शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
3
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
4
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
5
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
6
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
7
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
8
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
9
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
10
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
11
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
12
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
13
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
14
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
15
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
16
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
17
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
18
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

धरणात पाणी असतानाही चंद्रपुरात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 23:02 IST

उन्हाळ्यात इरई धरणातील अत्यल्प जलसाठा बघता महानगरपालिकेच्या वतीने शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला. मात्र आता बऱ्यापैकी पाऊस होऊन धरणातही ७० टक्के पाणी जमा झाले. तरीही महानगपालिकेकडून चंद्रपूरकरांना एक दिवसाआडच पाणी दिले जात आहे. मनपाने निर्माण केलेल्या या कृत्रिम पाणी टंचाईमुळे नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देनागरिकांत संताप : अद्यापही सुरू आहे दिवसाआड पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उन्हाळ्यात इरई धरणातील अत्यल्प जलसाठा बघता महानगरपालिकेच्या वतीने शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला. मात्र आता बऱ्यापैकी पाऊस होऊन धरणातही ७० टक्के पाणी जमा झाले. तरीही महानगपालिकेकडून चंद्रपूरकरांना एक दिवसाआडच पाणी दिले जात आहे. मनपाने निर्माण केलेल्या या कृत्रिम पाणी टंचाईमुळे नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.चंद्रपुरातील पाणी पुरवठ्याचे खासगीकरण करण्यात आले आहे. उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीला पाणी पुरवठ्याचे कंत्राट देण्यात आले आहे. चंद्रपुरात नेहमीच पाणी पुरवठ्यात अनियमिता राहिली आहे. वितरण व्यवस्थाच अस्तित्वात आहे की नाही, असे वाटावे, इतकी गंभीर स्थिती पाणी पुरवठ्याची आहे. मागील दहा वर्षात याच सुधार होऊ शकला नाही. त्यामुळे दरवर्षीच चंद्रपुरात पाण्यासाठी बोंबा मारल्या जातात.चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जातो. मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने इरई धरणात पाणी संचय होऊ शकला नाही. त्यामुळे हिवाळ्यात इरई धरणाचा जलसाठा चिंताजनक स्थितीत होता. हिवाळा संपत असताना केवळ ३५ टक्केच जलसाठा धरणात होता. त्यामुळे उन्हाळ्यात चंद्रपूरकरांचे पाण्यासाठी हाल होतील, हे निश्चित होते. ही परिस्थिती लक्षात घेता महानगरपालिका प्रशासनाने चंद्रपुरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. १ एप्रिलपासून चंद्रपूर शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाऊ लागला.मात्र यावर्षी पावसाळ्यात बºयापैकी पाऊस पडत आहे. इरई धरणातही ७५ टक्क्याहून अधिक जलसाठा आहे. तरीही महानगरपालिकेने पाणी पुरवठा नियमित केला नाही. पावसाळा संपायला आला तरी चंद्रपूकरांना एक दिवसाआडच पाणी दिले जात आहे. त्यामुळे नागरिकांना अकारण भर पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मनपा केव्हा झोपेतून जागी होईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकूणच मनपाच्या या प्रकारामुळे चंद्रपूरकर कमालीचे संतापलेले आहेत.पर्यायी उपाययोजना करण्याची मागणीपाणीपुरवठाही कमीशहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात सध्या मुबलक पाणीसाठा असला तरी पाणी पुरवठा करताना तो मुबलक केला जात नाही. कुठे एक तास तर कुठे त्याहून कमी पाणी येते. त्यातही धारही मोठी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठे हाल सहन करावे लागत आहे. विशेष म्हणजे, नळ आल्यानंतर प्रारंभी काही वेळ दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी वापरता येत नाही. काही भागात तर केवळ अर्ध्या तासातच नळाची धार गुल होते, अशाही तक्रारी आहेत.अनेक भागात चार-पाच दिवसाआड पाणीउन्हाळ्यात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला असला तरी चंद्रपुरातील बाबुपेठमधील अनेक भागात तीन ते चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. यासोबतच पठाणपुरा, विठ्ठलमंदिर वॉर्ड, नगिनाबाग आदी भागातही अनियमित पाणी पुरवठा होत आहे.आता तरी पाईपलाईन बदलवाचंद्रपूर शहराची लोकसंख्या साडेचार लाखांच्या घरात गेली आहे. चंद्रपुरातील महानगरपालिका अस्तित्वात आल्यामुळे पुढे आणखी शहराच्या सीमा वाढणार आहे. असे असले तरी या शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन ५० ते ६० वर्ष जुनी आहे. आता ती अत्यंत खिळखिळी झाली असून मनपा प्रशासनानेही ती कालबाह्य झाली असल्याचे मान्य केले आहे. असे असतानाही अद्याप ती बदलविण्यात आलेली नाही. या खिळखिळ्या पाईपलाईनमुळे अनेक वेळा तांत्रिक बिघाड होऊन पाणी पुरवठा ठप्प पडतो. आता तरी ही पाईपलाईन बदलविणे गरजेचे झाले आहे.इरई धरणाची पाहणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच या संदर्भात एक बैठक घेऊन चंद्रपुरात दररोज पाणी पुरवठा केला जाईल.-अंजली घोटेकर,महापौर, महानगरपालिका, चंद्रपूर.