शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

इंटरनेट जोडणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:59 IST

तालुक्यातील ग्रामपंचायतींना इंटरनेट जोडणीचे काम महाआयटीमार्फत सुरू आहे. केबल टाकण्यासाठी कंत्राटदाराने शेतकऱ्यांच्या शेताच्या मध्यभागातून खोदकाम सुरू केले आहे. त्यामुळे धाबा - गोंडपिपरी मार्गावरील शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त होत असल्याने कंत्राटदारावर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देकंत्राटदाराचा मनमानी कारभार : कारवाईची करण्याची शेतकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : तालुक्यातील ग्रामपंचायतींना इंटरनेट जोडणीचे काम महाआयटीमार्फत सुरू आहे. केबल टाकण्यासाठी कंत्राटदाराने शेतकऱ्यांच्या शेताच्या मध्यभागातून खोदकाम सुरू केले आहे. त्यामुळे धाबा - गोंडपिपरी मार्गावरील शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त होत असल्याने कंत्राटदारावर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.गोंडपिपरी तालुक्यातील ग्रामपंचायतींना उच्च क्षमतेच्या इंटरनेट जोडणीचे काम सुरू आहे. त्यासाठी कंत्राटदाराने शेतकऱ्यांना पूर्वसुचना न देता केबल टाकण्यासाठी शेताच्या मध्य भागातून खोदकाम करण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यामुळे धानगाठे भुईसपाट होत असून जमिनी उद्ध्वस्त होत आहे व शेताच्या मध्यभागातच मातीचे ढिगारे तयार होत आहेत.या बेजबाबदार कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी कमालीचे त्रस्त झाले असून त्यांना आपल्या हंगामासाठी जमीन सपाट करण्यासाठी मोठी मेहनत करावी लागणार आहे. आज विहीरगावातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी एकत्र येत खोदकाम बंद केले आहे.रस्त्याच्या मध्य भागापासून १२ मीटरच्या आत खोदकाम करणे अपेक्षित होते. मात्र संबंधित कंत्राटदाराने शेताच्या मध्य भागातूनच खोदकाम केल्याने आमच्या शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.-नानाजी धुडसे, शेतकरी विहीरगावशेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस व पुर्वसुचना न देता शेतकऱ्यांच्या शेतात खोदकाम करणे हे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. त्यामुळे कंत्राटदारावर कारवाई होणे गरजेचे आहे.-संतोष बंडावार अध्यक्ष,तालुका यु.कॉं. कमेटी गोंडपिपरीरस्त्याच्या मध्यभागापासून खोदकाम हे नियमानुसार नऊ ते बारा मीटरपर्यंत करता येते. मात्र यापेक्षाही जास्त दूरवरून खोदकाम करणे हे चुकीचे आहे.-रमेश शंभरकर, उपविभागीय अभियंतासा.बां. विभाग, गोंडपिपरी

टॅग्स :InternetइंटरनेटFarmerशेतकरी