शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी! ब्रह्मपुरी नवीन जिल्हा व्हावा का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 15:20 IST

नागरिकांना प्रतीक्षाच : चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होणार की नाही?

रवी रणदिवे लोकमत न्यूज नेटवर्क ब्रह्मपुरी : सध्या सोशल मीडियावर २१ नवीन जिल्हे होण्याच्या मागणीला उधाण आले आहे. या मागणीला शासन स्तरावर कितपत सत्यता आहे, हे जरी कळले नसले तरी ब्रह्मपुरी जिल्ह्याच्या मागणीला पुन्हा एकदा पेव फुटले आहे. ब्रह्मपुरी परिसरातील नागरिकांनी वारंवार ही मागणी रेटून धरली आहे. मात्र अजूनही शासन याकडे सकारात्मक बघत नसल्याने या मागणीचे भिजत घोंगडेच आहे.

१९८२ पासून ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी केली जात आहे. गडचिरोली जिल्हा होताना ब्रह्मपुरीचे नाव अग्रक्रमावर होते. परंतु रात्री नाव बदलून गडचिरोली जिल्हा नव्याने घोषित करण्यात आला होता. ब्रह्मपुरी हे ठिकाण चंद्रपूर जिल्ह्याच्या टोकावर असून १२५ किलोमीटर अंतरावर आहे. नागरिकांना शासकीय व निमशासकीय कामकाजाकरिता मोठ्या पल्ल्याचा सामना करावा लागत आहे. या गैरसोयीची दखल घेऊन चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करण्यात यावे व नव्याने ब्रह्मपुरी जिल्हा घोषित करण्यात यावा, ही मागणी गेली अनेक वर्षांपासून रेंगाळत आहे. या मागणीसाठी प्रसंगी आंदोलने चक्काजाम, ब्रह्मपुरी बंद, मुंडण आंदोलन, अशा प्रकारचे आंदोलन करूनसुद्धा शासन स्तरावर कुठल्याही हालचाली झाल्या नाही. प्रसंगी या साऱ्या प्रकारामुळे ब्रह्मपुरीकर निराश झाले. ६० किमी अंतरावर आहे ब्रह्मपुरीपासून गडचिरोली शहर. त्यामुळे जिल्हा न झाल्यास ब्रह्मपुरी गडचिरोली जिल्ह्यात समाविष्ट करावे.

ब्रह्मपुरी सर्व प्रकारे जिल्ह्यासाठी अनुकूल ब्रह्मपुरी हे ठिकाण शैक्षणिक, आरोग्य विषयक, व्यापार, दळणवळण, इमारती, खुली जागा या सर्व वैशिष्ट्याने जिल्ह्यासाठी सज्ज आहे. तरी ब्रह्मपुरीला वारंवार जिल्ह्याच्या यादीतून वगळले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. ब्रह्मपुरीपेक्षा छोट्या शहराला यापूर्वी जिल्हे म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र ब्रह्मपुरीवर राजकीय उदासीनता दिसून येत आहे.

जिल्ह्यासाठी प्रतीक्षा अजूनही कायम ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी अजूनही प्रतीक्षा कायम आहे. येथील काही नागरिकांनी एकत्र येऊन कृती समिती निर्माण करून पुन्हा लढा देण्याविषयी चर्चा केल्या जात आहे. अभी नहीं तो कभी नही, असाही नारा दिला जात आहे. सोशल मीडियावरची पोस्ट पाहून पुन्हा ब्रह्मपुरीकर सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत. जुन्या मागणीला नवीन ताकद देऊन जिल्ह्यासाठी लढा कायम ठेवण्याचा निर्धार जिल्हा निर्माण कृती समितीने केला आहे.

 

 

  • ब्रह्मपुरी जिल्हा जर होत नसेल तर ब्रह्मपुरी तालुका हे ठिकाण गडचिरोली जिल्ह्यात समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. 
  • ब्रह्मपुरीपासून चंद्रपूर १२५ 3 किलोमीटर तर गडचिरोली फक्त ६० किलोमीटर अंतरावर आहे. तसेच वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने गडचिरोली हे ठिकाण सोयीचे आहे. चंद्रपूरला जाण्यासाठी लागणारा वेळ व गडचिरोलीला जाण्यासाठी लागणारा वेळ याच्यात निम्मा वेळ लागत असून वेळ व पैशाची ही बचत होते. 
  • ब्रह्मपुरी तालुक्याला गडचिरोलीत समाविष्ट केल्यास नागरिकांना समाधान वाटेल.

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरbramhapuri-acब्रह्मपुरी