शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हय़ावर दुष्काळाचे सावट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:16 IST

बुलडाणा : जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील उभे पीक सुकायला लागले आहे, तर काही ठिकाणी पिकांनी माना टाकल्या असून, यावर्षी उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये कमी-जास्त प्रमाणात दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, याबाबत शासनाने सर्व्हे करून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांमधून वाढत आहे. 

ठळक मुद्देदुष्काळ जाहीर करण्याची मागणी पावसाअभावी पिके करपली

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील उभे पीक सुकायला लागले आहे, तर काही ठिकाणी पिकांनी माना टाकल्या असून, यावर्षी उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये कमी-जास्त प्रमाणात दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, याबाबत शासनाने सर्व्हे करून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांमधून वाढत आहे. जिल्ह्यात पेरणीच्या सुरुवातीलाच चांगल्या पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यात ७ लाख ४८ हजार ८00 हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी करण्यात आली. सुरुवातीला झालेल्या पावसावर आतापर्यंत पिके तग धरून होती; मात्र सध्या पावसाने पाठ फिरवल्याने घाटावरील पिकांची परिस्थिती चिंताजनक आहे. पावसाअभावी घाटावरील बुलडाणा, चिखली, मोताळा, लोणार, सिंदखेडराजा, मेहकर, देऊळगावराजा या तालुक्यांमधील लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात सापडली आहेत, तर घाटाखालील खामगाव, शेगाव, नांदुरा, संग्रामपूर, मलकापूर व जळगाव जामोद तालुक्यात पावसाची ही उघडीप दुष्काळाचे सावट निर्माण करीत आहे.   पाऊस लांबल्याने पिकांवर परिणाम झाला असून, सोयाबीनने माना टाकल्या आहेत. कपाशी पिकांचीही वाढ खुंटल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी शेतकरी पिकांना वाचविण्यासाठी टँकरने पाणी पुरवत असल्याचे चित्रही पाहावयास मिळत आहे.  पाऊस येत नसल्याने  शेतकर्‍यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. त्यामुळे पिकांची परिस्थिती पाहता, जिल्ह्यात पिकांचा सर्व्हे करून दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व शेतकर्‍यांकडून जोर धरत आहे.जिल्ह्यात आतापर्यंत  सरासरी ३५३.३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी आतापर्यंंत ५५३.७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली होती. यावरून मागील वर्षीपेक्षा यावर्षी पावसाचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात कमी असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी जिल्ह्यातील अनेक प्रकल्पात अल्प जलसाठा दिसून येत असून, येणार्‍या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी मोठय़ा प्रमाणात भटकंती करावी लागणार आहे. 

मोताळा तालुक्यात पिके सुकली!  तालुक्यात पावसाअभावी पिके सुकत चालली आहेत.  तालुक्यात पावसाने दगा दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. तालुक्यातील पिकांना पावसाची नितांत गरज आहे. पाऊस नसल्यामुळे पिके मोठय़ा प्रमाणावर सुकत आहेत. यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता; मात्र या हवामान खात्याचा अंदाजही चुकीचा ठरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तालुक्यातील जयपूर, वरुड, खरबडी, जनुना, कोथळी शिवारातील पावसाअभावी जळालेल्या पिकांची आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी पाहणी केली. पाहणी केल्यानंतर संबंधित यंत्रणेला संपूर्ण तालुक्यातील शेतीचे तातडीने सर्वेक्षण करण्याची व शेतकर्‍यांना तत्काळ मदतीसाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी संबंधित गावातील शेतकर्‍यांना दिले. पिकांची पाहणी करताना आ.हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत मोताळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल खाकरे, नाना देशमुख, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष इरफान पठाण, विक्रम देशमुख, नीलेश जाधव, बाळू नावकर व शेतकरी उपस्थित होते.           

मेहकर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी मेहकर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा, अशी मागणी मेहकर शिवसेनेच्यावतीने १४ ऑगस्ट रोजी करण्यात आली आहे. मेहकर तालुक्यावर गेल्या २ ते ३ वर्षांपासून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत आहे, तर यावर्षीसुद्धा पावसाची परिस्थिती गंभीर आहे.  जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही बिकट झालेला आहे, तसेच अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकरी मेहकर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा, वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांचा पीक विमा काढण्यात यावा, अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन करेल, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर, कृउबास सभापती माधवराव जाधव, तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, युवासेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव, पं.स. सभापती जया खंडारे, समाधान साबळे, दत्ता पाटील शेळके, खविसं अध्यक्ष मधुकरराव रहाटे, पं.स. उपसभापती राजू घनवट, विनोद बापू देशमुख, जि.प. गटनेते आशिष रहाटे, जि.प. सदस्य राजेंद्र पळसकर, मनीषा चनखोरे, तेजराव जाधव, रविकुमार चुकेवार आदी उपस्थित होते. 

शेळगाव आटोळ परिसरातील पिके करपली! गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेळगाव आटोळ व परिसरातील सोयाबीन, मूग, उडीद ही पिके करपली असून, येत्या चार-पाच दिवसांत पाऊस न आल्यास उत्पादनात प्रचंड घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग संकटात सापडला आहे. या संकटातून सोडवणूक करण्यासाठी शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी चिखली तहसीलदारांकडे केली आहे. यावर्षी परिसरात खरिपाच्या पेरणीनंतर दमदार पाऊस झालाच नाही. त्यामुळे ७0 टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. शासन स्तरावरून मदत देण्यात यावी, अशी मागणी बाजार समिती सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गजानन वायाळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णू कुळसुंदर, बाजार समिती माजी उपाध्यक्ष ओमप्रकाश भुतेकर, डॉ. विकास मिसाळ आदींनी केली आहे.