शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह ये दिग्गज होते उपस्थित
2
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
3
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
4
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
5
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
6
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
7
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
8
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
9
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
10
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
11
अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री
12
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
13
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
14
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
15
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
16
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
17
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
18
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
19
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
20
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर

धर्मांध राजकारणामुळे देशाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:14 AM

धर्मांध राजकारणामुळे सर्वसामान्य जनतेसोबतच देशाचे प्रचंड नुकसान होते.

ठळक मुद्देराम पुनियानी : प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात व्याख्यान

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : धर्मांध राजकारणामुळे सर्वसामान्य जनतेसोबतच देशाचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे नव्या पिढीला धर्म आणि राजकारणातील मूलभूत भेद समजावून संविधानाच्या मूल्यांची जाणिव करून देणे आज काळाची गरज आहे, असे मत प्रसिद्ध विचारवंत व लेखक डॉ. राम पुनियानी यांनी व्यक्त केले.मुस्लीम एज्युकेशन, सोशन अ‍ॅन्ड कल्चरल आॅर्गनायजेशनतर्फे शनिवारी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात पार पडलेल्या ‘मजहब सियासत और आज के हालात’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.डॉ. पुनियानी यांनी इतिहासातील अनेक उदाहरणे देवून म्हणाले, कोणत्याही युगामध्ये धर्म आणि राजकारणाचा संबंध आला नाही. एक राजा दुसऱ्या राजाच्या साम्राज्यावर लढाई करण्यास जात होता. त्यावेळेला त्याचा उद्देश फक्त आपले साम्राज्य वाढविणे एवढाच होता. ही लढाई धर्माच्या नावावर नव्हती. अनेक मुसलमान राजांनी मुसलमान साम्राज्यावर आणि अनेक हिंदू राज्यांनी हिंदू साम्राज्यावर चढाई केल्याची उदाहरणे इतिहासाता आढळतात. अकबर बादशहाचे सेनापती हिंदू होते, तर शिवाजी महाराजांच्या दरबारात अनेक मुस्लीम व्यक्ती महत्त्वाच्या पदावर होते.परंतु, आजची परिस्थिती बदलली असून धर्म आणि राजकारणाला एकत्र जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या आधारे देशातील सर्वधर्मसमभावाचे वातावरण बिघडविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आला. त्यामुळे या घटनांना आळा घातला पाहिजे. युवापिढीला सत्य इतिहास सांगून जागृत करण्यासाठी विवेकी व विज्ञाननिष्ठ संघटनांनी पुढे येण्याची गरज आहे, असेही पुनियानी यांनी व्याख्यानात नमूद केले.दीड तासाच्या भाषणामध्ये पुनियानी भारतातील अनेक ऐतिहासिक उदाहरण देऊन राजकारण व धर्मकारणातील चुका पुढे मांडल्या. चर्चासत्राप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे शहर अध्यक्ष नंदू नागरकर, विनोद दत्तात्रय, बळीराज धोटे, अ‍ॅड. खान, प्राचार्य डॉ. जावेद खान, रोटरी क्लबच सदस्य, शैक्षणिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने झाली. प्रास्ताविक मेस्कोचे अध्यक्ष हाजी शफीक अहमद केले.डॉ. पुनियानी यांचा परिचय अ‍ॅड. फरहत बेग यांनी करून दिला.काचवाला यांनी संचालन केले. हाजी वहीद खान यांनी आभार मानले. यावेळी डॉ. एजाज शेख, हमीद लालानी, नाहीद हुसेन, जहीरभाई काजी, शब्बीर पठाण, रहेमान पटेल, रफीक मारफाणी, हाजी अब्दुल बारी आदी उपस्थित होते.