शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
3
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
4
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
5
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
6
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
7
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
8
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
9
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
10
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
11
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
12
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
13
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
14
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
15
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
16
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
17
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
18
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
19
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
20
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?

विसापुरात उड्डाणपुल देण्याची मागणी

By admin | Updated: May 18, 2017 01:27 IST

तालुक्यातील विसापूर सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचे गाव असून १० हजारांवर लोकसंख्या आहे.

रेल्वेगाड्यांच्या वर्दळीने नागरिक त्रस्त : गावाची दोन भागात विभागणी लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचे गाव असून १० हजारांवर लोकसंख्या आहे. गावाच्या मध्यभागातून तीन रेल्वे लाईन गेल्या असून चौथी रेल्वे लाईन प्रस्तावित आहे. रेल्वे लाईनमुळे गावाची विभागणी दोन भागात झाली आहे. येथील रेल्वे मार्गावरून दररोज १५० च्या वर रेल्वे गाड्याचे आवागमन होत असल्याने वाहतूक डोके दुखावणारी ठरली आहे. येथील रेल्वे फाटकामुळे सारेच त्रस्त असून विसापुरात रेल्वे लाईनदरम्यान उड्डानपुल देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. विसापूर गावाच्या हद्दीत बॉटनिकल गार्डन, सैनिकी शाळा होवू घातली असून जागतिक दर्जाचा उद्योग पेपर मिल जवळच आहे. गावात सिमेंटच्या रस्त्याचे जाळे निर्माण झाले असून वाटचाल स्मार्ट गावाकडे होत आहे. येथे गोंडवाना विसापूर रेल्वेस्थानक गोंदिया-बल्लारपूर, भुसावळ-बल्लारपूर व काजीपेठ-नागपूर दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्याचा थांबा आहे. सोबतच गावातील लोकसंख्या मोठी असल्याने रेल्वे फाटकामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. दर दोन तीन मिनीटाला रेल्वे फाटक बंद होते. परिणामी गंभीर रुग्णांना वेळीच उपचारही मिळत नाही. विशेष म्हणजे, येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत गावात असल्याने फाटकाच्या जाचाने रुग्णही त्रस्त झाले आहेत. बल्लारपूर पंचायत समितीच्या गणाचा दर्जा विसापूर गावाला असून गावाला जोडणारा दुवा म्हणजे उड्डानपुल महत्त्वाचा ठरणार आहे. मध्यंतरी गावकऱ्यांची मागणी लक्षात घेवून व माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे यांच्या पाठपुराव्यामुळे नागपूर विभागाच्या मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे लाईन खालून पुलाच्या जागेची पाहणी केली. मात्र त्यानंतर कागदी घोडे अडकले. येथील सरपंच रिता जिलटे यांनी ग्रामपंचायतीमार्फत सदर समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. ग्रामसभेचा ठरावही रेल्वे प्रशासनाला दिला. परंतु रेल्वे प्रशासन अद्यापही कामाला लागले नाही. यामुळे गावकऱ्यात नाराजी निर्माण झाली आहे. रेल्वे लाईनमुळे दोन भागात विभागलेल्या गावाला वाहतूक सुरळीत करण्यासाठी उड्डाण पुलाची गरज निर्माण झाली असून राजकीय नेत्यांनी इच्छाशक्ती जागृत करून येथील नागरिकांची समस्या निकालात काढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. विसापूर गाव तीन रेल्वे लाईनमुळे विभागले आहे. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. जडवाहनाच्या वाहतुकीसाठी बल्लारपूरच्या गोलपुलाच्या धर्तीवर विसापुरातही रेल्वे लाईन खालून पुलाचे बांधकाम करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाला अवगत करण्यात आले. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानक परिसरात पादचारी लोखंडी पुलाचे बांधकाम केल्यास नागरिकांना सुविधा मिळवून दिलासा मिळणार आहे. - रामभाऊ टोंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य, विसापूर.