शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

धर्मांध राजकारणामुळे देशाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:15 IST

धर्मांध राजकारणामुळे सर्वसामान्य जनतेसोबतच देशाचे प्रचंड नुकसान होते.

ठळक मुद्देराम पुनियानी : प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात व्याख्यान

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : धर्मांध राजकारणामुळे सर्वसामान्य जनतेसोबतच देशाचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे नव्या पिढीला धर्म आणि राजकारणातील मूलभूत भेद समजावून संविधानाच्या मूल्यांची जाणिव करून देणे आज काळाची गरज आहे, असे मत प्रसिद्ध विचारवंत व लेखक डॉ. राम पुनियानी यांनी व्यक्त केले.मुस्लीम एज्युकेशन, सोशन अ‍ॅन्ड कल्चरल आॅर्गनायजेशनतर्फे शनिवारी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात पार पडलेल्या ‘मजहब सियासत और आज के हालात’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.डॉ. पुनियानी यांनी इतिहासातील अनेक उदाहरणे देवून म्हणाले, कोणत्याही युगामध्ये धर्म आणि राजकारणाचा संबंध आला नाही. एक राजा दुसऱ्या राजाच्या साम्राज्यावर लढाई करण्यास जात होता. त्यावेळेला त्याचा उद्देश फक्त आपले साम्राज्य वाढविणे एवढाच होता. ही लढाई धर्माच्या नावावर नव्हती. अनेक मुसलमान राजांनी मुसलमान साम्राज्यावर आणि अनेक हिंदू राज्यांनी हिंदू साम्राज्यावर चढाई केल्याची उदाहरणे इतिहासाता आढळतात. अकबर बादशहाचे सेनापती हिंदू होते, तर शिवाजी महाराजांच्या दरबारात अनेक मुस्लीम व्यक्ती महत्त्वाच्या पदावर होते.परंतु, आजची परिस्थिती बदलली असून धर्म आणि राजकारणाला एकत्र जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या आधारे देशातील सर्वधर्मसमभावाचे वातावरण बिघडविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आला. त्यामुळे या घटनांना आळा घातला पाहिजे. युवापिढीला सत्य इतिहास सांगून जागृत करण्यासाठी विवेकी व विज्ञाननिष्ठ संघटनांनी पुढे येण्याची गरज आहे, असेही पुनियानी यांनी व्याख्यानात नमूद केले.दीड तासाच्या भाषणामध्ये पुनियानी भारतातील अनेक ऐतिहासिक उदाहरण देऊन राजकारण व धर्मकारणातील चुका पुढे मांडल्या. चर्चासत्राप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे शहर अध्यक्ष नंदू नागरकर, विनोद दत्तात्रय, बळीराज धोटे, अ‍ॅड. खान, प्राचार्य डॉ. जावेद खान, रोटरी क्लबच सदस्य, शैक्षणिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने झाली. प्रास्ताविक मेस्कोचे अध्यक्ष हाजी शफीक अहमद केले.डॉ. पुनियानी यांचा परिचय अ‍ॅड. फरहत बेग यांनी करून दिला.काचवाला यांनी संचालन केले. हाजी वहीद खान यांनी आभार मानले. यावेळी डॉ. एजाज शेख, हमीद लालानी, नाहीद हुसेन, जहीरभाई काजी, शब्बीर पठाण, रहेमान पटेल, रफीक मारफाणी, हाजी अब्दुल बारी आदी उपस्थित होते.