शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर दारूबंदीच्या निर्णयाने जिल्हा सीमा घेणार मोकळा श्वास

By admin | Updated: February 5, 2015 23:07 IST

२६ आॅगस्ट १९९३ रोजी दारूबंदी झालेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात तसेच छत्तीसगड व तेलंगणा राज्याच्या भागात मोठ्या प्रमाणावर दारू दुकान आहेत.

गडचिरोली : २६ आॅगस्ट १९९३ रोजी दारूबंदी झालेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात तसेच छत्तीसगड व तेलंगणा राज्याच्या भागात मोठ्या प्रमाणावर दारू दुकान आहेत. १ एप्रिल पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगतचे १५ दारू दुकान, बिअर शॉपी व भट्ट्या बंद होणार आहे. त्यामुळे दारूबंदी असलेल्या जिल्ह्याची सीमा चंद्रपूर जिल्ह्याच्या भागात आता मोकळा श्वास घेणार आहे.२६ आॅगस्ट १९८२ ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली हा जिल्हा निर्माण करण्यात आला. त्यानंतर ११ वर्षांनी गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. परवानाप्राप्त दारू दुकान जिल्ह्यातून हद्दपार झालेत. मात्र लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी नसल्याने या भागात गडचिरोलीच्या सीमेला लागूनच १५ दारू दुकानांचा डेरा दाखल झाला. यामध्ये सावली तालुक्याच्या व्याहाड भागात पाच दुकान तर चामोर्शी तालुक्याच्या सीमेवरील आष्टी लागून चंद्रपूरच्या गोंडपिंपरी तालुक्यात चार दारू दुकाने व हातभट्ट्यांचा व्यवसाय तर आरमोरी तालुक्याला लागून ब्रह्मपुरी तालुक्यात पाच बिअर शॉपी परवाना घेऊन सुरूच होते. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या दारूबंदीला कुठेही अर्थ उरला नव्हता. जिल्ह्यातील दारू शौकीत या भागात जाऊन आपली दारूची भूक भागवून घेत होते. आता १ एप्रिल पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा निर्णय राज्यमंत्री मंडळाने घेतला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या तीन सीमा दारूमुक्त होणार आहे. सावली, गोंडपिंपरी व ब्रह्मपुरी तालुक्यात सीमा भागात असलेले दारू दुकान, बिअर शॉपी व हातभट्ट्या बंद केल्या जातील. मात्र देसाईगंज तालुक्याला लागून असलेल्या लाखांदूर भागात तसेच कोरची तालुक्याला लागून असलेल्या छत्तीसगड, सिरोंचा, एटापल्ली, भामरागड तालुक्याला लागून असलेल्या छत्तीसगड, तेलंगणा राज्याच्या सीमांमध्ये मात्र दारूचे अवैध दुकान कायम राहणार आहेत. या राज्यात फिरते दारू दुकानेही आहेत. त्यामुळे ते दुकान जिल्ह्यात घुसखोरी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या दारूबंदीवरचे ग्रहण कायमच राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)