शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

पुरानंतर गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 5:00 AM

गावांमध्ये नळ योजनेबरोबरच हातपंप असले तरी या हातपंपांना दूषित पाणी येत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. वैनगंगा नदीचे पाणी गावात शिरल्याने पंपगृह, विहिरी, हातपंप गढूळ पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे पाणी दूषित झाले आहे. तसेच गावातील खासगी विहिरींनासुद्धा दूषित पाण्याचा फटका बसला आहे. अशावेळी गावात असणारे हातपंप गावकऱ्यांसाठी संजीवनी ठरू शकतात.

ठळक मुद्देअनेक गावात नळ योजना बंद : हातपंपातूनही येतेय दूषित पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : तालुक्यातील वैनगंगेच्या काठावरील गावांमध्ये पुराचे पाणी ओसरताच नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. तालुक्यातील जवळपास ५१ गावे महापुराने प्रभावित झाली होती तर २१ गावांना जबरदस्त तडाखा बसला होता. वैनगंगेच्या काठावरील गावात नळ योजनेतून तसेच हातपंपाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. या गावांमध्ये नळ योजना असली तरी जलशुद्धीकरणाची सोय नाही. त्यामुळे पूर ओसरल्यानंतर आता दूषित पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य कायम आहे.गावांमध्ये नळ योजनेबरोबरच हातपंप असले तरी या हातपंपांना दूषित पाणी येत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. वैनगंगा नदीचे पाणी गावात शिरल्याने पंपगृह, विहिरी, हातपंप गढूळ पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे पाणी दूषित झाले आहे. तसेच गावातील खासगी विहिरींनासुद्धा दूषित पाण्याचा फटका बसला आहे. अशावेळी गावात असणारे हातपंप गावकऱ्यांसाठी संजीवनी ठरू शकतात. मात्र गावात नळ योजना आल्यानंतर हातपंपाच्या दुरुस्तीकडे, देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने पिण्याच्या पाण्यासाठी पूरग्रस्त नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दूषित पाण्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. गावात पुरामुळे साचलेला गाळ, शिवारातून येत असलेली दुर्गंधी, त्याचबरोबर नळांना, विहिरींना, हातपंपांना येणारे गढूळ पाणी, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धानाचे पीक पूर्णत: नष्ट झाले असून गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने विटा, मातीची घरे कोसळली आहेत. यामुळे नागरिकांची संकटे वाढली आहेत. शासनस्तरावर पूरग्रस्त गावांमध्ये मोठया प्रमाणावर टँकरने पाणी पुरवठा केला जात असला तरी गावगाड्यातील जनावरांची संख्या लक्षात घेता व घरातील गाळाने माखलेल्या साहित्यांच्या साफसफाईसाठी मोठया प्रमाणात पाणी लागत आहे.दूषित पाणी पिऊ नका, पाणी उपलब्ध करू - क्रांती डोंबेपूरग्रस्त गावांमध्ये असलेली एकंदरीत परिस्थिती लक्षात घेत ब्रम्हपुरीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी पूर ओसरताच सर्वात आधी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन पूरग्रस्त गावांमध्ये शक्य तेवढया लवकर पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य दिले आहे. टँकरने गावोगावी पिण्याचे पाणी कसे उपलब्ध करून दिले जातील, याकडे त्या जातीने लक्ष ठेवून आहेत. पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन नागरिकांना विहिरी, नळ, हातपंपांचे पाणी शुद्ध झाल्याशिवाय पिऊ नका, अशी विनंती करीत आहेत.नाल्यांमध्ये नळयोजनेचे पाईपकिन्ही गावातील नळ योजनेचे पाईप गावातील अंतर्गत नाल्यांमधून टाकले असल्याने आणि पुरामुळे नाल्या तुडुंब भरल्या असल्याने नळाचे पाणी कसे घ्यावे, असा प्रश्न किन्ही गावातील नागरिकांना पडला आहे. येथील हातपंपसुद्धा बंद अवस्थेत असल्याने येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठया प्रमाणात संघर्ष करावा लागत आहे

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण