शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
7
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
8
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
9
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
10
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
11
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
12
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
13
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
14
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
15
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
16
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
17
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
18
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
19
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
20
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन

प्रवासांअभावी महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या रात्रकालीन बसफेऱ्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:37 IST

राज्य शासनाने निर्बंध उठविल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाने ५० टक्के तत्त्वावर बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, वरोरा, चिमूर, ...

राज्य शासनाने निर्बंध उठविल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाने ५० टक्के तत्त्वावर बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, वरोरा, चिमूर, राजुरा चार आगार आहेत. कोरोनामुळे सर्व बसफेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या; मात्र राज्य शासनाने निर्बंध हटविल्यानंतर काही प्रमाणात बसफेऱ्या धावत आहेत. जिल्ह्यातील चारही आगारातून पूर्वी २१० बसफेऱ्या धावायच्या. सद्यस्थितीत १०० बसफेऱ्या धावत आहेत. पूर्वी लांब पल्ल्यासाठी म्हणजे पुणे, औरंगाबाद, हैदराबाद अशा रातकालीन रातराणी बस धावायच्या. मात्र या बसला पाहिजे त्या प्रमाणात प्रवासी मिळत नसल्याने महामंडळाने या बसफेऱ्या बंद केल्या; परंतु याच मार्गावर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात खासगी ट्रॅव्हल्स धावतात. त्यातही त्यांना मोठ्या प्रमाणात प्रवासी मिळत असून, भरगच्च धावत आहेत. याउलट महामंडळाच्या बसमध्ये प्रवासीच मिळत नसल्याची ओरड आहे.

बॉक्स

पुणे मार्गावर गर्दी

चंद्रपूर येथून पुणे, औरंगाबाद, हैदराबाद येथे मोठ्या प्रमाणात खासगी ट्रॅव्हल्स धावतात. लॉकडाऊनमुळे या फेऱ्या बंद होत्या; मात्र आता पूर्वीप्रमाणेच धावत आहेत. सद्यस्थितीत पुणे मार्गावर गर्दी दिसून येत आहे; परंतु पूर्वीप्रमाणे अद्यापही प्रवासी मिळत नसल्याचे खासगी ट्रॅव्हल्स संचालकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

बॉक्स

ट्रॅव्हल्सचे तिकीट जास्त, तरीही गर्दी

महामंडळाने लांब पल्ल्याच्या अंतरासाठी रातराणी बसफेऱ्या सुरू केल्या होत्या. या बस पुणे, औरंगाबाद, हैदराबाद, नांदेड येथे धावत होत्या. या बसफेऱ्यांचे तिकीट खासगी ट्रॅव्हल्सपेक्षा कमी होते; परंतु या बसफेऱ्या काही दिवस सुरळीत चालल्या. त्यानंतर प्रवासी मिळत नसल्याने या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या.

खासगी ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशांची झोपण्याची व्यवस्था असते. यासोबतच टीव्ही तसेच मोफत नेट उपलब्ध केला असतो. या सुविधा बसमध्ये नसतात, त्यामुळे प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सचा वापर करतात.

कोट

महामंडळाच्या रात्रकालीन लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या पूर्वी धावत होत्या; मात्र त्यांना पाहिजे त्या प्रमाणात प्रवासी मिळत नव्हते. त्यामुळे त्या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. आता जिल्ह्यातील चारही आगारातून १०० बसफेऱ्या धावत आहेत; मात्र रात्रकालीन बसफेऱ्या बंद असल्याची माहिती आगाराकडून मिळाली.