शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

नियमाला डावलून मातीचे ढिगारे

By admin | Updated: June 4, 2014 23:38 IST

कोळशाच्या उत्खनानंतर निघणार्‍या मातीचे ढिगारे ही चंद्रपूर जिल्ह्यातील खाणप्रवण क्षेत्रातील मोठी समस्या आहे. नियमांची पायमल्ली करत वेकोलिने मिळेल त्या जागेवर हे डोंगराएवढे मातीचे ढिगारे उभे

चंद्रपूर : कोळशाच्या उत्खनानंतर निघणार्‍या मातीचे ढिगारे ही चंद्रपूर जिल्ह्यातील खाणप्रवण क्षेत्रातील मोठी समस्या आहे. नियमांची पायमल्ली करत वेकोलिने मिळेल त्या जागेवर हे डोंगराएवढे मातीचे ढिगारे उभे केले आहेत. कोळसा उत्खननानंतर निघणारी माती कुठे व कशी टाकावी, याचे काही आदर्श नियम आहेत. नैसर्गिक जलस्त्रोतापासून एक किलोमिटर अंतरावर असे ढिगारे उभे करावे, असे संकेत आहेत. मात्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी अगदी नदीच्या काठावरच हे ढिगारे उभे करण्यात आले आहे. यामुळे नदीचे पात्र अरुंद होतच आहे, सोबतच नदीच्या पात्रात माती साठली जाऊन नदीचे पात्र अनेक ठिकाणी उथळ झाले आहे. या ओव्हरबर्डनमुळे पुराचाही धोका वाढला आहे. मातीचा ढिगारा उभा करताना तो खचू नये, यासाठी बेंचेस तयार करावे लागतात. मात्र वेकोलिकडून अनेक ठिकाणी हा नियमच पाळण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेकदा ढिगारे खचण्याच्या घटनाही घडल्या आहेत. कोळशाचे उत्खनन करताना जमिनीतील पाणी मोठय़ा प्रमाणावर बाहेर येते. वेकोलिकडून त्याचा साठाही केला जातो. त्यावर प्रक्रीया केल्यानंतरच तो नदीच्या प्रवाहात सोडला जावा, असे संकेत आहेत. मात्र या संकेताना वेकोलिकडून कायम मुठमाती दिली जात आहे. प्रक्रीया न करताच ते दूषित पाणी नदीत सोडले जात असल्याने नदीचा नैसर्गिक प्रवाह प्रदूषित होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वेकोलि आणि खासगी अनेक कोळसा खाणी आहेत. या खाणींमधून धुळीचे प्रदूषण मोठय़ा प्रमाणावर होत आहे. असे असताना त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी करण्यात येणार्‍या उपाययोजना अतिशय तोकड्या आहेत. पर्यावरण कायद्यानुसार अनेक नियम व अटी या कोळसा खाणींना घालून देण्यात आल्या आहेत. मात्र त्याचे पालनच होताना दिसून येत नाही. कोळशाच्या धुळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोळशावर आधारिक उद्योग वा खाण परिसरातील रस्त्यांवर पाण्याचे नियमित सिंचन केले जावे, असा एक नियम आहे. परंतु अनेक उद्योग व वेकोलिच्या कोळसा खाण प्रशासनाकडून या नियमाचे पालनच केले जात नाही.