शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चोरांच्या भीतीने ग्रामस्थांचा खडा पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 00:42 IST

जंगलव्याप्त गावांमध्ये रात्री ८ ते ९ सुमारास टार्च उजेडाचे संकेत. यामुळे गावात चोर येण्याची भिती. गावकऱ्यांची टार्चच्या उजेडाच्या दिशेने चोरांना पकडण्यासाठी एकच धावपळ. चोर पसार होण्यात यशस्वी होतात, याची गावकऱ्यांत प्रचंड दहशत.

ठळक मुद्देचिचपल्ली परिसर दहशतीत : अनोळखी लोकांवर हल्ल्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जंगलव्याप्त गावांमध्ये रात्री ८ ते ९ सुमारास टार्च उजेडाचे संकेत. यामुळे गावात चोर येण्याची भिती. गावकऱ्यांची टार्चच्या उजेडाच्या दिशेने चोरांना पकडण्यासाठी एकच धावपळ. चोर पसार होण्यात यशस्वी होतात, याची गावकऱ्यांत प्रचंड दहशत. यातून एखाद्या अनोळखी इसमावर प्राणघातक हल्ला होण्याची शक्यता निर्माण झाली. गावाच्या दिशेने व अंगणात चोर येतात. या भितीमय वातावरणात मागील चार दिवसांपासून चिचपल्ली परिसरातील गावागावात गावकऱ्यांचा रात्रभर खडा पहारा असल्याचे वास्तव ‘लोकमत’ प्रतिनिधीच्या शुक्रवारी दिलेल्या प्रत्यक्ष भेटीतून समोर आले.गावात चोरी करण्यासाठी व लहान मुलांचे अपहरण करून किडनी चोर रॅकेट सक्रीय झाल्याची अफवा गावागावात पसरली आहे. या प्रकाराने गावकरी चांगलेच धास्तावले आहेत. गावात चोर येतात असे खात्रीने गावकरी व्यथा मांडतात. पकडण्यासाठी चोरांच्या मागे गावकरी धावतात, त्यावेळी अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेनी धूम ठोकतात. मात्र मागील चार दिवसांपासून एकही चोर गावकऱ्यांच्या तावडीत सापडला नाही. हे मात्र तेवढेच सत्य आहे. शुक्रवारी चिचपल्ली परिसरातील पेठ, झरी, हळदी, वलनी, चेक निंबाळा, पाहमी आदी गावातील भेटी दरम्यान ‘लोकमत’जवळ गावकऱ्यांनी व्यथा मांडली.प्रचंड दहशतीत असलेल्या गावकऱ्यांनी याची माहिती पोलीस प्रशासनाला दिली. दोन दिवसापूर्वी पोलिसांनी सदर गावात रात्रीच्या सुमारास गस्तही चालविली. मात्र अद्याप एकही चोर गवसला नाही. दरम्यान पाहमी गावात असताना रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक गोतमारे, पोलीस हवालदार शंकर आत्राम, राजेश मडावी, किशोर शहारे, प्रमोद कोटनाके, प्रभू शंकर गावंडे, आज दुपारी ३ वाजता पाहमी गावात चौकशीसाठी आले. त्यांनी गावकऱ्यांशी घटनेसंदर्भात विचारपूस केली. अफवावर विश्वास ठेवू नका म्हणून गावकऱ्यांशी संवादही साधला.गावकऱ्यांनी भिती बाळगू नये - पोलीस प्रशासनचंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली परिसरातील गावकऱ्यांत भितीचे वातावरण अफवेमुळे पसरले आहे. त्यामुळे गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक ठिकाणी पोलीस ताफ्यासह संपर्क केला जात आहे. त्यांचेशी संवाद साधला जात आहे. रात्रीच्या सुमारास सशस्त्र दल गस्तीवर ठेवण्यात आले आहे. गावकरी अनोळखी इसमाकडे आधार कार्ड सारखे ओळखपत्र मागत असल्याचे दिसून येते. यामुळे गावकरी दडपणात वावर असून कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी व गावकºयातील भितीचे सावट दूर करण्याच्या प्रयत्न केला जात रामनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक गोतमारे यांनी लोकमतला सांगितले.गावकऱ्यांच्या भीतीदायक प्रतिक्रियाचंद्रपूर-मूल राज्य महामार्गावरुन १२ किलोमीटर अंतरावर उत्तरेस असलेल्या झरी येथील फुलाबाई पेंदोर म्हणाल्या, रात्रीच्या वेळी गावात पहिल्यांदा चोर टॉर्च उजेड टाकतात. त्या दिशेने गावकरी धावले. मात्र जंगलात ५ ते ६ च्या संख्येतील चोर पळून गेले. तीन दिवसांपासून गावातील ३५ घरातील लोकांना चोराच्या भितीने रात्र जागावी लागते.झरीपासून जवळ असलेल्या पेठ येथे २० घरांची वस्ती आहे. झरी प्रवेशद्वारालगत हे गाव आहे. येथील बाल गोविंद शेडमाके म्हणाले, माझ्या अंगणात दोन दिवसांपूर्वी तीन ते चारच्या संख्येत असलेल्यांनी दारावर रात्रीच्या सुमारास लाईट मारला. आरडाओरड करून पाठलाग केला असता, ते जंगलात पळून गेले. तेव्हापासून सर्वच गावकरी रस्त्यालवरच जागून रात्र काढत आहेत.वलनी येथील भाऊजी कोटनाके म्हणाले, आमच्या गावात चोरांची भिती. रात्र रात्र जागावे लागत आहेत. तुम्ही कोण आहात ते सांगा असा संतापही व्यक्त केला.दुर्गम भाग व जंगल व्याप्त पाहमी गावातील श्रीराम आत्राम म्हणाले, आमच्या गावात २८ घरे असून रात्री लहान मुलांना पळवून किडणी काढतात, अशी चर्चा जोमात आहे. रात्री ९ वाजता दरम्यान जंगलातून टॉर्चद्वारे उजेड मारला जातो. त्यावेळी गावकरी एकबटून दिशेनी धावतात. तीन दिवसांपासून रात्रभर पहारा दिला जात आहे.

टॅग्स :Thiefचोर