शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

बल्लारपूर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती

By admin | Updated: August 12, 2014 23:41 IST

बल्लारपूर तालुक्यातील १७ ग्रामपंचायती अंतर्गत २५ ते ३० गावांत अत्यल्प पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ६० टक्के पाऊस कमी झाल्याने धान,

कोठारी : बल्लारपूर तालुक्यातील १७ ग्रामपंचायती अंतर्गत २५ ते ३० गावांत अत्यल्प पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ६० टक्के पाऊस कमी झाल्याने धान, सोयाबीन, कापूस, तूर, भाजीपाला व इतर पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. अत्यल्प पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून पुढे अशीच परिस्थिती कायम राहिल्यास नापिकी होण्याची शक्यता बळकावली आहे. मागील वर्षी बल्लारपूर तालुक्यात ७०० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. मात्र यावर्षी पाऊस ३०० मि.मी. झाला असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ६० टक्के पाऊस कमी आहे. बल्लारपूर तालुक्यात नऊ हजार हेक्टर शेती पिकाखाली असून त्यात तीन हजार हेक्टर धान, सोयाबीन तीन हजार ५०० हेक्टर, कापूस ८०० हेक्टर, तूर ३०० हेक्टर, भाजीपाला २०० हेक्टर व इतर पिके ५०० हेक्टरमध्ये घेण्यात येतात. यंदा ९० टक्के धान पीक घेण्यासाठी भात रोपाची निर्मिती शेतकऱ्यांनी केली. आतापर्यंत केवळ २० ते ३० टक्के रोवणी झाली आहेत. सध्या सोयाबीन, कापूस व तूर या पिकांची स्थिती चांगली आहे.मात्र पुढे पावसाची अशीच स्थिती कायम राहिल्यास पिके करपून नष्ट होण्याची भीती आहे. सध्या धान रोपे वाचविण्याची कसरत शेतकरी करीत आहे. नाल्याशेजारी असलेले तसेच विहिर सिंचनाची सोय असलेले शेतकरी कसेबसे धान पऱ्हे वाचविण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र वातावरणात उकाडा वाढला आहे. सूर्य आग ओकत आहे. पावसाचा थांगपत्ता नाही. अशात धान पऱ्हे वाचविणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे. पावसाअभावी धान पऱ्हे करपली जात आहेत. सर्वत्र हिरवेगार दिसणारी पऱ्हे सध्या पिवळी झाली आहेत. पऱ्ह्याचे शेंडे वाढत आहेत. जून-जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली नाही. शेतकरी आकाशाकडे नजरा लावून बसला आहे. मात्र पाऊस बसरला नाही. पावसाच्या आगमनासाठी सर्वत्र निसर्गाची पूजा केली जात आहे. मात्र निसर्ग रुसल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. या भागात अनेक शेतकऱ्यांना तिबार पेरणी करावी लागली. मात्र ऐनवेळी पावसाने दगा दिल्याने महागडे बियाणे मातीमोल झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे. (वार्ताहर)