शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी! ब्रह्मपुरी नवीन जिल्हा व्हावा का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 15:20 IST

नागरिकांना प्रतीक्षाच : चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होणार की नाही?

रवी रणदिवे लोकमत न्यूज नेटवर्क ब्रह्मपुरी : सध्या सोशल मीडियावर २१ नवीन जिल्हे होण्याच्या मागणीला उधाण आले आहे. या मागणीला शासन स्तरावर कितपत सत्यता आहे, हे जरी कळले नसले तरी ब्रह्मपुरी जिल्ह्याच्या मागणीला पुन्हा एकदा पेव फुटले आहे. ब्रह्मपुरी परिसरातील नागरिकांनी वारंवार ही मागणी रेटून धरली आहे. मात्र अजूनही शासन याकडे सकारात्मक बघत नसल्याने या मागणीचे भिजत घोंगडेच आहे.

१९८२ पासून ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी केली जात आहे. गडचिरोली जिल्हा होताना ब्रह्मपुरीचे नाव अग्रक्रमावर होते. परंतु रात्री नाव बदलून गडचिरोली जिल्हा नव्याने घोषित करण्यात आला होता. ब्रह्मपुरी हे ठिकाण चंद्रपूर जिल्ह्याच्या टोकावर असून १२५ किलोमीटर अंतरावर आहे. नागरिकांना शासकीय व निमशासकीय कामकाजाकरिता मोठ्या पल्ल्याचा सामना करावा लागत आहे. या गैरसोयीची दखल घेऊन चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करण्यात यावे व नव्याने ब्रह्मपुरी जिल्हा घोषित करण्यात यावा, ही मागणी गेली अनेक वर्षांपासून रेंगाळत आहे. या मागणीसाठी प्रसंगी आंदोलने चक्काजाम, ब्रह्मपुरी बंद, मुंडण आंदोलन, अशा प्रकारचे आंदोलन करूनसुद्धा शासन स्तरावर कुठल्याही हालचाली झाल्या नाही. प्रसंगी या साऱ्या प्रकारामुळे ब्रह्मपुरीकर निराश झाले. ६० किमी अंतरावर आहे ब्रह्मपुरीपासून गडचिरोली शहर. त्यामुळे जिल्हा न झाल्यास ब्रह्मपुरी गडचिरोली जिल्ह्यात समाविष्ट करावे.

ब्रह्मपुरी सर्व प्रकारे जिल्ह्यासाठी अनुकूल ब्रह्मपुरी हे ठिकाण शैक्षणिक, आरोग्य विषयक, व्यापार, दळणवळण, इमारती, खुली जागा या सर्व वैशिष्ट्याने जिल्ह्यासाठी सज्ज आहे. तरी ब्रह्मपुरीला वारंवार जिल्ह्याच्या यादीतून वगळले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. ब्रह्मपुरीपेक्षा छोट्या शहराला यापूर्वी जिल्हे म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र ब्रह्मपुरीवर राजकीय उदासीनता दिसून येत आहे.

जिल्ह्यासाठी प्रतीक्षा अजूनही कायम ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी अजूनही प्रतीक्षा कायम आहे. येथील काही नागरिकांनी एकत्र येऊन कृती समिती निर्माण करून पुन्हा लढा देण्याविषयी चर्चा केल्या जात आहे. अभी नहीं तो कभी नही, असाही नारा दिला जात आहे. सोशल मीडियावरची पोस्ट पाहून पुन्हा ब्रह्मपुरीकर सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत. जुन्या मागणीला नवीन ताकद देऊन जिल्ह्यासाठी लढा कायम ठेवण्याचा निर्धार जिल्हा निर्माण कृती समितीने केला आहे.

 

 

  • ब्रह्मपुरी जिल्हा जर होत नसेल तर ब्रह्मपुरी तालुका हे ठिकाण गडचिरोली जिल्ह्यात समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. 
  • ब्रह्मपुरीपासून चंद्रपूर १२५ 3 किलोमीटर तर गडचिरोली फक्त ६० किलोमीटर अंतरावर आहे. तसेच वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने गडचिरोली हे ठिकाण सोयीचे आहे. चंद्रपूरला जाण्यासाठी लागणारा वेळ व गडचिरोलीला जाण्यासाठी लागणारा वेळ याच्यात निम्मा वेळ लागत असून वेळ व पैशाची ही बचत होते. 
  • ब्रह्मपुरी तालुक्याला गडचिरोलीत समाविष्ट केल्यास नागरिकांना समाधान वाटेल.

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरbramhapuri-acब्रह्मपुरी