शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

प्रवासांअभावी महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या रात्रकालीन बसफेऱ्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:37 IST

राज्य शासनाने निर्बंध उठविल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाने ५० टक्के तत्त्वावर बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, वरोरा, चिमूर, ...

राज्य शासनाने निर्बंध उठविल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाने ५० टक्के तत्त्वावर बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, वरोरा, चिमूर, राजुरा चार आगार आहेत. कोरोनामुळे सर्व बसफेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या; मात्र राज्य शासनाने निर्बंध हटविल्यानंतर काही प्रमाणात बसफेऱ्या धावत आहेत. जिल्ह्यातील चारही आगारातून पूर्वी २१० बसफेऱ्या धावायच्या. सद्यस्थितीत १०० बसफेऱ्या धावत आहेत. पूर्वी लांब पल्ल्यासाठी म्हणजे पुणे, औरंगाबाद, हैदराबाद अशा रातकालीन रातराणी बस धावायच्या. मात्र या बसला पाहिजे त्या प्रमाणात प्रवासी मिळत नसल्याने महामंडळाने या बसफेऱ्या बंद केल्या; परंतु याच मार्गावर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात खासगी ट्रॅव्हल्स धावतात. त्यातही त्यांना मोठ्या प्रमाणात प्रवासी मिळत असून, भरगच्च धावत आहेत. याउलट महामंडळाच्या बसमध्ये प्रवासीच मिळत नसल्याची ओरड आहे.

बॉक्स

पुणे मार्गावर गर्दी

चंद्रपूर येथून पुणे, औरंगाबाद, हैदराबाद येथे मोठ्या प्रमाणात खासगी ट्रॅव्हल्स धावतात. लॉकडाऊनमुळे या फेऱ्या बंद होत्या; मात्र आता पूर्वीप्रमाणेच धावत आहेत. सद्यस्थितीत पुणे मार्गावर गर्दी दिसून येत आहे; परंतु पूर्वीप्रमाणे अद्यापही प्रवासी मिळत नसल्याचे खासगी ट्रॅव्हल्स संचालकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

बॉक्स

ट्रॅव्हल्सचे तिकीट जास्त, तरीही गर्दी

महामंडळाने लांब पल्ल्याच्या अंतरासाठी रातराणी बसफेऱ्या सुरू केल्या होत्या. या बस पुणे, औरंगाबाद, हैदराबाद, नांदेड येथे धावत होत्या. या बसफेऱ्यांचे तिकीट खासगी ट्रॅव्हल्सपेक्षा कमी होते; परंतु या बसफेऱ्या काही दिवस सुरळीत चालल्या. त्यानंतर प्रवासी मिळत नसल्याने या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या.

खासगी ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशांची झोपण्याची व्यवस्था असते. यासोबतच टीव्ही तसेच मोफत नेट उपलब्ध केला असतो. या सुविधा बसमध्ये नसतात, त्यामुळे प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सचा वापर करतात.

कोट

महामंडळाच्या रात्रकालीन लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या पूर्वी धावत होत्या; मात्र त्यांना पाहिजे त्या प्रमाणात प्रवासी मिळत नव्हते. त्यामुळे त्या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. आता जिल्ह्यातील चारही आगारातून १०० बसफेऱ्या धावत आहेत; मात्र रात्रकालीन बसफेऱ्या बंद असल्याची माहिती आगाराकडून मिळाली.