शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. च्या १५५ शाळांमधील अंधार दूर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:30 IST

राजेश मडावी चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या १५५ शाळांमधील वीज बिल थकीत झाल्याने पुरवठा कायमस्वरूपी बंद आहे. बिल भरण्यासाठी ...

राजेश मडावी

चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या १५५ शाळांमधील वीज बिल थकीत झाल्याने पुरवठा कायमस्वरूपी बंद आहे. बिल भरण्यासाठी अन्य पर्यायच नसल्याने सांगून जि. प. ने हात वर केले. त्यामुळे अखेर राज्य शासनानेच सादील अनुदानातून ४ लाख १५ हजारांचा निधी गुरूवारी मंजूर केली. यातून शाळांचा अंधार दूर होणार आहे.

स्थानिक स्वराज संस्थांनी चालविलेल्या प्राथमिक शाळांना नियमित वीज पुरवठा करूनही बिल भरण्यात आले नाही. त्यामुळे वीज वितरण विभागाने या शाळांचा पुरवठा मागील वर्षाच्या शैक्षणिक सत्रातच खंडित केला होता शैक्षणिक उपक्रम

विजेअभावी शैक्षणिक उपक्रम राबविण्यास अडचणी आल्या. दरम्यान, मुख्याध्यापकांना समस्यांना तोंड द्यावे लागल्याने अनेक शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतींनी संयुक्त बैठका घेऊन वीज बिल भरण्यासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण, अपयश आले. जिल्हा परिषद शिक्षण विभागानेही हात वर केले. तेव्हापासून जिल्ह्यातील १५ प्राथमिक शाळा अंधारात आहेत. जि. प. ने शाळांना अनुदान देण्यास अपयशी ठरल्यानंतर राज्यातील अनेक जि. प. अध्यक्षांनीहा प्रश्न राज्य शासनाकडे मांडला. भौतिक, शैक्षणिक सुविधा व दैनंदिन उपयोगाचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी मागील वर्षीच्या वेत खर्चाच्या ४ टक्के सादीलवार खर्च करण्यास मान्यता देण्यात आली होती. अखेर जि. प. शाळांची अडचण लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने सादील खचार्चा पयार्य स्वीकारला. चंद्रपूर जिल्ह्यासाठी ४ लाख १५ हजारांचा निधी मंजूर झाला. हा निधी कायमस्वरूपी खंडित झालेल्या शाळांचे वीज बिल भरणा करण्यास वापरला जाणार आहे.

बॉक्स

असे आहे अनुदानाचे स्वरूप

वीज वितरण कंपनीकडून कायमस्वरूपी खंडित केलेल्या १५५ जि. प. शाळांचे वीज बिल सादील खचार्तून केल्या जाईल. एक हजार रूपये प्रति शाळा प्रति महिने मयार्देत इतर निधीतून बीेल भरले नसल्यास सादील अनुदानातून हा खर्च भागविता येणार आहे. शाळांनी देयक भरल्यानंतर वीज वितरणचे अधिकारी ही माहिती शिक्षण संचालकांना देतील.