शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

ब्रह्मपुरीचा समावेश चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:30 IST

ब्रह्मपुरी : अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय चिमूरमध्ये ब्रह्मपुरी तालुक्याचा समावेश करण्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव असून, हा प्रस्ताव अतिशय चुकीचा आहे. ...

ब्रह्मपुरी : अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय चिमूरमध्ये ब्रह्मपुरी तालुक्याचा समावेश करण्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव असून, हा प्रस्ताव अतिशय चुकीचा आहे. ब्रह्मपुरी शहर हे जिल्ह्यासाठी योग्य असून, संपूर्ण सोयीसुविधांयुक्त आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्याचा समावेश चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका, अशी मागणी खोरिपाने केली आहे.

ब्रह्मपुरी शहर उच्च दर्जाचे शिक्षण व आरोग्यासाठी प्रसिद्ध असून, येथे पाच जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिक शिक्षण व वैद्यकीय उपचारासाठी येत असतात. या ठिकाणी नगरपालिका उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, न्यायालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, ग्रामीण रुग्णालयासह अन्य खासगी रुग्णालय व शासकीय तंत्रनिकेतन, सिंचन विभाग, रेल्वे स्टेशन, पोस्ट ऑफिस व दूरसंचार कार्यालय इत्यादी सोयी उपलब्ध असून, त्यांच्या विस्तारास जागा उपलब्ध आहे. येथील लोकसंख्या व पायाभूत सुविधा व आंतरजिल्हा वाहतुकीच्या आधारावर तीस-पस्तीस वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाने ब्रह्मपुरी जिल्ह्याची घोषणा केली होती आणि तेव्हापासूनच ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, सावली तालुक्यातील जनता ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी करीत आहे. या उलट चिमूर येथे उपरोक्त सोयींचा अभाव असून, त्यांच्या विस्तारास वाव नाही तसेच रेल्वेच्या सोयीमुळे चिमूरच्या तुलनेत चंद्रपूर येथील कार्यालयीन कामे अत्यंत कमी खर्चात व कमी वेळात करणे शक्य होत आहे. त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय चिमूरमध्ये ब्रह्मपुरी तालुक्याचा समावेश केल्यास येथील नागरिकांवर प्रचंड अन्याय होईल व या अन्यायाच्या विरोधात संपूर्ण तालुक्यात संतापाची भावना निर्माण होऊन तीव्र आंदोलन पेटण्याची भीती आहे. तेव्हा ब्रह्मपुरी जिल्हानिर्मितीचा प्रश्न प्रलंबित असेपर्यंत आपल्या प्रस्तावाच्या विरोधात ब्रह्मपुरी तालुक्यातील जनतेच्या वतीने आम्ही आक्षेप नोंदवत आहोत. त्यामुळे सदर प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा, अन्यथा या अन्यायाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिपब्लिक पक्ष खोरिपाच्या वतीने देण्यात आला. या अनुषंगाने प्रा. देवेश कांबळे, जीवन बागडे, मिलिंद मेश्राम, विजय वालदे, प्रा. बिंदूसार उपाध्ये, विजय पाटील, दर्याव कांबळे यांनी आक्षेप अर्ज उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर, मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना पाठविण्यात आले.