शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रामाळा तलावाचे खोलीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 06:00 IST

दोन महिन्याच्या कालावधीत रामाळा तलावातील लिकेजेसमुळे पाण्याची पातळी खालावली. या तलावाचे खोलीकरण करण्यास व तलावातील गाळ काढण्यासाठी उद्योगांनी सामाजिकदायित्व निधीतून निधी उपलब्ध करून द्यावा. रामाळा तलावाच्या सौदर्यीकरणाचा प्रस्तावही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

ठळक मुद्देइको-प्रो ची मागणी : जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गोंडकालीन ऐतिहासिक रामाळा तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरणाची मागणी इको-प्रो ने जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.दोन महिन्याच्या कालावधीत रामाळा तलावातील लिकेजेसमुळे पाण्याची पातळी खालावली. या तलावाचे खोलीकरण करण्यास व तलावातील गाळ काढण्यासाठी उद्योगांनी सामाजिकदायित्व निधीतून निधी उपलब्ध करून द्यावा. रामाळा तलावाच्या सौदर्यीकरणाचा प्रस्तावही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. खनिज विकास निधीतून या प्रस्तावाला मंजुरी प्रदान करून हा प्रश्न तातडीने निकाली काढल्यास तलावाच्या विकासाला गती येईल. २००८ रोजी रामाळा तलावात इकॉर्निया वनस्पतीने थैमान मांडले होते. त्यावेळी इको-प्रो व अन्य संस्थांनी रामाळा तलाव स्वच्छता अभियान सुरू केले. या अभियानाला प्रशासनानेही मदत केली. नागरिकांनी श्रमदानातुन रामाळा तलावाची स्वच्छ केली. मात्र वेळ व निधीच्या कमतरतेमुळे खोलीकरणाचा प्रश्न सुटला नाही. यंदा तलावातील पाणी कमी होत आहे. जिल्हा प्रशासनाने निधीची तरतूद करून खोलीकरणाच्या कामाला सुरूवात केल्यास सामाजिक संस्थाही पुढे येऊ शकतात, असा आशावाद इको-प्रो चे बंडु धोतरे यांनी निवेदनातून व्यक्त केला आहे.पश्चिम दिशेला उभारा संरक्षण भिंततलावानजीक राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तलावातील पाणी शुद्ध राहावे, यासाठी वॉटर ट्रिटमेंट प्लांट बसवावे, रेल्वे मालधक्कावरून रासायनिक खताची आवक-जावक सुरू असते. जमिनीवर पडणारे युरीया, सल्फेट सारखे खत पावसाच्या पाण्यासोबत वाहुन रामाळा तलावात येतात. पश्चिम दिशेला अतिक्रमण वाढले. त्यामुळे संरक्षण भिंत उभारण्याची मागणीही इको- प्रोने केली आहे.

टॅग्स :Waterपाणी