शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 06:00 IST

यावर्षी पावसाचे आगमन लांबले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. दरवर्षी साधारणत: दसºयानंतर शेतकऱ्यांच्या घरी सोयाबीन व कापूस हे नगदी पीक येतात त्यामुळे शेतकºयांची दिवाळी आनंदात जाते. परंतु यावर्षी नेमका याच काळात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने सोयाबीन व कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देअर्थकारण बिघडले : शेतमालाची प्रतवारी घसरल्याने भावही झाले कमी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसाने कपाशीची बोंडे सडल्याने उत्पादनात घट झाली आहे तर दुसरीकडे सततच्या पावसाने कपाशीची प्रतवारी घसरल्याने बाजारभाव कमी अशी अवस्था जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे.यावर्षी पावसाचे आगमन लांबले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. दरवर्षी साधारणत: दसºयानंतर शेतकऱ्यांच्या घरी सोयाबीन व कापूस हे नगदी पीक येतात त्यामुळे शेतकºयांची दिवाळी आनंदात जाते. परंतु यावर्षी नेमका याच काळात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने सोयाबीन व कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होत असून नगदी पीक असलेल्या कापूस व सोयाबीन पिकांची प्रतवारी घसरल्याने आज बाजारात या मालाला अत्यल्प भाव मिळत आहे. सध्या शेतकरी शेतातील सोयाबीन व कापूस पीक काढत आहे. कापूस ओला झाल्याने आणि सततच्या धुक्याने तो काळा पडत आहे. सततच्या पावसाने कपाशीचे बोंडे काळी पडल्याने हलक्या प्रतवारीचा कापूस एकाचवेळी फुटल्याने शेतकऱ्यांचा वेचणीचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे मजुरही मिळणे कठिण झाले आहे. सद्या सात ते आठ रुपये किलो याप्रमाणे कापसाची वेचणी सुरू आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने शेतकºयांनी कपाशीला दिलेली खते अती पावसामुळे वाहून गेली. त्यामुळे पाऊस जाताच कपाशीची झाडे पिवळी पडून वाळत आहे. त्यामुळे कपाशीची यावर्षी नापिकी होण्याची भिती शेतकºयांना सतावत आहे.ओल्या कापसाला व्यापाऱ्यांची नापसंतीउन्हात वेचणी करताना कापसाचे वजन हलके होते. मात्र यंदा कापूस फुटण्याच्या दिवसांपासून सतत एक महिना पाऊस झाल्याने ओला झालेला कापूस उन्हात वाळवून विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यातच ओला व खराब झालेल्या कापसाला व्यापाºयांकडून कमी भाव मिळत आहे. अवकाळी पावसाने गेल्या आठवडाभरापासून विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांची पावले आता शेती शिवाराकडे वळली आहेत. मात्र सर्वाधिक नुकसान झालेले कपाशीचे पीक पाहून शेतकरी हतबल होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापूस वेचणी सुरू केली. मात्र कापूस ओला असल्याने व्यापारी खरेदी करीत नाहीत. हा कापूस उन्हात वाळवून देखील किरकोळ व्यापारी कवडीमोल भावाने त्याची खरेदी करीत आहेत. शासनाकडून पिकांना योग्य भाव द्यावा, नुकसान भरपाई त्वरित मिळावी. अन्यथा पीक काढणीसाठी आलेला खर्चही वसूल होणार नाही, अशी अवस्था आहे प्रत्येक शेतकऱ्यांची असल्याची व्यथा शेतकरी व्यक्त करीत आहेत.परतीच्या पावसाने हाती येणारे कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. त्यातच भाव सुद्धा कमी मिळत आहे. वन्यप्राण्यांचा उभ्या पिकात धुमाकूळ सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात पिकांची नासधूस होतआहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.- दीपक पिंपळकरशेतकरी, गोवरीशेतकऱ्यांनी कपाशी पिकांवर अतोनात खर्च केला आहे.परंतु अस्मानी आणि सुलतानी संकटांनी शेतकरी पार होरपळून गेला आहे. यावर्षी शेतकऱ्यांवर निसर्ग कोपल्याने मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.- रामदास लांडेशेतकरी, कोलगाव

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी