शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

जि. प. अर्थसंकल्पात 24 कोटींना कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 05:00 IST

गतवर्षीच्या ६१ कोटी ७१ लाख ८६ हजार १२६ कोटींच्या सुधारित अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली. सन २०२२-२३ चा ३७ कोटी ३५ लक्ष ४० हजार ६८१ रुपयांचा अर्थसंकल्प सादर झाला. ३७ कोटी ३१ लक्ष ८८ हजार ७०० रुपयांचा खर्च वर्षभरात अपेक्षित असून, ३ लाख ५१ हजार ९८१ रुपये शिलकीची तरतूद या अर्थसंकल्पात केली. जल सिंचन पाणीकराचे  पैसे जिल्हा परिषदेला मिळाले नाही. त्यामुळे सुमारे २० ते २५   कोटीं उत्पन्न कमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदच्या उत्पन्नाचे स्रोत कमी झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत सन २०२२-२३ च्या मूळ अंदाजपत्रकात तब्बल २४ कोटींची तफावत आढळली. अर्थ समितीचे सभापती राजू गायकवाड यांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेत ३ लाखांच्या शिलकीसह ३७ कोटी ३५ लक्ष ४० हजार ६८१ रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला.  जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरुनुले यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, उपाध्यक्ष रेखा कारेकार, सभापती नागराज गेडाम, सुनील उरकुडे, रोशनी खान व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. सभेत सन २०२१-२२ चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०२२-२३ चा मूळ अर्थसंकल्प सादर केला. गतवर्षीच्या ६१ कोटी ७१ लाख ८६ हजार १२६ कोटींच्या सुधारित अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली. सन २०२२-२३ चा ३७ कोटी ३५ लक्ष ४० हजार ६८१ रुपयांचा अर्थसंकल्प सादर झाला. ३७ कोटी ३१ लक्ष ८८ हजार ७०० रुपयांचा खर्च वर्षभरात अपेक्षित असून, ३ लाख ५१ हजार ९८१ रुपये शिलकीची तरतूद या अर्थसंकल्पात केली. जल सिंचन पाणीकराचे  पैसे जिल्हा परिषदेला मिळाले नाही. त्यामुळे सुमारे २० ते २५   कोटीं उत्पन्न कमी झाले.उत्पन्नाचे स्रोत कमी असताना काही योजना कमी करण्याऐवजी तरतूदच कमी केल्याचा आरोप  काँग्रेसचे गटनेते डॉ. सतीश वारजूकर यांनी केला. चिमूरचे वादग्रस्त प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रमोद नाट प्रकरणावरून  जिल्हा परिषदेचे  सदस्य गजानन बुटके यांनी सभात्याग केला.

पालक गमावलेल्या बालकांना मिळणार १० हजार- कोरोनाकाळात ज्या मुलांनी पालक गमावले आहे, अशा बालकांना १० हजार रुपयांची मदत करण्याची तरतूद अर्थसंकल्पात केली. वन्यजीव-मानव संघर्ष टोकाला केला. .- उपाययोजनेसाठी २५ लाखांची तरतूद केली. वन्यप्राण्यांचे हल्ले आणि सर्पदंशाने जखमी व्यक्तीला व मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसदारांना मदत देण्यास ५ लाखांचा निधी राखीव ठेवला. 

 अशी आहे विभागनिहाय तरतूद         - बांधकाम विभागासाठी ७ कोटी ७ लक्ष २००, तर शिक्षण विभाग, ५ टक्के राखीव निधीसह २ कोटी ३००, आरोग्य विभाग १ कोटी ८६ लाख, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला २ कोटी ५ लाख, समाजकल्याण विभागासाठी २ कोटी ५ लाख,  ५ टक्के अपंग कल्याण निधी १ कोटी ११ लाख,  महिला व बालकल्याण विभाग १ कोटी ५० लाख,  सामान्य प्रशासन २ कोटी ५० लाख, पंचायत विभाग ७ कोटी ८७ लाख ३ हजार, सिंचाई विभाग २ कोटी, वित्त विभाग २ कोटी २८ लाख ३५ हजार २०० रुपयांची तरतूद करण्यात आली.   

 कोरोनाच्या काळात जिल्हा परिषदेचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले. त्यामुळे सन २०२२-२३ चे मूळ अंदाजपत्रक कमी किमतीचे झाले असले तरी काटकसर करून प्रत्येक विभागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. - संध्या गुरनुले, अध्यक्ष, जिल्हा परिषद, चंद्रपूर

जिल्हा परिषदेच्या उत्पन्नावर कोरोनामुळे परिणाम झाला. मात्र, सर्व विभागांना निधी मिळेल या दृष्टीने तरतुद करण्यात आली. - राजु गायकवाड, सभापती, अर्थ् समिती 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद