शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

वनहक्क पट्टे देण्यास प्रशासनाकडून दिरंगाई

By admin | Updated: November 18, 2015 01:13 IST

न्यायालयाच्या आदेशानंतरही जबरानज्योत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पट्टे देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ सुरू आहे.

युवक बिरादरी संघटना : न्यायालयात याचिका दाखल करणारचंद्रपूर : न्यायालयाच्या आदेशानंतरही जबरानज्योत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पट्टे देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ सुरू आहे. याविरोधात मूल तालुका युवक बिरादरी संघटना न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असून तसे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे.अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी वनहक्क अधिनियम २००६ नियम २००८ कायद्यांतर्गत जिल्ह्यातील चंद्रपूर, मूल, पोंभूर्णा, सावली, सिंदेवाही, चिमूर, गोंडपिंपरी, ब्रह्मपुरी, नागभीड, बल्लारपूर, राजुरा आणि वरोरा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आपले अतिक्रमित शेतीच्या पट्यासाठी वैयक्तिक वनहक्काचे दावे युवक बिरादरी संघटनेमार्फत सादर केले. वनहक्क कायद्यातील २०१२ च्या सुधारित नियमानुसार ग्राम वनहक्क समितीकडे सादर झालेले दावे उपविभागीय अधिकारीस्तरीय समितीकडे सादर करण्यात आले. मात्र या समितीने दावे प्रलंबित ठेवले. याविरुद्ध वनहक्काचे दावे दाखल करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वतीने युवक बिरादरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रारी केल्या. मात्र त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. वनहक्क कायद्यानुसार वनहक्काच्या पट्टयांसाठी शेतकऱ्यांनी सामूहिक आणि वैयक्तिकरित्या दाखल केलेले दावे अनेक वर्षे प्रलंबित ठेवून नंतर ते गहाळ झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे युवक बिरादरी संघटनेने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांचे दावे प्रशासनाकेडे सादर केले. मात्र प्रशासनाने त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. प्रशासनाच्या अशा सततच्या दप्तर दिरंगाईला कंटाळून युवक बिरादरी संघटनेने प्रशासनाविरुद्ध उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर खंडपीठाने १० जून २०१५ ला निकाल दिला. वनहक्काच्या दाव्यावर तातडीने निर्णय घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले. मात्र चार महिन्यांचा कालावधी लोटूनही प्रशासनाने याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे अवमान याचिका दाखल करणार असल्याचे अध्यक्ष कवडू येनप्रेडीवार यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)