शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

‘त्या’ बांधकामामुळेच शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:54 IST

सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील माजी मालगुजारी (मामा) तलावाचे बांधकाम सुरु असून मायनरवरील आऊटलेट (मोरी बांधकाम) चे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले.

ठळक मुद्देपाटबंधारे विभाग : कंत्राटदाराला अधिकाऱ्यांकडून उभय

लोकमत न्यूज नेटवर्कवासेरा : सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील माजी मालगुजारी (मामा) तलावाचे बांधकाम सुरु असून मायनरवरील आऊटलेट (मोरी बांधकाम) चे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले. दरम्यान, या प्रकरणी तक्रार केल्याने आऊटलेटच्या बाजूला लहान पाईप टाकले. नहराला दोन्ही बाजूने पाणी जाईल. परंतु ते आऊटलेट पूर्ण फोडून नवीन केल्यास शेतकऱ्यांना त्रास होणार नव्हता. संबंधित अभियंत्यांने कंत्राटदाराचे हित लक्षात घेऊन डागडुजी केली. यातून शेतकऱ्यांचे नुकसानच होणार आहे. त्यामुळे दुरूस्ती करावी, अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.मागील पाच महिन्याप्ाांसून वासेरा येथील मामा तलावाचे बांधकाम पाठबंधारे विभागामार्फत सुरु आहे. त्यात तलावाचे पाळी व नहर दुरुस्ती तसेच आऊटलेटचे बांधकाम करण्यात आले. आऊटलेटचे बांधकाम हे भडगर मायनर, राजोली मायनर, वाकल मायनर येथे सुरु होते. अभियंतांनी त्या ठिकाणी स्वत: उपस्थित राहून काम सुरु करणे बंधनकारक होते. परंतु स्वत: हजर न राहता कंत्राटदारामार्फत मोजमाप (लेआऊट) करून कामे केले, असा आरोप होत आहे. आऊटलेटला मोठे पाईप वापरायचे होते. जेणेकरुन शेतकऱ्यांच्या शेतात सहजपणे जाऊ शकेल. परंतु लहान पाईपचा वापर करुन आऊटलेट बनविने, ही बाब शेतकऱ्यांचा लक्षात येताच अभियंता व कंत्राटदाराने आऊटलेटच्या बाजूला पुन्हा लहान पाईप लावून दिला.हा पाईप लावल्याने शेतात पाणी बरोबर जाणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मामा तलावाचे काम या पद्धतीने कुठेच होत नाही, असा दावाही शेतकऱ्यांनी केला आहे.काही शेतकºयांनी आऊटलेट (मोरीबांधकाम)चे बांधकाम फोडून नवीन आऊटलेट तयार करा, अशी मागणी केली. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी बाजूच्या पाईपमधून पाणी जाईल. आऊटलेटऐवजी मोठे पाईप टाकावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.बांधकामाची चौकशी करून दुरूस्ती करावीमामा तलावांमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मागील काही वर्षांपासून शेतीला पुरेसे पाणी मिळत नसल्याने पीक वाया जात आहे. अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही. निसर्गाच्या भरोशावरच या भागातील शेतकरी शेती करीत आहेत. त्यामुळे मामा तलावांची दुरूस्ती व पुनरूज्जीवन करणे गरजेचे होते. शासनाने या परिसरात कामे सुरू केली. काही कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, चुकीच्या पद्धतीने बांधकाम होत असल्याने पावसाळ्यात काहीच लाभ होणार नाही. त्यामुळे दुरूस्ती करावी, अशी मागणी आहे.ग्रामस्थांची समिती गठित करूनच मामा तलावाचे काम करण्यात आले. त्यातील ४० टक्के काम शिल्लक आहे. आरोपात काही तथ्य नाही. मात्र, शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर निश्चितपणे दुरूस्ती केली जाईल.-एस. सोनेकर, अभियंतापाटबंधारे विभाग.