शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

रेल्वेप्रवास नको रे बाबा, दररोज ५० ते ७५ तिकिटे होतात रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:28 IST

चंद्रपूर : मागील महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमालीची घटली आहे. चंद्रपूर, बल्लारपूर ...

चंद्रपूर : मागील महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमालीची घटली आहे. चंद्रपूर, बल्लारपूर रेल्वेस्थानकांवरून पूर्वी चिक्कार प्रवासी प्रवास करायचे. मात्र आता बोटावर मोजण्याइतके प्रवासी प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या दहशतीने दररोज ५० ते ७५ तिकिटे रद्द होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

बल्लारपूर रेल्वे जंक्शनमधून जीटी एक्स्प्रेस, दक्षिण, सिंकदराबाद, दानापूर, तेलंगणा, गौरखपूर अशा साधारणत: ट्रेनच्या ३० फेऱ्या होत आहेत. या ट्रेनने पूर्वी प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे रेल्वे स्टेशनचा परिसर गजबजलेला दिसून यायचा. मात्र मागील वर्षी कोरोनाने शिरकाव केला. त्यामुळे काहीकाळ रेल्वेच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर काही अटी व शर्तीवर रेल्वेचा प्रवास सुरू करण्यात आला. परंतु, अद्यापही अनेक रेल्वे बंद आहेत. त्यामुळे आपसुकच प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यातही अनेकजण प्रवास टाळत असून दररोज ७५ ते १०० च्या जवळपास तिकिटे रद्द होत असल्याची माहिती आहे.

बॉक्स

मुंबईसाठीची ट्रेन रद्द

बल्लारपूर रेल्वे जंक्शनवरून मुंबईसाठी डायरेक्ट ट्रेन धावत होती. त्यामुळे मुंबईला ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. मात्र मागील वर्षींपासून ही ट्रेनच बंद आहे.

-आंध्रामध्ये रेल्वेचे काम सुरू असल्याने बहुतांश ट्रेनचा मार्ग वळविण्यात आला आहे. दिल्ली ते चेन्नईच्या ट्रेन बल्लारपूर जंक्शनवरून जाण्याऐवजी माजरीवरून जात असल्याची माहिती आहे.

बॉक्स

कोरोनामुळे प्रवाशाची संख्या ओसरली आहे. दररोज साधारणत: ५०च्या जवळपास तिकिटे रद्द होत आहेत. सद्यस्थितीत रेल्वेच्या ३० फेऱ्या होत आहेत. मात्र त्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात प्रवासी नाही.

-ओमप्रकाश कुमार, टीटीआय, बल्लारपूर

-----

प्रवाशांअभावी अनेकदा ट्रेन रद्द

सद्यस्थितीत बल्लारपूर जंक्शनवरून ट्रेनच्या ३० फेऱ्या होत आहेत. परंतु, प्रवासी कमी असल्याने बऱ्याचंदा ट्रेन रद्द होत आहेत. मात्र याबाबत प्रवाशांना सूचना नसल्याने त्याची मोठी फजिती होत आहे.