शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

धरणाचे पाणी कंपन्यांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:15 IST

यावर्षी अपुरा पाऊस पडला. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कर्ज काढून शेती केलेल्या शेतकºयांना यावर्षी अडचणींचा सामना करावा लागणार असून उत्पादनापेक्षा खर्चात मोठी वाढ झाली आहे.

ठळक मुद्देपाण्याअभावी पिके लागली सुकायला : अमलनाला धरणाचे पाणी सोडण्याची मागणी

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : यावर्षी अपुरा पाऊस पडला. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कर्ज काढून शेती केलेल्या शेतकºयांना यावर्षी अडचणींचा सामना करावा लागणार असून उत्पादनापेक्षा खर्चात मोठी वाढ झाली आहे. यावर मात करायची असेल तर शेतपिकांना सिंचनाची सोय करणे आवश्यक आहे. राजुरा, कोरपना तालुक्यात सिंचनाच्या सोईसाठी मोठी धरणे आहेत. परंतु पिके सुकायला लागली तरी धरणाचे पाणी अजूनही शेतीला सोडण्यात आले नाही. धरणाचे पाणी खासगी कंपन्यांना दिले जात असून या धरणांचा शेतीला काय फायदा, असा प्रश्न आता शेतकरी विचारु लागले आहे.निसर्गाच्या पाण्यावर शेती करण्याचे दिवस आता जवळजवळ संपले आहेत. पावसाअभावी शेती बेभरवशाची झाली आहे. पाण्याशिवाय शेती करणे ही संकल्पनाच तशी अवघड आहे.शेतकºयांना रब्बी हंगाम करण्यासाठी पावसाची आवश्यकता आहे. यावर्षी पाऊस कमी पडला त्याचा मोठा फटका शेतीला बसला आहे.मंगी, उपरवाही, चंदनवाही, पाचगाव, पांढरपौणी, भूरकुंडा (बु.) इत्यादी गावे अमलनाला प्रकल्पात येतात. अमलनाला धरणाच्या पाण्यावर या परिसरातील शेतकरी शेती करतात. मात्र यावर्षी धरणाचे पाणी अद्यापही सोडण्यात आले नाही. त्यामुळे शेतीचा रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. कॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. काटेरी झुडपेही वाढली असून कॅनलची दुरुस्ती केली नसल्याने शेताच्या बांधापर्यंत पाणी पोहोचणे कठीण झाले आहे.कॅनलची दुरुस्ती करुन अमलनाला प्रकल्पाचे पाणी शेतीला सोडावे, अशी मागणी पाचगाव येथील शेतकरी तिरुपती इंदूरवार, दशरथ भोयर, सुधाकर गेडेकर, नानाजी विरदंडे, गजानन भेंडे, किसन पिंपळकर, सुरेश वांढरे, लक्ष्मण नुलावार, बाबुराव विरदंडे, रुपेश गेडेकर यांनी केली आहे. मागणीची दखल न घेतल्या प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे.पाण्याअभावी शेतातील पीक सुकायला लागले आहे. परिसरात अमलनाला सारख्या मोठा सिंचन प्रकल्प असताना त्याचा फायदा शेतीला होताना दिसत नाही. अजूनपर्यंत अमलनाला धरणाचे पाणी शेतीला सोडण्यात आले नाही. त्यामुळे शेतीचा रब्बी हंगाम धोक्यात आला आहे.- दशरथ भोयर, शेतकरी पाचगाव .