शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

जिल्ह्याचा मंत्री नसल्याचा फटका ! राज्याच्या अर्थसंकल्पात चंद्रपूरच्या वाट्याला भोपळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 15:28 IST

Chandrapur : पाच आमदार असतानाही साधा उल्लेख नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील विविध भागांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या. चंद्रपूर जिल्ह्याला मात्र या अर्थसंकल्पातून पूर्णतः डावलण्यात आल्याची भावना जिल्ह्यात उमटत आहे. सत्ताधारी पक्षाचे पाच आमदार असतानाही जिल्ह्याच्या वाट्याला ठोस काहीच न आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संपूर्ण अर्थसंकल्पात वरोरा येथील आनंदवनाच्या निधीत वाढ झाल्याचा उल्लेख वगळता, चंद्रपूरचा कुठेही उल्लेख नाही.

चंद्रपूर हा उद्योगांचा जिल्हा आहे. प्रदूषणाची समस्या गंभीर आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जागतिक दर्जाच्या प्रतीक्षेत आहे. स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आहे. कापूस, धान आणि सोयाबीन शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न रखडलेले आहेत. सिंचनाचा प्रश्न कायम आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षांचे पाच आमदार असताना अर्थसंकल्पात चंद्रपूर जिल्ह्याला सन्मानजक न्याय व भरीव असे काही मिळेल, अशी आशा जनतेची होती. मात्र जनतेचा अपेक्षाभंग झाला. येथील बांबू प्रशिक्षण केंद्राचा लाभ वाढवण्यासाठी कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. वरोरा येथील आनंदवनच्या निधीत भरीव वाढ करण्यात येईल, ही घोषणा मुख्यमंत्री अलीकडेच आनंदवनात आले असता केली होती. याचा उल्लेख अर्थसंकल्पात झाला. याऊपर जिल्ह्याला संधीपासून वंचित ठेवल्याची टीका सर्वच स्तरांवरून होत आहे.

भाजपचे पाच आमदार तरीही.२०२४ पर्यंत जिल्ह्याला मंत्रिपद होते. यानंतर नव्या सरकारमध्ये जिल्ह्याला मंत्रिपद नसले तरी पाच आमदार असल्यामुळे जिल्ह्याच्या वाट्याला काही खास येईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. पण ती फोल ठरली.

स्थानिक मंत्री नसल्याने डावलले?राज्यात आजवर जेव्हाही भाजप सत्तेत सहभागी झाला, तेव्हा प्रत्येक वेळेला चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले. पहिल्यांदा युती सरकार आले तेव्हा सुरुवातीला शोभाताई फडणवीस यांची आणि त्यात वाढ करीत सुधीर मुनगंटीवार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. २०१४ मध्ये राज्यात सरकार आले तेव्हा सुधीर मुनगंटीवार यांना अर्थमंत्रिपद देत जिल्ह्याचा सन्मान केला होता.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरBudgetअर्थसंकल्प 2024