शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
2
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
3
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
4
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
5
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
6
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
7
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
8
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
9
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
10
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ
11
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
13
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
14
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
15
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
16
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
17
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
18
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
20
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...

जिल्ह्यात धान, कापूस पिके धोक्यात

By admin | Updated: October 18, 2014 23:23 IST

जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये कापूस व धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाची हुलकावणी सुरु आहे. शेवटपर्यंत पर्जन्यमान तसेच राहिल्याने जिल्ह्यातील धान

चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये कापूस व धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाची हुलकावणी सुरु आहे. शेवटपर्यंत पर्जन्यमान तसेच राहिल्याने जिल्ह्यातील धान व कापूस पीक धोक्यात आली आहेत. पेरणीनंतर पावसाने दडी मारली. तेव्हा शेतकऱ्यांसमोर गंभीर प्रश्न उभा झाला होता. काही दिवस पावसाने हजेरी लावली नाही, तर उभी पिके करपणार, या भीतीने शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली. हवालदिल झालेला शेतकरी पिके वाचविण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना करीत रोवणीची कामे केली. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे कापूस व धान पिकाला पाण्याची गरज निर्माण झाली आहे. पोंभूर्णा तालुक्यात परिस्थीती बिकट असून पावसाअभावी शेतकरी चिंतातूर आहे. हस्त नक्षत्रात पाऊस पडणार, अशा आशेवर शेतकऱ्यांना प्रतिक्षा होती. हस्त नक्षत्र लागून पंधरा दिवस लोटूनही पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतातील उभे पीक करपायला लागले आहेत. काही शेतकरी मोटारपंपाद्वारे शेतातील पिकांना पाणी देत आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे पाण्यासाठी साधन नाही, त्यांना पाणी देणे शक्य नाही. त्यामुळे त्यांचे धान पिके धोक्यात आली आहेत. सोयाबीन, कापूसही धोक्यातचंद्रपूर : मारडा परिसरातील नागरिकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. सध्या शेतकऱ्यांचे कामाचे दिवस सुरू आहेत. परंतु, भारनियमनाने शेतकरी त्रस्त झाला आहेत. शेतातील सोयाबीन व कापसाला पाण्याची आवश्यकता आहे. मात्र मारडा परिसरात दिवसाचे भारनियमन सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी अडचण येत आहे. सध्या सोयाबीनला शेंगा लागण्याची व कापसाला बोंडे लागण्याची अवस्था आहे.मागील पंधरा दिवसाअगोदर पाऊस झाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी लगबगीने खत दिले. परंतु तेव्हापासून पाण्याने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)