शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

स्वातंत्र्याचे आम्हा सांगू नका काही..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 11:54 PM

जिवती तालुक्यातील १३ घरांची वस्ती असलेल्या कोलाम पाटागुड्याला जिल्हा प्रशासनाने दत्तक घेतले. पंडित गुड्यापासून दीड ते दोन किमी अंतरावरील पाटागुड्यात जाण्यासाठी अद्याप रस्ताच नाही.

ठळक मुद्देकोलाम पाटागुड्याचा सवाल : रस्त्याअभावी २० वर्षांपासून दगडगोट्यातून काढतात वाट

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जिवती तालुक्यातील १३ घरांची वस्ती असलेल्या कोलाम पाटागुड्याला जिल्हा प्रशासनाने दत्तक घेतले. पंडित गुड्यापासून दीड ते दोन किमी अंतरावरील पाटागुड्यात जाण्यासाठी अद्याप रस्ताच नाही. पारंपरिक शेतीसोबत मिळेल ती कामे करून पोटाची खळगी भरणाऱ्या अशिक्षित कुटुंबांचा हा जीवघेणा संघर्ष बघितला तर तथाकथित विकासकामांचे पितळ उघडे पडते. ‘स्वातंत्र्याचे आम्हा सांगू नका काही, कोण देतो ग्वाही भाकरीची...’ हा त्यांचा सवाल आहे.ठक्करबापा योजनेअंतर्गत कोलाम गुड्यांचा विकास करण्यासाठी सरकारने जिल्हा प्रशासनाने अनेक योजना तयार केल्या. आत्मसन्मान वाढविणाऱ्या विविध योजनांचा त्यामध्ये समावेश आहे. तर दुसरीकडे घर, रस्ता, शाळा, आरोग्य, शेतीची सुधारणा आणि हाताला बारामाही काम देवू असे आश्वासन देणाºया राजकीय नेत्यांनीदेखील रेंगेगुडा, सीतागुडा, पाटागुडा या कोलामगुड्यांचा सोईस्कर वापर करून घेण्याचे प्रकार सुरू आहेत. सत्तेचा मजला चढल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी कोलामगुड्यांना विकासापासून जणू वाळीतच टाकल्याचा प्रत्यय येत आहे. यातीलच पाटागुडा हे प्रातिनिधीक उदाहरण ठरावे. पाटणपासून पंडितगुडा ओलांडले की पाटागुड्याची खडतर वाट सुरू होते. दीड- दोन किमी अंतरावरील या गुड्यामध्ये जाण्यासाठी योग्य रस्ताच नाही. १२ ते १३ कुटुंब पारंपरिक शेती आणि मोलमजुरीची कामे करून उदरनिर्वाह करतात. शासनाची घरकुल योजना सोडली तर अन्य योजनांचा या गावाला अद्याप स्पर्श झाला नाही. आजारी व्यक्तीला उपचार करावयाचे असेल तर खाटेवर मांडून दगडगोट्यांची वाट पार करुनच पुढे जावे लागते.सहा ते सात कुटुंबांना घरकुल बांधून देण्यात आले. छप्परपर्यंत बांधकाम पूर्ण झाले. परंतु, उर्वरीत सर्वच कामे ठप्प झाली आहे. घरकुल लाभधारक म्हणतात, घरकुल मिळाल्याने बरे झाले. पोराबाळांची आशा वाढली. पण, बांधकाम अर्धवट आहे. ही अडचण कधी दूर होणार, याची आम्ही वाट बघतोय.वाट पाहण्यात गेली २० वर्षे !शेतीची कामे संपल्यानंतर प्रपंच चालविण्यासाठी सर्वच कुटुंब अन्यत्र स्थलांतरण करतात. हंगाम संपल्यानंतर गुड्यात परत येतात. त्यानंतर पुन्हा भटकंती सुरू होते. निवडणूक आली तर की दुर्लक्षित इवल्याशा गुड्यात विविध पक्षांच्या नेत्यांचे पाऊल पडते. कोलामांनी रस्त्याचा विषय काढल्यास ‘यंदा होणारच’ अशी बतावणी करून नेते-कार्यकर्ते परागंदा होतात. या आश्वासनाला २० वर्षे झाल्याची खंत कोलाम समाज बांधवांनी व्यक्त केली. राहायला सुरक्षित घर व जगण्यासाठी साधन द्यावे, ही त्यांची मागणणी आहे.पाणी मिळाले, पुढचे काय?मागील २० वर्षांपासून पाटणगुडा येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी डोंगर उतरून खाली यावे लागत होते. जिल्हा प्रशासनाने दत्तक घेतले आहे. जवळच माणिकगड सिमेंट कंपनीची खाण आहे. या खाणीतून दिवस-रात्र स्फोटांचा आवाज येतो. गुड्याच्या भूगर्भातून खनिज संपत्तीचे उत्खनन करून सिमेंटद्वारे गगणाला भिडणाºया इमारती महानगरांमध्ये उभ्या होत आहेत. पण, येथील घरकुलांवर छप्पर चढले नाही. कंपनीने सीएसआर फंडातून सार्वजनिक शौचालय व पाणी पुरवठ्याची सुविधा करून दिली. परंतु, पोटाचा प्रश्न कायम आहे.कोण देतो ग्वाही छप्परांची!पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला तरी रस्ते, नाल्या आणि व्यक्तिगत कल्याणकारी योजना गुड्यात पोहोचल्याच नाहीत. घरकुलाची कामे अर्धवट असून नागरिक बांबूचे तट्टे व कुडाच्या भिंती उभारलेल्या झोपड्यांमध्ये दिवस ढकलत आहेत. दिवा अथवा कंदिलाच्या प्रकाशात आयुष्यातील उजेड शोधणारी माणसे दारिद्रयाशी निकराने संघर्ष करीत आहेत. दरम्यान, वीज वितरण कंपनीने दारिद्रय रेषेखालील नागरिकांसाठी सौभाग्य योजना सुरू केली. यातून १०० टक्के अनुदानावर वीजमीटर लावून देण्यात आले. विजेची यंत्रसामग्री पहाडावरील पाटणगुड्यावर नेताना बैलबंडीचा आधार घेण्यात आला. घरकुलांची कामे अर्धवट आहे. मात्र, अस्वस्थ करणारा अंधार पाहून उपकार्यकारी अभियंता मांगीलाल राठोड व कनिष्ठ अभियंता विनोद भलमे यांनी छप्पर नसलेल्या घरांना वीज मीटर लावून दिले. त्यामुळे अन्य योजनांचा थांगपत्ता नसलेल्या कोलाम गुड्यातील नागरिक वीज कंपनीचे कौतुक करताना दिसून आले.