शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती

By admin | Updated: August 12, 2014 23:41 IST

बल्लारपूर तालुक्यातील १७ ग्रामपंचायती अंतर्गत २५ ते ३० गावांत अत्यल्प पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ६० टक्के पाऊस कमी झाल्याने धान,

कोठारी : बल्लारपूर तालुक्यातील १७ ग्रामपंचायती अंतर्गत २५ ते ३० गावांत अत्यल्प पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ६० टक्के पाऊस कमी झाल्याने धान, सोयाबीन, कापूस, तूर, भाजीपाला व इतर पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. अत्यल्प पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून पुढे अशीच परिस्थिती कायम राहिल्यास नापिकी होण्याची शक्यता बळकावली आहे. मागील वर्षी बल्लारपूर तालुक्यात ७०० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. मात्र यावर्षी पाऊस ३०० मि.मी. झाला असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ६० टक्के पाऊस कमी आहे. बल्लारपूर तालुक्यात नऊ हजार हेक्टर शेती पिकाखाली असून त्यात तीन हजार हेक्टर धान, सोयाबीन तीन हजार ५०० हेक्टर, कापूस ८०० हेक्टर, तूर ३०० हेक्टर, भाजीपाला २०० हेक्टर व इतर पिके ५०० हेक्टरमध्ये घेण्यात येतात. यंदा ९० टक्के धान पीक घेण्यासाठी भात रोपाची निर्मिती शेतकऱ्यांनी केली. आतापर्यंत केवळ २० ते ३० टक्के रोवणी झाली आहेत. सध्या सोयाबीन, कापूस व तूर या पिकांची स्थिती चांगली आहे.मात्र पुढे पावसाची अशीच स्थिती कायम राहिल्यास पिके करपून नष्ट होण्याची भीती आहे. सध्या धान रोपे वाचविण्याची कसरत शेतकरी करीत आहे. नाल्याशेजारी असलेले तसेच विहिर सिंचनाची सोय असलेले शेतकरी कसेबसे धान पऱ्हे वाचविण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र वातावरणात उकाडा वाढला आहे. सूर्य आग ओकत आहे. पावसाचा थांगपत्ता नाही. अशात धान पऱ्हे वाचविणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे. पावसाअभावी धान पऱ्हे करपली जात आहेत. सर्वत्र हिरवेगार दिसणारी पऱ्हे सध्या पिवळी झाली आहेत. पऱ्ह्याचे शेंडे वाढत आहेत. जून-जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली नाही. शेतकरी आकाशाकडे नजरा लावून बसला आहे. मात्र पाऊस बसरला नाही. पावसाच्या आगमनासाठी सर्वत्र निसर्गाची पूजा केली जात आहे. मात्र निसर्ग रुसल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. या भागात अनेक शेतकऱ्यांना तिबार पेरणी करावी लागली. मात्र ऐनवेळी पावसाने दगा दिल्याने महागडे बियाणे मातीमोल झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे. (वार्ताहर)