शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

शाळा करायची की, सर्वेक्षण! एका गावात शाळा, दुसऱ्या गावात करावे लागणार सर्वेक्षण

By साईनाथ कुचनकार | Updated: January 23, 2024 19:50 IST

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम राज्यभर सुरु करण्यात आले आहे.

चंद्रपूर: मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम राज्यभर सुरु करण्यात आले आहे. यासाठी २३ ते ३१ जानेवारी दरम्यान, गावागावात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी शासकीय कर्मचाऱ्यांसह शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र शिक्षकांना शाळा करून सर्वेक्षण करायचे असल्याने सध्या शिक्षक अडचणीत सापडले आहे. विशेष म्हणजे, काही शिक्षक ज्या गावात आहे त्यांना दुसऱ्या गावातील सर्वेक्षण करायचे आहे. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम कसे करायचे असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याकरिता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या नोडल ऑफिसर, सहायक नोडल ऑफिसरची तालुकास्तरावर नेमणूक करण्यात आली आहे.

सध्या जिल्ह्यात नवरत्न स्पर्धा, बाल क्रीडा स्पर्धा सुरु आहे. त्यातच २६ जानेवारी निमित्त शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी करायची आहे. यामध्ये शिक्षकांना शाळा करून सर्वेक्षण करायचे आहे. विशेष म्हणजे, बहुतांश शाळांमध्ये दोन ते तीन शिक्षक आहे. या शाळांतील सर्वच शिक्षकांची सर्वेक्षणासाठी नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे शाळा करायची कशी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रशासकीय स्तरावर अधिकारी सर्वेक्षणाकडे अधिक लक्ष देण्याबाबत शिक्षकांना सांगत असले तरी शिक्षण विभागातील अधिकारी प्रथम शाळा करून त्यानंतर उरलेल्या वेळी सर्वेक्षण करण्यासंदर्भात सांगत असल्याचे काही शिक्षकांचे म्हणणे आहे. दरम्यान काही गावात नेटवर्क ही नसल्याने सर्वेक्षण करताना कर्मचाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

अभ्यासक्रमावर पडणार परिणाम२३ ते ३१ जानेवारी दरम्यान, शिक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांनी गावागावात सर्वेक्षण करायचे आहे. शिक्षक शाळा सोडून सर्वेक्षणाच्या कामात गुंतल्यामुळे अभ्यासक्रमावर परिणाम पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षकांचे शिकविण्याचे काम आहे. त्यांचा तो जिव्हाळ्याचे विषय आहे. त्यामुळे राज्य शासनाला पत्र पाठवून शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम देऊ नये, अशी मागणी केली आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीचा अधिनियमानुसार दरवार्षिक जनगणना, आपत्ती व्यवस्थापन, निवडणूक कर्तव्य खेरीज अन्य कोणतेही कामे देण्यात येऊ नये, असे शासनाचे स्पष्ट आदेश आहे. असे असतानाही प्रशासनाकडून वारंवार शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊन त्यांना गुंतवून ठेवल्या जात आहे. परिणामी शैक्षणिक गुणवत्तेवर विपरित परिणाम पडतो. त्यामुळे शासनाने अशैक्षणिक कामाबाबत स्पष्ट धोरण आखावे. - प्रकाश चुनारकर, राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक.

टॅग्स :Schoolशाळाchandrapur-pcचंद्रपूर