लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राजुरा शहरातील आसिफाबाद रोडवरील शिवाजी महाविद्यालयाजवळील रेल्वेगेटमुळे नागरिक आणि विद्यार्थी त्रस्त झाले आहे. सद्यस्थितीत हजारो शालेय विद्यार्थ्यांना वेठीस धरणारा रेल्वे गेट ठरत आहे.दिवसातून १५ वेळा रेल्वे गेट बंद होत असल्यामुळे नागरिकासोबत विद्यार्थीसुद्धा त्रस्त होत आहे. या रेल्वेगेटच्या बाजूला शिवाजी महाविद्यालय, शिवाजी विद्यालय, राजुरा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आदर्श मराठी प्राथमिक शाळा, न्यू एरा इंग्लीश कॉन्व्हेंट स्कूल, शासकीय तंत्र माध्यमिक विद्यालय, एस.टी. बस डेपो, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय असून या सर्वांना या रेल्वे गेटचा त्रास सहन करावा लागत आहे. सिमेंट उद्योगासाठी हा मालवाहू रेल्वे मार्ग सुरु करण्यात आला. मात्र या कंपन्याकडून उड्डाणपुलाची मागणी करायला पाहिजे होती. या सिमेंट कंपन्यासाठी राजुऱ्यातील नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे.चंद्रपूरचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांनी या संदर्भात सिमेंट कंपन्यांशी चर्चा करावी. या कंपन्यांना उड्डाणपूल तयार करण्याबाबत मागणी करण्यास बाध्य करावे. खासदारांनी याकडे लक्ष दिल्यास समस्या सुटू शकतेराजुरा शहरातील हा रेल्वेगेट विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या कालावधीत अधिक अडचणीचा ठरतो. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये रोष आहे.सिमेंट कंपन्यांनी आपल्या फायद्यासाठी तयार केलेल्या या रेल्वेगेटचा सामान्य नागरिकांना काहीच फायदा नाही.
रेल्वे गेटमुळे विद्यार्थी वेठीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 06:00 IST
दिवसातून १५ वेळा रेल्वे गेट बंद होत असल्यामुळे नागरिकासोबत विद्यार्थीसुद्धा त्रस्त होत आहे. या रेल्वेगेटच्या बाजूला शिवाजी महाविद्यालय, शिवाजी विद्यालय, राजुरा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आदर्श मराठी प्राथमिक शाळा, न्यू एरा इंग्लीश कॉन्व्हेंट स्कूल, शासकीय तंत्र माध्यमिक विद्यालय, एस.टी. बस डेपो, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय असून या सर्वांना या रेल्वे गेटचा त्रास सहन करावा लागत आहे.
रेल्वे गेटमुळे विद्यार्थी वेठीस
ठळक मुद्देदिवसातून अनेकदा गेट बंद : खासदारांनी लक्ष देण्याची मागणी