शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

ढोरवासा कोळसा खाणीतील ढिगारे कोसळले

By admin | Updated: July 1, 2014 01:23 IST

तालुक्यातील माजरी क्षेत्रातील ढोरवासा खुल्या कोळसा खाणीत रविवारी सकाळी ११ वाजता ओबीचे ढिगारे २०० ते ३०० फूटावरुन कोसळले. त्यामुळे कामगारांत एकच खळबळ उडाली. दुसऱ्या पाळीचे

भद्रावती : तालुक्यातील माजरी क्षेत्रातील ढोरवासा खुल्या कोळसा खाणीत रविवारी सकाळी ११ वाजता ओबीचे ढिगारे २०० ते ३०० फूटावरुन कोसळले. त्यामुळे कामगारांत एकच खळबळ उडाली. दुसऱ्या पाळीचे कामगार कामाला सुरूवात करण्यापूर्वी ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला. पुन्हा एकदा उत्पादनाच्या लालसेपोटी कामगारांचा सुरक्षेचा कुठलाही विचार होत नसल्याचे या घटनेवरून दिसून येते.ढोरवासा खुल्या कोळसा खाणीला २००४ मध्ये उत्खननाची परवानगी मिळाली. तिचा १० वर्षांचा उत्खननाचा काळ नुकताच संपला. आता नव्याने उत्खननाचे काम वेकोलिने हाती घेतले. या खाणीत तब्बल ३५० कामगार काम करत आहेत. येथील क्षेत्र प्रबंधक व खाण प्रबंधक वरिष्ठ अधिकाऱ्यांना खूष ठेवण्यासाठी खाणीतील कोळशाचे उत्खनन क्षमतेपेक्षा जास्त करुन उत्पादनात आपण अव्वल असावे, या बेतात असतात. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेचा विचार न करता या अधिकाऱ्यांकडून नेहमीच आपले हित साधण्याच्या प्रयत्न केला जातो. याचे परिणाम मात्र कामगारांना भोगावे लागतात. सन २००० मध्ये माजरी क्षेत्रातील कावळी येथील अशाच दुर्घटनेत अधिकाऱ्यांचा दुर्लक्षतेमुळे मातीचे ढिगारे कोसळले होते. त्यात १० कामगारांना प्राण गमवावे लागले. असे असताना सुरक्षा सप्ताहाचे बेगडी कार्यक्रम घेवून अधिकारी दिशाभूल करीत असतात. मात्र कामगारांच्या सुरक्षेची हमी घेतली जात नाही.या खाणीतील ३५० कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी येथील क्षेत्र प्रबंधक आर. पी. सिंग, खाण प्रबंधक आर. पी. सिन्हा यांच्यावर असतानासुद्धा या खाणीत क्षमतेपेक्षा मोठमोठे ओबीचे ढिगारे रचले आहे. यामुळे होणाऱ्या दुर्घटनेचा त्यांनी विचारसुद्धा केला नाही. काही कामगार संघटनांनी याओबीच्या ढिगाऱ्याबाबत क्षेत्र प्रबंधकांना लेखी सूचना केल्या आहे. मात्र त्या विचारात न घेतल्याने ढिगारे कोसळण्याचा प्रकार घडला. २९ जूनला दुसऱ्या पाळीचे काही कामगार कामावर जाण्याच्या बेतात असताना हा प्रकार घडला. तब्बल २०० ते ३०० फुटावरील ओबीचा ढिगारा खाणीत कोसळला . क्षणाचाही विलंब झाला असता तर मोठी दुर्र्घटना घडली असती. खाणीत उभे करण्यात आलेले मोठ-मोठे ओबीचे ढिगारे कोसळल्याने वेकोलिचे कोळसा उत्पादनाचे काम ठप्प झाले आहे. (शहर प्रतिनिधी)