शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
2
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
3
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
4
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
5
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
6
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
7
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
8
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
9
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
10
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
11
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
12
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
13
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
14
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
15
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
16
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
17
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
18
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
20
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"

जिल्ह्यात ३२ हजार ९५२ घनमीटर गाळ उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 11:23 PM

शासनाच्या गाळयुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत अनेक तलाव-बोड्यांमधील गाळ उपसा केला जात आहे. त्यामुळे पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार असून याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

ठळक मुद्देलाभ घ्यावा : गाळयुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाच्या गाळयुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत अनेक तलाव-बोड्यांमधील गाळ उपसा केला जात आहे. त्यामुळे पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार असून याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. मागील वर्षात ३२ हजार ९५२ घनमीटर गाळ उपसा झाला होता. तर चालू आर्थिक वर्षात या मोहिमेचा बुधवारपासून शुभारंभ करण्यात आला असून नागपूर विभागात चंद्रपूर जिल्हा अव्वलस्थानी आहे.गेल्या अनेक वर्षांपासून अनेक तलावामधील गाळीचा उपसा झाला नव्हता. त्यामुळे तलावातील पाणी साठवण क्षमता कमी झाली. परिणामी पावसाळा संपताच तलावातील जलसाठ्यात घट होत होती. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून शासनाने गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना कार्यान्वित केली. या योजनेतून २०१६-१७ या वर्षात जिल्ह्यातील २२ तलावातील गाळ काढण्यात आला. त्यातील ३२ हजार ९५२ घनमीटर गाळीचा उपसा करण्यात आला. उपसा केलेला गाळ शेतकºयांनी स्वत:च्या शेतात टाकला. गाळ काढण्यात आलेल्या तलावामध्ये चंद्रपूर तालुक्यातील दोन गावांचा समावेश आहे. बल्लारपूर, राजुरा, कोरपना, चिमूर, मूल या तालुक्यातील प्रत्येकी एक, गोंडपिपरी-चार, भद्रावती, नागभीड तालुक्यातील दोन तर ब्रह्मपुरी तालुक्यात तीन तलावातील गाळ उपसा करण्यात आला.गाळ काढण्यावर जवळपास ९ लाख ८८ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला असून या कामांना लोकसहभाग मोठ्या प्रमाणात मिळाला. यंदा जवळपास ५० तलावातील गाळ उपसा केला जाणार असून जेसीबी मशीनद्वारे गाळ उपसा केला जाणार आहे. शेतकऱ्यांनी स्वत:चे वाहन लावून आपल्या शेतात गाळ टाकावा असे आवाहन करण्यात आले आहे.शेतकऱ्यांना फायदातलावातील निघालेला गाळ शेतकºयांना शेतात टाकण्यासाठी प्रशासनाकडून सवलत दिली जात आहे. शेतकऱ्यांने स्व:ताचे वाहन करून गाळ उचलावे. वाहतुकीसाठी लागणारा डिझेलचा खर्च जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.