शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
2
आशिष शेलार मुंबई, शिरीष बोराळकर छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष; भाजपाकडून ८१ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर
3
मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
4
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
5
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
7
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
8
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
9
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
10
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
11
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
12
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
13
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
14
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
15
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
16
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
17
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
18
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
19
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
20
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती

जिल्हा स्वच्छतेसाठी कुटुंबाशी संवाद

By admin | Updated: August 22, 2016 01:51 IST

स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेची लोकचळवळ व्हावी,

२२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर : पदाधिकारी अधिकारी कर्मचारी होणार सहभागीचंद्रपूर : स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेची लोकचळवळ व्हावी, यासाठी २२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर २०१६ या कालावधीत कुटुंबस्तर संवाद अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात २२ आॅगस्टला मूल तालुक्यातील डोंगरगाव येथे जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले व मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी. सिंह यांच्या हस्ते होणार आहे.राज्यस्तरावरुन राज्यात कुटुंबस्तर संवाद अभियान राबवून शाश्वत्य गृहभेटींचा कार्यक्रम आखण्याच्या सुचना प्रत्येक जिल्हा परिषदला निर्गमित झाल्या आहेत. या अभियाना अंतर्गत भेटी दरम्यान कुटुंबस्तरावर शौचालयाचे महत्त्व पटवून देणे, शौचालयाचा वापर हा संस्कृती आणि सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण असून ही जाणीव करून देणे, उघड्यावरची शौचविधीची प्रथा हद्दपार करण्यासाठी या अभियानाद्वारे गावागावात लोकचळवळ उभी करून शाश्वत स्वच्छता व आरोग्यदायी वातावरण निर्माण करायचे आहे.या अभियानात सन २०१६-१७ या वर्षात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत २७३ ग्रामपंचायती, चार तालुके ब्रह्मपुरी, मूल, पोंभूर्णा व चंद्रपूर पूर्णत: हागणदारी मुक्त करण्याचे ठरविण्यात आले आहे. गृहभेटीचा उपक्रम याच ग्रामपंचायतीमध्ये प्रामुख्याने राबविण्यात येणार आहे. अभियानात जिल्हा परिषदेच्या विविध विभाग, सर्व गटविकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, शिक्षण, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामसेवक, जिल्हा, पंचायत समिती, ग्रामस्तरावरील सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी कुटुंबस्तर संवाद अभियानात सहभागी होऊन जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या स्वच्छतेच्या चळवळीचा भाग बनविण्यात येईल. (प्रतिनिधी)४५ हजार घरांना भेटीजिल्ह्यात ४५ हजार घरांना भेटी दिल्या जाणार आहे. या अभियानात ग्रामीण पाणी पुरवठा, शिक्षण आरोग्य, महिला व बालकल्याण, पंचायत, कृषी, नरेगा, एमएसआरएलएम या विभागांच्या समन्वयातून राबविण्यात येणार आहे. हे अभियान जिल्हा, तालुका ग्रामस्तरावरील लोकप्रतिनिधी, विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, खासगी उद्योजक इत्यादी घटकांना सहभागी करण्यात येणार व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर या अभियानाद्वारा स्वच्छतेची चळवळ निर्माण करून गृहभेटीतन शाश्वत जनसंवाद घडवून आणण्यात येणार आहे.