शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

धरणाचे पाणी कंपन्यांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:15 IST

यावर्षी अपुरा पाऊस पडला. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कर्ज काढून शेती केलेल्या शेतकºयांना यावर्षी अडचणींचा सामना करावा लागणार असून उत्पादनापेक्षा खर्चात मोठी वाढ झाली आहे.

ठळक मुद्देपाण्याअभावी पिके लागली सुकायला : अमलनाला धरणाचे पाणी सोडण्याची मागणी

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : यावर्षी अपुरा पाऊस पडला. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कर्ज काढून शेती केलेल्या शेतकºयांना यावर्षी अडचणींचा सामना करावा लागणार असून उत्पादनापेक्षा खर्चात मोठी वाढ झाली आहे. यावर मात करायची असेल तर शेतपिकांना सिंचनाची सोय करणे आवश्यक आहे. राजुरा, कोरपना तालुक्यात सिंचनाच्या सोईसाठी मोठी धरणे आहेत. परंतु पिके सुकायला लागली तरी धरणाचे पाणी अजूनही शेतीला सोडण्यात आले नाही. धरणाचे पाणी खासगी कंपन्यांना दिले जात असून या धरणांचा शेतीला काय फायदा, असा प्रश्न आता शेतकरी विचारु लागले आहे.निसर्गाच्या पाण्यावर शेती करण्याचे दिवस आता जवळजवळ संपले आहेत. पावसाअभावी शेती बेभरवशाची झाली आहे. पाण्याशिवाय शेती करणे ही संकल्पनाच तशी अवघड आहे.शेतकºयांना रब्बी हंगाम करण्यासाठी पावसाची आवश्यकता आहे. यावर्षी पाऊस कमी पडला त्याचा मोठा फटका शेतीला बसला आहे.मंगी, उपरवाही, चंदनवाही, पाचगाव, पांढरपौणी, भूरकुंडा (बु.) इत्यादी गावे अमलनाला प्रकल्पात येतात. अमलनाला धरणाच्या पाण्यावर या परिसरातील शेतकरी शेती करतात. मात्र यावर्षी धरणाचे पाणी अद्यापही सोडण्यात आले नाही. त्यामुळे शेतीचा रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. कॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. काटेरी झुडपेही वाढली असून कॅनलची दुरुस्ती केली नसल्याने शेताच्या बांधापर्यंत पाणी पोहोचणे कठीण झाले आहे.कॅनलची दुरुस्ती करुन अमलनाला प्रकल्पाचे पाणी शेतीला सोडावे, अशी मागणी पाचगाव येथील शेतकरी तिरुपती इंदूरवार, दशरथ भोयर, सुधाकर गेडेकर, नानाजी विरदंडे, गजानन भेंडे, किसन पिंपळकर, सुरेश वांढरे, लक्ष्मण नुलावार, बाबुराव विरदंडे, रुपेश गेडेकर यांनी केली आहे. मागणीची दखल न घेतल्या प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे.पाण्याअभावी शेतातील पीक सुकायला लागले आहे. परिसरात अमलनाला सारख्या मोठा सिंचन प्रकल्प असताना त्याचा फायदा शेतीला होताना दिसत नाही. अजूनपर्यंत अमलनाला धरणाचे पाणी शेतीला सोडण्यात आले नाही. त्यामुळे शेतीचा रब्बी हंगाम धोक्यात आला आहे.- दशरथ भोयर, शेतकरी पाचगाव .