शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कांदा लागवडीतून ’गुणवंत’ला मिळाली दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 00:47 IST

मनात यशाची जिद्द व तळमळ असली तर अनेक अडचणींवर मात करून प्रगतीच्या संधी निर्माण करता येतात. नोकरीच्या शोधात आयुष्य घालवून निराश होण्यापेक्षा आपली शेती बरी हा विचार करणारे युवक कमीच आहेत.

ठळक मुद्देबेरोजगारांना प्रेरणा : आष्टा येथील युवकाने दिला पारंपरिक शेतीला फ ाटा

विराज मुरकुटे ।लोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्णा : मनात यशाची जिद्द व तळमळ असली तर अनेक अडचणींवर मात करून प्रगतीच्या संधी निर्माण करता येतात. नोकरीच्या शोधात आयुष्य घालवून निराश होण्यापेक्षा आपली शेती बरी हा विचार करणारे युवक कमीच आहेत. मात्र, आष्टा गावातील गुणवंत भालचंद्र या उच्च शिक्षित युवकाने पारंपरिक शेती टाळून कांदा लागवडीचा मार्ग स्वीकारला.गुणवंत भालचंद्र मोरे यांनी शेती व्यवसायालाच केंद्रबिंदू मानले. गुणवंतला चक पोंभुर्णा शिवारात पाच एकर शेती आहे. यापैकी केवळ अर्धा एकरात महाबिजकडून ‘किरण’ नावाचे कांदा बियाणे लागवड करून नवा मार्ग स्वीकारला. रासायनिक खताचा वापर न करता केवळ सेंद्रिय बॉयोडॉयनॉमिक खताचा वापर केला. हा कांदा लाल रंगाचा असून पीक मोठ्या डौलाने उभे आहे. कांद्याची शेती ते चार वर्षांपासून करीत आहेत. त्यासोबतच भेंडी, धान, हरभरा, कोंथीबीर व भाजीपाला पिकांचे ेउत्पादनही घेत आहे. त्यांना कुटुंबियाचीही मदत आहे.शासनाकडून सिंचनाची योजना नसताना केवळ शेतातीलच छोट्याशा विहिरीतूनच पाणी दिले जात आहे. त्यांनी तुषार सिंचन लावला असून दरवर्षी समाधानकारक पीक हाती येत आहे. अर्ध्या एकरात दरवर्षी ४० क्विंटल कांद्याचे उत्पादन होत आहे. आतापर्यंत ८० हजार किंमतीचे उत्पन्न गुणवंतला मिळाले आहे. सहा ते सात हजारांचा खर्च वजा केल्यास ७३ हजारांचा नफा मिळाला, अशी माहिती गुणवंतने दिली.कांदा लागवडीसाठी कृषी कार्यालय पोंभुर्णा येथून बियाणे मिळविले. यासाठी कृषी सहायक ए. डी. ताले यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे. कांदा उत्पादन निघाल्यानंतर पोंभुर्णा येथील बाजारपेठ व सोबतच जिल्ह्यातील तालुका बाजारातही लाल कांद्याची विक्री केली जात आहे. कांदा लागवडीची ही शेती अन्य शेतकऱ्यांनाही प्रेरणादायी आहे.केवळ पारंपरिक पीक न घेता बदलत्या काळानुसार शेती केल्यास अडचणीवर मात करता येवू शकते. त्यासाठी मानसिकतेमध्ये बदल करावा. शासनाच्या योजनांचाही लाभ घ्यावा, अशी प्रतिक्रि या गुणवंतने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.बॉयोडायनॅमिक खत म्हणजे काय?पीक काढल्यानंतर शेतात तणस लाखोळीचे कुटार, गव्हांडा, घसकट व शेतातून निघालेला काडीकचरा एकत्र कुजविल्यास बॉयोडायनॅमिक सेंद्रिय खत तयार होते.

टॅग्स :onionकांदा