शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

पीआय राजपूत, पीएसआय वाकडेसह नऊ कर्मचाऱ्यांना महासंचालक सन्मानचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 7:24 PM

राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी २०२३ वर्षातील पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर केले आहेत. राज्यातील ८०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे पदक मिळाले आहे.

चंद्रपूर : जिल्हा पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील तत्कालीन पोलिस निरीक्षक, तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक, तसेच दोन सहायक पोलिस निरीक्षक व नऊ पोलिस हवालदारांना उल्लेखनिय कामगीरीबद्दल पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. यामुळे चंद्रपूर जिल्हा पोलिस दलाचा गौरव वाढला आहे. १ मे महाराष्ट्र दिनी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी २०२३ वर्षातील पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर केले आहेत. राज्यातील ८०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे पदक मिळाले आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्हा पोलिस दलातील १३ जणांचा समावेश आहे. यापैकी सन २०२३ मध्ये चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून असलेले तत्कालीन ठाणेदार सतीश सिंग रणजितसिंह राजपूत, तसेच चंद्रपूर भरोसा सेलमधील तत्कालिन पोलिस उपनिरीक्षक अश्विनी शामराव वाकडे (झाडे) यांनाही हे सन्मानचिन्ह मिळाले आहे. सद्य:स्थितीत या दोघांचीही जिल्हा बदली झाली आहे. यासोबतच सपो उपनिरीक्षक राजेंद्र किसान तुमसरे, सपो उपनिरीक्षक गुलाब रामचंद्र बल्की, तसेच पोलिस हवालदार विक्रम व्यंकटराव नवरखेडे, नईमखान ताजमहम्मद खान, शकील गुलाब शेख, लक्ष्मण नानाजी धांडे, अर्जुन भिवा मडावी, नागो लहानुजी दाहागांवकर, गणेश विष्णूजी मेश्राम, मंगेश वामनराव मत्ते, महिंद्र खुशालराव बेसरकर यांनाही पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह मिळाले आहे. यामुळे चंद्रपूर जिल्हा पोलिस दलाचा गौरव वाढला आहे.कुणाला मिळते पदकमहाराष्ट्र पोलिस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गांमध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनीय, प्रशंसनीय सेवेबद्दल महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळत असते. चंद्रपुरातील वरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियुक्तीपासून आजपर्यंत केलेल्या कामगिरीच्या आधारावर हे पदक जाहीर झाले आहेत. पोलिस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे यांनी भरोसा सेलमध्ये जिल्ह्यात गौरवपूर्ण कामगिरी करून अनेक मोडणारे संसार फुलविले आहेत, तसेच बऱ्याच पोस्को गुन्ह्यांमध्ये त्यांनी गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. यासोबतच जास्तीत जास्त गुन्हे दोषसिद्धी केल्यामुळे प्रवर्ग ३ नुसार त्यांना सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. तसेच ठाणेदार सतीश सिंग रणजितसिंह राजपूत यांनीसुद्धा शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हेगारीवर अंकूश लावण्यात यश मिळविले होते. दोघांनीही केलेली कामगिरी उल्लेखनीय असल्याने त्यांना सन्मानचिह जाहीर झाले आहे.