचणी सुरु केली होती. जेनेकरुन बाहेरील मजुरांना मजुरी द्यावी लागणार नाही. पण अकाली पावसामुळे शेतकऱ्यांची ही शक्कल अपयशी ठरली. शेकडो हेक्टरमधील शेती पांढऱ्या सोन्याने फुललेली होती. मात्र अकाली पावसाने जमीन पांढरी झाली आहे.कोरपना तालुक्यातील कोरपनासह गडचांदूर, नांदा, बिबी,आवारपूर, वनसडी, उपरवाही, लखमापूर, बाखर्डी, निमणी, पालगाव, हिरापूर, सांगोडा, लोणी, पिपरी, गाडेगाव, विरुर राजुरगुडा, नैतामगुडा, पिंपळगाव,, धामणगाव, खिर्डी, वडगाव, इंजापूर, नोकारी, थुट्रा, कवठाळा, आसन, कढोली, अंतरगाव, बोरी, नवेगाव, पिपर्डा, परसोडा, कोडशी, कोडशी (बु.), नांदगाव, जैतापूर, धोपटाळा, रामपूर, कुकुडसात यांसह अनेक गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहेत.यावर्षी कापसाला चार हजार रुपयापर्यंत भाव देण्यात आला. मात्र मिळकतीपेक्षा खर्च जास्त अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. एकतर कापसाला भाव कमी आणि वेचणीची मजुरी महाग व अकाली पावसाची हजेरी अशा तिहेरी संकटात बळीराजा सापडला आहे. शासनाकडून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सरसकट मदतीची अपेक्षा शेतकरी करीत आहे.शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार द्या : सुभाष धोटेअकाली पावसामुळे फक्त कोरपना तालुक्यातीलच नाही तर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहेत. शासनाने तातडीने सर्वेक्षण करुन चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसानगस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रुपयांची मदत करावी व चंद्रपूर जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी केली आहे.