शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

वनहक्क पट्टे देण्यास प्रशासनाकडून दिरंगाई

By admin | Updated: November 18, 2015 01:13 IST

न्यायालयाच्या आदेशानंतरही जबरानज्योत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पट्टे देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ सुरू आहे.

युवक बिरादरी संघटना : न्यायालयात याचिका दाखल करणारचंद्रपूर : न्यायालयाच्या आदेशानंतरही जबरानज्योत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पट्टे देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ सुरू आहे. याविरोधात मूल तालुका युवक बिरादरी संघटना न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असून तसे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे.अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी वनहक्क अधिनियम २००६ नियम २००८ कायद्यांतर्गत जिल्ह्यातील चंद्रपूर, मूल, पोंभूर्णा, सावली, सिंदेवाही, चिमूर, गोंडपिंपरी, ब्रह्मपुरी, नागभीड, बल्लारपूर, राजुरा आणि वरोरा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आपले अतिक्रमित शेतीच्या पट्यासाठी वैयक्तिक वनहक्काचे दावे युवक बिरादरी संघटनेमार्फत सादर केले. वनहक्क कायद्यातील २०१२ च्या सुधारित नियमानुसार ग्राम वनहक्क समितीकडे सादर झालेले दावे उपविभागीय अधिकारीस्तरीय समितीकडे सादर करण्यात आले. मात्र या समितीने दावे प्रलंबित ठेवले. याविरुद्ध वनहक्काचे दावे दाखल करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वतीने युवक बिरादरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रारी केल्या. मात्र त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. वनहक्क कायद्यानुसार वनहक्काच्या पट्टयांसाठी शेतकऱ्यांनी सामूहिक आणि वैयक्तिकरित्या दाखल केलेले दावे अनेक वर्षे प्रलंबित ठेवून नंतर ते गहाळ झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे युवक बिरादरी संघटनेने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांचे दावे प्रशासनाकेडे सादर केले. मात्र प्रशासनाने त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. प्रशासनाच्या अशा सततच्या दप्तर दिरंगाईला कंटाळून युवक बिरादरी संघटनेने प्रशासनाविरुद्ध उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर खंडपीठाने १० जून २०१५ ला निकाल दिला. वनहक्काच्या दाव्यावर तातडीने निर्णय घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले. मात्र चार महिन्यांचा कालावधी लोटूनही प्रशासनाने याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे अवमान याचिका दाखल करणार असल्याचे अध्यक्ष कवडू येनप्रेडीवार यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)