शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
2
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
3
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
4
पाक विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी कसे असेल Asia Cup स्पर्धेतील सेमीच समीकरण?
5
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
6
भ्रष्टाचाराचं Live प्रेझेंटेशन... तरुणाचा महापौरांसमोरच कॉल, अधिकाऱ्यांच्या 'रेट लिस्ट'चा पर्दाफाश
7
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
8
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
9
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
10
Stock Market: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; सेन्सेक्समध्ये १०० अंकांची तेजी, निफ्टी २५,९०० च्या वर
11
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
12
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
13
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
14
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
15
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
16
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
17
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
18
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
19
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
20
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
Daily Top 2Weekly Top 5

१७ लाख व्यक्तींना रेशनचे धान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:00 IST

लॉकडाऊनदरम्यान नियमांचे पालन न करणाऱ्या २४७ प्रकरणात गुन्हा दाखल करून १३ लाख ३७ हजार ७० दंड वसूल करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५८ जणांना अटक झाली असून ७४९ वाहने जप्त केली. पुढील आदेशापर्यंत लॉकडाऊन जैसे थे राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.

ठळक मुद्देमुबलक धान्यसाठा : धान्य वितरणावर प्रशासनाकडून वॉच, पुढील आदेशापर्यंत लॉकडाऊन ‘जैसे थे’

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर: जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांना आतापर्यंत ९९ टक्के धान्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभ योजनेतंर्गत नियमित कुटुंबांचा समावेश आहे. प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ वाटपाचे कामही ९६ टक्के पूर्ण झाले आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत सुमारे १७ लाख व्यक्तींना धान्य वाटप केल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने रविवारी दिली.जिल्ह्यामध्ये एकूण ३ लाख ९३ हजार ६५६ कार्डधारक आहेत. राज्य शासनाच्या शिव भोजन योजनेतंर्गत जिल्ह्यात १६ ठिकाणी असाह्य, विमनस्क, निराधार, बेघर लोकांना तयार अन्नाचे वाटप केले जात आहे. उन्हाळ्यात उत्तम दर्जाचे अन्न द्यावे, असा सूचना शिव भोजन कंत्राटदारांना देण्यात आल्या. जिल्ह्यस्तील राशन दुकानातून धान्य तसेच विविध ठिकाणी सुरू असलेल्या शिव भोजन केंद्रातून दर्जेदार थाळी मिळाली नाही तर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांनी दिला. लॉकडाऊनदरम्यान नियमांचे पालन न करणाऱ्या २४७ प्रकरणात गुन्हा दाखल करून १३ लाख ३७ हजार ७० दंड वसूल करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५८ जणांना अटक झाली असून ७४९ वाहने जप्त केली. पुढील आदेशापर्यंत लॉकडाऊन जैसे थे राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.वाहनांची तपासणी करण्यासाठी पथकबल्लारपूर : शहरात लॉकडाऊनचे उल्लंघन होऊ नये, यासाठी दुचाकी वाहनांवरही बंदी करण्यात आली आहे. रेड झोनमधून शहरात प्रवेश करण्याऱ्या मालवाहू वाहनांच्या तपासणीकरिता बामणी टी पार्इंट तसेच पेपर मिल कलामंदिरजवळ तपासणी नाके उभारण्यात आले. शहरात प्रवेश करण्यापूर्वी मालवाहक वाहनांची तपासणी करून चालकाची संपूर्ण माहिती, वाहन कुठून निघाले व कुठे जाणार आहे, याची नोंद घेणे सुरू आहे. तपासणी नाक्यावर नगर परिषद, ग्रामीण रूग्णालय, तहसील कार्यालयाचे कर्मचारी व पोलीस तैनात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.तेलंगणातून आलेल्या १४ मजुरांचे क्वारंटाईनचंद्रपूर : तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथून छत्तीसगड राज्यातील बालाघाट येथे जाण्यासाठी छुप्या मार्गाने शहरात आलेल्या १४ मजुरांची मनपा प्रशासनाने तपासणी करून महात्मा जोतिबा फुले प्राथमिक शाळेत क्वारंटान्ईन केले. तेलंगणा राज्यात अन्नधान्य उपलब्ध न झाल्याने उपासमारीच्या भितीने बिऱ्हाड घेऊन मूळ गावाकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता, असे मजुरांचे म्हणणे आहे. छत्तीसगड राज्यातील हे मजूर २२ एप्रिल रोजी हैदराबाद येथून निघाले होते. यामध्ये महिला व मुलांचा समावेश आहे. हे मजूर परराज्यातून ग्रीन झोन असलेल्या चंद्रपुरातील पठाणपुरा येथील मंदिराजवळ छुप्या मार्गाने आले होते. नागरिकांनी मनपा प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर लगेच आरोग्य पथकाने हिवरपुरी परिसरातील हनुमान मंदिराजवळ तपासणी करून १४ जणांना महात्मा जोतिबा फुले प्राथमिक शाळेत क्वारंटान्ईन केले आहे.मोकाट जनावरांचे पाण्याअभावी हालघोडपेठ : लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत. नागरिकही घराबाहेर पडत नाहीत. सोबतच उन्हाचा पारा तापू लागल्यामुळे मोकाट भटक्या जनावरांचा पिण्याच्या पाण्यासाठी हाल सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी भटक्या व मुक्या जनावरांकरिता घराबाहेर पाणवठे तयार करावे, असे आवाहन मुरसा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांनी केले आहे.माहिती दडविल्याने चौघांविरूद्ध गुन्हाघुग्घुस : जिल्हा बंदीचे उल्लंघन करून माहिती दडवून ठेवणाऱ्या चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करून क्वारंटाईनसाठी चंद्रपूरला पाठविल्याची माहिती ठाणेदार राहुल गांगुर्डे यांनी दिली. रेड झोनमधून या जिल्ह्यात कुणीही येऊ नये, यासाठी पोलिसांकडून नाकाबंदी सुरू आहे.मास्क न घालणाऱ्हा ३२ जणांवर कारवाईचिमूर : मास्क न घालणाऱ्या ३२ जणांवर नगर परिषदने कारवाई करून त्यांच्याकडून ६ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल केला. तालुक्यात सर्वत्र धडक कारवाई मोहीम राबविण्यात येत आहे. कारवाई झालेल्यांमध्ये काही व्यावसायिकांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.२ हजार ९१९ व्यक्तींचे होम क्वारंटाईन पूर्णनागभीड : लॉकडाऊन काळात जिल्हाबाहेरून आलेल्या ३ हजार १४१ पैकी २ हजार ९१९ जणांचे होम क्वारंटाईन पूर्ण झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातून परत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींवर आरोग्य विभागाचे लक्ष ठेवले जात आहे. आरोग्य यंत्रणेमार्फत अशा व्यक्तींचा शोध घेऊन होम क्वारंटान्ईन केले जाते. सध्या २२२ जणांचे होम क्वारंटान्ईन सुरू आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस