शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

धरणाचे पाणी कंपन्यांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:15 IST

यावर्षी अपुरा पाऊस पडला. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कर्ज काढून शेती केलेल्या शेतकºयांना यावर्षी अडचणींचा सामना करावा लागणार असून उत्पादनापेक्षा खर्चात मोठी वाढ झाली आहे.

ठळक मुद्देपाण्याअभावी पिके लागली सुकायला : अमलनाला धरणाचे पाणी सोडण्याची मागणी

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : यावर्षी अपुरा पाऊस पडला. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कर्ज काढून शेती केलेल्या शेतकºयांना यावर्षी अडचणींचा सामना करावा लागणार असून उत्पादनापेक्षा खर्चात मोठी वाढ झाली आहे. यावर मात करायची असेल तर शेतपिकांना सिंचनाची सोय करणे आवश्यक आहे. राजुरा, कोरपना तालुक्यात सिंचनाच्या सोईसाठी मोठी धरणे आहेत. परंतु पिके सुकायला लागली तरी धरणाचे पाणी अजूनही शेतीला सोडण्यात आले नाही. धरणाचे पाणी खासगी कंपन्यांना दिले जात असून या धरणांचा शेतीला काय फायदा, असा प्रश्न आता शेतकरी विचारु लागले आहे.निसर्गाच्या पाण्यावर शेती करण्याचे दिवस आता जवळजवळ संपले आहेत. पावसाअभावी शेती बेभरवशाची झाली आहे. पाण्याशिवाय शेती करणे ही संकल्पनाच तशी अवघड आहे.शेतकºयांना रब्बी हंगाम करण्यासाठी पावसाची आवश्यकता आहे. यावर्षी पाऊस कमी पडला त्याचा मोठा फटका शेतीला बसला आहे.मंगी, उपरवाही, चंदनवाही, पाचगाव, पांढरपौणी, भूरकुंडा (बु.) इत्यादी गावे अमलनाला प्रकल्पात येतात. अमलनाला धरणाच्या पाण्यावर या परिसरातील शेतकरी शेती करतात. मात्र यावर्षी धरणाचे पाणी अद्यापही सोडण्यात आले नाही. त्यामुळे शेतीचा रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. कॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. काटेरी झुडपेही वाढली असून कॅनलची दुरुस्ती केली नसल्याने शेताच्या बांधापर्यंत पाणी पोहोचणे कठीण झाले आहे.कॅनलची दुरुस्ती करुन अमलनाला प्रकल्पाचे पाणी शेतीला सोडावे, अशी मागणी पाचगाव येथील शेतकरी तिरुपती इंदूरवार, दशरथ भोयर, सुधाकर गेडेकर, नानाजी विरदंडे, गजानन भेंडे, किसन पिंपळकर, सुरेश वांढरे, लक्ष्मण नुलावार, बाबुराव विरदंडे, रुपेश गेडेकर यांनी केली आहे. मागणीची दखल न घेतल्या प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे.पाण्याअभावी शेतातील पीक सुकायला लागले आहे. परिसरात अमलनाला सारख्या मोठा सिंचन प्रकल्प असताना त्याचा फायदा शेतीला होताना दिसत नाही. अजूनपर्यंत अमलनाला धरणाचे पाणी शेतीला सोडण्यात आले नाही. त्यामुळे शेतीचा रब्बी हंगाम धोक्यात आला आहे.- दशरथ भोयर, शेतकरी पाचगाव .