शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ८० टक्के पिकांची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 06:00 IST

महाराष्ट्रासह चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. शासनाकडून जाहीर केलेली १० हजार कोटींची नुकसान भरपाई तोकडी असून शेतकऱ्यांना पेरव्यानुसार सरसकट संपूर्ण नुकसान भरपाई देण्याची नितांत गरज आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचे धरणे आंदोलन : सोयाबीन, कापूस, तूर व अन्य पिकांचेही मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात ऐन सुगीच्या दिवसात ऑक्टोबर महिन्यात परतीच्या अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर व इतर पिकांसह शेतकऱ्यांचे ८० टक्के नुकसान झाले आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांना शासनाने सरसकट आर्थिक मदत करावी, यासह अन्य मागण्यांना घेऊन जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांच्यासह वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार अविनाश वारजुकर, पक्ष निरीक्षक किशोर गजभिये, शकूर नागाणी, शहर जिल्हाध्यक्ष नंदु नागरकर, प्रदेश सचिव प्रकाश देवतळे, जि.प. गटनेता सतीश वारजुकर, राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, धनश्याम मुलचंदाणी, सुनिता लोढीया, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, माजी जिल्हा अध्यक्ष सुनंदा जिवतोडे, विनोद दत्तात्रेय, शहर अध्यक्ष सुनिता अग्रवाल, अश्विनी खोब्रागडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले.कापसाला ८० हजार तर धानाला ७० हजार रुपये हेक्टरी मदत द्या - सुरेश धानोरकरचंद्रपूर : महाराष्ट्रासह चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. शासनाकडून जाहीर केलेली १० हजार कोटींची नुकसान भरपाई तोकडी असून शेतकऱ्यांना पेरव्यानुसार सरसकट संपूर्ण नुकसान भरपाई देण्याची नितांत गरज आहे. शासकीय स्तरावर कपाशीला हेक्टरी ८० हजार रुपये, सोयाबीनला हेक्टरी ५० हजार रुपये, तूर पिकाला हेक्टरी ६० हजार रुपये व धानाला हेक्टरी ७० हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहीम राज्यपालांकडे करण्यात आली असल्याची माहिती खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांनी धरणे आंदोलनादरम्यान पत्रकार परिषदेत दिली.यासोबतच पीक विमा देताना ऑनलाईन व ऑफलाईन तसेच किचकट गुंतागुंतीची प्रक्रिया न ठेवता अटी व शर्ती न लावता पीक विमा पूर्णपणे द्यावा. सर्व महिला बचत गट शेतीवरच अवलंबून असल्याने त्यांची कर्जमाफी करावी.पूरपीडितांचे जुने देणे त्वरीत देण्यात यावे. अभयारण्यालगत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना रानटी जनावरांमुळे होणारी नुकसान भरपाई त्वरीत व एक किडकी पद्धतीने द्यावी. सीसीआय मार्फत कापूस खरेदी व नाफेडच्या मार्फत तुर खरेदी केंद्र त्वरीत सुरू करण्यात यावे, अशी माहितीही यावेळी खासदार धानोरकर यांनी दिली.

टॅग्स :congressकाँग्रेस