शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
7
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
8
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
9
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
10
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
11
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
12
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
13
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
14
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
15
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
16
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
17
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
18
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
19
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
20
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना

बापरे ! २४३ कोटींच्या बांधकामात मुरमाऐवजी चक्क काळ्या मातीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 05:00 IST

राजुरा विधानसभा क्षेत्रातील कोरपना व राजुरा तालुक्यातील राज्य मार्गाचे विभाजन करून महामार्गात रूपांतर करण्यात आले. यात वनसडी-कवठाळा-पोवनी हा १४८ क्रमांकाचा ३१ किमीचा तर शिवनी-हडस्ती-कढोली-पोवनी-गोवरी-राजुरा हा ३७२ क्रमांकाचा ३६ किमीचा महामार्ग निर्माण करून या महामार्गाच्या बांधकामांकरिता शासनाने २४३ कोटींच्या निधीची तरतूद केली. त्यानुसार बांधकामही सुरू झाले.

नितीन मुसळेलोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : राजुरा तालुक्यातील वेकोली परिसरातून जाणाऱ्या राज्य मार्गाचे विभाजन करून महामार्गात रूपांतर करण्यात आले. कोट्यवधी रुपये खर्च करून सुरू असलेल्या महामार्गाच्या बांधकामात मुरुमाऐवजी शेतातील काळ्या मातीचा वापर होत असल्याने वाहतुकीस धोका निर्माण होणार आहे. या महामार्गाच्या बांधकामावर लोकप्रतिनिधी, शासन व प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.राजुरा विधानसभा क्षेत्रातील कोरपना व राजुरा तालुक्यातील राज्य मार्गाचे विभाजन करून महामार्गात रूपांतर करण्यात आले. यात वनसडी-कवठाळा-पोवनी हा १४८ क्रमांकाचा ३१ किमीचा तर शिवनी-हडस्ती-कढोली-पोवनी-गोवरी-राजुरा हा ३७२ क्रमांकाचा ३६ किमीचा महामार्ग निर्माण करून या महामार्गाच्या बांधकामांकरिता शासनाने २४३ कोटींच्या निधीची तरतूद केली. त्यानुसार बांधकामही सुरू झाले. परंतु मागील दोन वर्षांपासून या रस्त्याचे बांधकाम संथगतीने सुरू होते. काही दिवसांपूर्वीपासून कामात गती आली. परंतु बांधकामाच्या दर्जाकडे मात्र कमालीचे दुर्लक्ष केले जात असून याकडे शासन, प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.रस्ता बांधकामात पूर्वी वेकोलीच्या खोदकामातून निघणाऱ्या मातीचा वापर करण्यात आला. रस्ता बांधकामानंतर अनेक ठिकाणी उखडलेला दिसून येत आहे. रस्ता बांधकामानंतर रस्त्याच्या कडेला मुरूम टाकण्यात येतो. परंतु या महामार्गाच्या बांधकामात मात्र रस्त्याच्या कडेला शेतातील काळ्या मातीचा वापर केला जात आहे. या महामार्गाच्या गोवरी गावाजवळ तसेच माथरा गावाजवळ रस्त्याच्या कडेलाच नाली खोदून शेतातील काळी माती टाकली जात आहे. पावसाळा तोंडावर असताना ही काळी माती टाकल्यामुळे रस्त्याच्या कडेला चिखल होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. तर ही काळी माती पावसाच्या पाण्याने वाहून रस्त्यावर आल्याने दुचाकीस्वारांनाही कमालीची कसरत करावी लागेल.

बांधकामात त्रास; बांधकामानंतरही यातनाचमागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या रस्ता बांधकामामुळे परिसरातील जनता त्रस्त होतीच. परंतु बांधकाम झाल्यानंतरही त्यांच्या नरकयातना सुरूच राहणार आहेत. याकडे शासन व प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने आता संताप व्यक्त केला जात आहे. 

रस्त्याच्या कडेला मुरूम टाकणे गरजेचे असताना त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील काळी माती टाकल्याने चिखल निर्माण होऊन मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- भास्कर जुनघरी, सामाजिक कार्यकर्ता, गोवरी

 

टॅग्स :highwayमहामार्ग