शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

नियमाला डावलून मातीचे ढिगारे

By admin | Updated: June 4, 2014 23:38 IST

कोळशाच्या उत्खनानंतर निघणार्‍या मातीचे ढिगारे ही चंद्रपूर जिल्ह्यातील खाणप्रवण क्षेत्रातील मोठी समस्या आहे. नियमांची पायमल्ली करत वेकोलिने मिळेल त्या जागेवर हे डोंगराएवढे मातीचे ढिगारे उभे

चंद्रपूर : कोळशाच्या उत्खनानंतर निघणार्‍या मातीचे ढिगारे ही चंद्रपूर जिल्ह्यातील खाणप्रवण क्षेत्रातील मोठी समस्या आहे. नियमांची पायमल्ली करत वेकोलिने मिळेल त्या जागेवर हे डोंगराएवढे मातीचे ढिगारे उभे केले आहेत. कोळसा उत्खननानंतर निघणारी माती कुठे व कशी टाकावी, याचे काही आदर्श नियम आहेत. नैसर्गिक जलस्त्रोतापासून एक किलोमिटर अंतरावर असे ढिगारे उभे करावे, असे संकेत आहेत. मात्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी अगदी नदीच्या काठावरच हे ढिगारे उभे करण्यात आले आहे. यामुळे नदीचे पात्र अरुंद होतच आहे, सोबतच नदीच्या पात्रात माती साठली जाऊन नदीचे पात्र अनेक ठिकाणी उथळ झाले आहे. या ओव्हरबर्डनमुळे पुराचाही धोका वाढला आहे. मातीचा ढिगारा उभा करताना तो खचू नये, यासाठी बेंचेस तयार करावे लागतात. मात्र वेकोलिकडून अनेक ठिकाणी हा नियमच पाळण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेकदा ढिगारे खचण्याच्या घटनाही घडल्या आहेत. कोळशाचे उत्खनन करताना जमिनीतील पाणी मोठय़ा प्रमाणावर बाहेर येते. वेकोलिकडून त्याचा साठाही केला जातो. त्यावर प्रक्रीया केल्यानंतरच तो नदीच्या प्रवाहात सोडला जावा, असे संकेत आहेत. मात्र या संकेताना वेकोलिकडून कायम मुठमाती दिली जात आहे. प्रक्रीया न करताच ते दूषित पाणी नदीत सोडले जात असल्याने नदीचा नैसर्गिक प्रवाह प्रदूषित होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वेकोलि आणि खासगी अनेक कोळसा खाणी आहेत. या खाणींमधून धुळीचे प्रदूषण मोठय़ा प्रमाणावर होत आहे. असे असताना त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी करण्यात येणार्‍या उपाययोजना अतिशय तोकड्या आहेत. पर्यावरण कायद्यानुसार अनेक नियम व अटी या कोळसा खाणींना घालून देण्यात आल्या आहेत. मात्र त्याचे पालनच होताना दिसून येत नाही. कोळशाच्या धुळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोळशावर आधारिक उद्योग वा खाण परिसरातील रस्त्यांवर पाण्याचे नियमित सिंचन केले जावे, असा एक नियम आहे. परंतु अनेक उद्योग व वेकोलिच्या कोळसा खाण प्रशासनाकडून या नियमाचे पालनच केले जात नाही.