शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

धर्मांध राजकारणामुळे देशाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:15 IST

धर्मांध राजकारणामुळे सर्वसामान्य जनतेसोबतच देशाचे प्रचंड नुकसान होते.

ठळक मुद्देराम पुनियानी : प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात व्याख्यान

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : धर्मांध राजकारणामुळे सर्वसामान्य जनतेसोबतच देशाचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे नव्या पिढीला धर्म आणि राजकारणातील मूलभूत भेद समजावून संविधानाच्या मूल्यांची जाणिव करून देणे आज काळाची गरज आहे, असे मत प्रसिद्ध विचारवंत व लेखक डॉ. राम पुनियानी यांनी व्यक्त केले.मुस्लीम एज्युकेशन, सोशन अ‍ॅन्ड कल्चरल आॅर्गनायजेशनतर्फे शनिवारी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात पार पडलेल्या ‘मजहब सियासत और आज के हालात’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.डॉ. पुनियानी यांनी इतिहासातील अनेक उदाहरणे देवून म्हणाले, कोणत्याही युगामध्ये धर्म आणि राजकारणाचा संबंध आला नाही. एक राजा दुसऱ्या राजाच्या साम्राज्यावर लढाई करण्यास जात होता. त्यावेळेला त्याचा उद्देश फक्त आपले साम्राज्य वाढविणे एवढाच होता. ही लढाई धर्माच्या नावावर नव्हती. अनेक मुसलमान राजांनी मुसलमान साम्राज्यावर आणि अनेक हिंदू राज्यांनी हिंदू साम्राज्यावर चढाई केल्याची उदाहरणे इतिहासाता आढळतात. अकबर बादशहाचे सेनापती हिंदू होते, तर शिवाजी महाराजांच्या दरबारात अनेक मुस्लीम व्यक्ती महत्त्वाच्या पदावर होते.परंतु, आजची परिस्थिती बदलली असून धर्म आणि राजकारणाला एकत्र जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या आधारे देशातील सर्वधर्मसमभावाचे वातावरण बिघडविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आला. त्यामुळे या घटनांना आळा घातला पाहिजे. युवापिढीला सत्य इतिहास सांगून जागृत करण्यासाठी विवेकी व विज्ञाननिष्ठ संघटनांनी पुढे येण्याची गरज आहे, असेही पुनियानी यांनी व्याख्यानात नमूद केले.दीड तासाच्या भाषणामध्ये पुनियानी भारतातील अनेक ऐतिहासिक उदाहरण देऊन राजकारण व धर्मकारणातील चुका पुढे मांडल्या. चर्चासत्राप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे शहर अध्यक्ष नंदू नागरकर, विनोद दत्तात्रय, बळीराज धोटे, अ‍ॅड. खान, प्राचार्य डॉ. जावेद खान, रोटरी क्लबच सदस्य, शैक्षणिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने झाली. प्रास्ताविक मेस्कोचे अध्यक्ष हाजी शफीक अहमद केले.डॉ. पुनियानी यांचा परिचय अ‍ॅड. फरहत बेग यांनी करून दिला.काचवाला यांनी संचालन केले. हाजी वहीद खान यांनी आभार मानले. यावेळी डॉ. एजाज शेख, हमीद लालानी, नाहीद हुसेन, जहीरभाई काजी, शब्बीर पठाण, रहेमान पटेल, रफीक मारफाणी, हाजी अब्दुल बारी आदी उपस्थित होते.