शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

जिल्ह्यात धान, कापूस पिके धोक्यात

By admin | Updated: October 18, 2014 23:23 IST

जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये कापूस व धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाची हुलकावणी सुरु आहे. शेवटपर्यंत पर्जन्यमान तसेच राहिल्याने जिल्ह्यातील धान

चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये कापूस व धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाची हुलकावणी सुरु आहे. शेवटपर्यंत पर्जन्यमान तसेच राहिल्याने जिल्ह्यातील धान व कापूस पीक धोक्यात आली आहेत. पेरणीनंतर पावसाने दडी मारली. तेव्हा शेतकऱ्यांसमोर गंभीर प्रश्न उभा झाला होता. काही दिवस पावसाने हजेरी लावली नाही, तर उभी पिके करपणार, या भीतीने शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली. हवालदिल झालेला शेतकरी पिके वाचविण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना करीत रोवणीची कामे केली. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे कापूस व धान पिकाला पाण्याची गरज निर्माण झाली आहे. पोंभूर्णा तालुक्यात परिस्थीती बिकट असून पावसाअभावी शेतकरी चिंतातूर आहे. हस्त नक्षत्रात पाऊस पडणार, अशा आशेवर शेतकऱ्यांना प्रतिक्षा होती. हस्त नक्षत्र लागून पंधरा दिवस लोटूनही पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतातील उभे पीक करपायला लागले आहेत. काही शेतकरी मोटारपंपाद्वारे शेतातील पिकांना पाणी देत आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे पाण्यासाठी साधन नाही, त्यांना पाणी देणे शक्य नाही. त्यामुळे त्यांचे धान पिके धोक्यात आली आहेत. सोयाबीन, कापूसही धोक्यातचंद्रपूर : मारडा परिसरातील नागरिकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. सध्या शेतकऱ्यांचे कामाचे दिवस सुरू आहेत. परंतु, भारनियमनाने शेतकरी त्रस्त झाला आहेत. शेतातील सोयाबीन व कापसाला पाण्याची आवश्यकता आहे. मात्र मारडा परिसरात दिवसाचे भारनियमन सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी अडचण येत आहे. सध्या सोयाबीनला शेंगा लागण्याची व कापसाला बोंडे लागण्याची अवस्था आहे.मागील पंधरा दिवसाअगोदर पाऊस झाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी लगबगीने खत दिले. परंतु तेव्हापासून पाण्याने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)