शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बांधकामामुळेच शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:54 IST

सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील माजी मालगुजारी (मामा) तलावाचे बांधकाम सुरु असून मायनरवरील आऊटलेट (मोरी बांधकाम) चे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले.

ठळक मुद्देपाटबंधारे विभाग : कंत्राटदाराला अधिकाऱ्यांकडून उभय

लोकमत न्यूज नेटवर्कवासेरा : सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील माजी मालगुजारी (मामा) तलावाचे बांधकाम सुरु असून मायनरवरील आऊटलेट (मोरी बांधकाम) चे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले. दरम्यान, या प्रकरणी तक्रार केल्याने आऊटलेटच्या बाजूला लहान पाईप टाकले. नहराला दोन्ही बाजूने पाणी जाईल. परंतु ते आऊटलेट पूर्ण फोडून नवीन केल्यास शेतकऱ्यांना त्रास होणार नव्हता. संबंधित अभियंत्यांने कंत्राटदाराचे हित लक्षात घेऊन डागडुजी केली. यातून शेतकऱ्यांचे नुकसानच होणार आहे. त्यामुळे दुरूस्ती करावी, अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.मागील पाच महिन्याप्ाांसून वासेरा येथील मामा तलावाचे बांधकाम पाठबंधारे विभागामार्फत सुरु आहे. त्यात तलावाचे पाळी व नहर दुरुस्ती तसेच आऊटलेटचे बांधकाम करण्यात आले. आऊटलेटचे बांधकाम हे भडगर मायनर, राजोली मायनर, वाकल मायनर येथे सुरु होते. अभियंतांनी त्या ठिकाणी स्वत: उपस्थित राहून काम सुरु करणे बंधनकारक होते. परंतु स्वत: हजर न राहता कंत्राटदारामार्फत मोजमाप (लेआऊट) करून कामे केले, असा आरोप होत आहे. आऊटलेटला मोठे पाईप वापरायचे होते. जेणेकरुन शेतकऱ्यांच्या शेतात सहजपणे जाऊ शकेल. परंतु लहान पाईपचा वापर करुन आऊटलेट बनविने, ही बाब शेतकऱ्यांचा लक्षात येताच अभियंता व कंत्राटदाराने आऊटलेटच्या बाजूला पुन्हा लहान पाईप लावून दिला.हा पाईप लावल्याने शेतात पाणी बरोबर जाणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मामा तलावाचे काम या पद्धतीने कुठेच होत नाही, असा दावाही शेतकऱ्यांनी केला आहे.काही शेतकºयांनी आऊटलेट (मोरीबांधकाम)चे बांधकाम फोडून नवीन आऊटलेट तयार करा, अशी मागणी केली. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी बाजूच्या पाईपमधून पाणी जाईल. आऊटलेटऐवजी मोठे पाईप टाकावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.बांधकामाची चौकशी करून दुरूस्ती करावीमामा तलावांमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मागील काही वर्षांपासून शेतीला पुरेसे पाणी मिळत नसल्याने पीक वाया जात आहे. अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही. निसर्गाच्या भरोशावरच या भागातील शेतकरी शेती करीत आहेत. त्यामुळे मामा तलावांची दुरूस्ती व पुनरूज्जीवन करणे गरजेचे होते. शासनाने या परिसरात कामे सुरू केली. काही कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, चुकीच्या पद्धतीने बांधकाम होत असल्याने पावसाळ्यात काहीच लाभ होणार नाही. त्यामुळे दुरूस्ती करावी, अशी मागणी आहे.ग्रामस्थांची समिती गठित करूनच मामा तलावाचे काम करण्यात आले. त्यातील ४० टक्के काम शिल्लक आहे. आरोपात काही तथ्य नाही. मात्र, शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर निश्चितपणे दुरूस्ती केली जाईल.-एस. सोनेकर, अभियंतापाटबंधारे विभाग.