शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

तालुक्यात धामधूम, नागभीडमध्ये सामसूम

By admin | Updated: July 7, 2015 01:03 IST

गेल्या काही दिवसांपासून नागभीड तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची धामधुम सुरु असली तरी नागभीडमध्ये मात्र सामसूम आहे

राजकीय नेत्यांमध्ये संभ्रम : नागभीडला नगरपंचायत, नगरपालिका की ग्रामपंचायत ?नागभीड: गेल्या काही दिवसांपासून नागभीड तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची धामधुम सुरु असली तरी नागभीडमध्ये मात्र सामसूम आहे. नागभीडमध्ये निवडणूक आहे की नाही अशी संभ्रमावस्था या वातावरणामुळे निर्माण झाली आहे.निवडणूक ही लोकशाहीचा उत्सव असते, असे म्हणतात. आणि म्हणूनच निवडणूक म्हटले की या लोकशाहीचे पाईक खडबडून जागे होतात. गेल्या अनेक निवडणुकींचा अनुभव लक्षात घेतला तर हेच लक्षात येते. किंबहुणा निवडणुकीच्या एक दोन महिन्याअगोदर पासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात व्हायची. पण या वेळेस निवडणूक अगदी टप्प्यात येऊनही येथे शांतताच दिसत आहे. येथे ऐन निवडणुकीच्या वेळी शांतता असल्याचे कारण म्हणजे नागभीडमध्ये नगरपंचायत अस्तित्वात येईल की नगरपालिका होईल, याबाबतची संभ्रमावस्था आहे. राज्य शासनाच्या एका धोरणात्मक निर्णयानुसार नागभीडला नगरपंचायतीचा दर्जा मिळणारच आहे. पण १५ जूनच्या नगरविकास विभागाच्या एका निर्णयानुसार नागभीड नगरपरिषदेची उद्घोषणाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. आणि यावर आक्षेप घेण्याची मुदत १४ जुलै रोजी संपत आहे.एकीकडे निवडणूक आयोगाने आपल्या कार्यक्रमानुसार येथील ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला असला तरी या निवडणुकीबद्दल इच्छुकांत फारसा उत्साह दिसून येत नाही. औपचारिकता म्हणून ते नामनिर्देशन दाखल करतीलही. पण ते तेवढ्यापुरतेच. कारण चार महिन्याअगोदर गडचिरोली जिल्ह्यात अशाच प्रकारे तेथील तालुका स्थळांचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला. इच्छुकांनी नामनिर्देशन दाखल केले. प्रचार केला आणि ऐन निवडणुकीच्या आदल्या दिवशी नगरपंचायतीची घोषणा करुन ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली.नेमकी हीच वेळ नागभीडवर येऊ शकते, असे येथील अनेक इच्छुकांना वाटत आहे. किंवा निवडणुक पार पडल्यानंतर चार सहा महिन्यानंतरही ही वेळ येणारच आहे. मात्र औटघटकेच्या कालावधीसाठी कशाला वेळ आणि पैशाचा अपव्यय करायचा, अशी विचारधारा येथील बहुतेक इच्छुकांत सुरु असून नगर परिषद किंवा नगरपंचायत घोषित झाल्यानंतरच काय तो दम दाखवू, असे येथील इच्छुकांत बोलले जात आहे.मात्र दुसरीकडे तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र या निवडणुकीची चांगलीच धामधुम सुरु आहे. एकूण ६५ पैकी ४८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका यावेळी होत आहेत. त्यामुळे तालुक्यात सार्वत्रिक निवडणुकीचे चित्र निर्माण झाले आहे. निवडणूक गावात होत असली तरी गावातील कार्यकर्त्यांचे तालुक्यातील नेत्यांशी संबंध असल्याने गावस्तरावरील कार्यकर्ते आपल्या वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करीत असल्याचे चित्र अनेकदा अनुभवास येत आहे. तालुक्यातील नेतेही आपले कार्यकर्ते कुठे कमी पडू नयेत यासाठी सूचना देत आहेत. (तालुका प्रतिनिधी)या ग्रामपंचायतीकडे लक्षआरक्षणावरुन गोंधळ निर्माण झालेल्या मौशी कोर्धा, त्रिकेश्वर या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे. या गावातील सरपंचपद हे विशिष्ट प्रवर्गासाठी आरक्षित असले तरी या प्रवर्गाचे सदस्यपद या गावात आरक्षित नाही. या गावातील सरपंचपदी विराजमान होणाऱ्या व्यक्तीला खुल्या प्रवर्गातूनच निवडणून यावे लागणार आहे.आॅनलाईनबद्दल उत्सुकतायावेळी ग्रामपंचायत निवडणुकीचे नामांकण प्रथमच आॅनलाईन भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात याबद्दल उत्सुकता दिसत आहे. आॅनलाईन फार्म भरणे असल्यामुळे इंटरनेट कॅफेंना सुगीचे दिवस आहेत.