शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बापरे ! २४३ कोटींच्या बांधकामात मुरमाऐवजी चक्क काळ्या मातीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 05:00 IST

राजुरा विधानसभा क्षेत्रातील कोरपना व राजुरा तालुक्यातील राज्य मार्गाचे विभाजन करून महामार्गात रूपांतर करण्यात आले. यात वनसडी-कवठाळा-पोवनी हा १४८ क्रमांकाचा ३१ किमीचा तर शिवनी-हडस्ती-कढोली-पोवनी-गोवरी-राजुरा हा ३७२ क्रमांकाचा ३६ किमीचा महामार्ग निर्माण करून या महामार्गाच्या बांधकामांकरिता शासनाने २४३ कोटींच्या निधीची तरतूद केली. त्यानुसार बांधकामही सुरू झाले.

नितीन मुसळेलोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : राजुरा तालुक्यातील वेकोली परिसरातून जाणाऱ्या राज्य मार्गाचे विभाजन करून महामार्गात रूपांतर करण्यात आले. कोट्यवधी रुपये खर्च करून सुरू असलेल्या महामार्गाच्या बांधकामात मुरुमाऐवजी शेतातील काळ्या मातीचा वापर होत असल्याने वाहतुकीस धोका निर्माण होणार आहे. या महामार्गाच्या बांधकामावर लोकप्रतिनिधी, शासन व प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.राजुरा विधानसभा क्षेत्रातील कोरपना व राजुरा तालुक्यातील राज्य मार्गाचे विभाजन करून महामार्गात रूपांतर करण्यात आले. यात वनसडी-कवठाळा-पोवनी हा १४८ क्रमांकाचा ३१ किमीचा तर शिवनी-हडस्ती-कढोली-पोवनी-गोवरी-राजुरा हा ३७२ क्रमांकाचा ३६ किमीचा महामार्ग निर्माण करून या महामार्गाच्या बांधकामांकरिता शासनाने २४३ कोटींच्या निधीची तरतूद केली. त्यानुसार बांधकामही सुरू झाले. परंतु मागील दोन वर्षांपासून या रस्त्याचे बांधकाम संथगतीने सुरू होते. काही दिवसांपूर्वीपासून कामात गती आली. परंतु बांधकामाच्या दर्जाकडे मात्र कमालीचे दुर्लक्ष केले जात असून याकडे शासन, प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.रस्ता बांधकामात पूर्वी वेकोलीच्या खोदकामातून निघणाऱ्या मातीचा वापर करण्यात आला. रस्ता बांधकामानंतर अनेक ठिकाणी उखडलेला दिसून येत आहे. रस्ता बांधकामानंतर रस्त्याच्या कडेला मुरूम टाकण्यात येतो. परंतु या महामार्गाच्या बांधकामात मात्र रस्त्याच्या कडेला शेतातील काळ्या मातीचा वापर केला जात आहे. या महामार्गाच्या गोवरी गावाजवळ तसेच माथरा गावाजवळ रस्त्याच्या कडेलाच नाली खोदून शेतातील काळी माती टाकली जात आहे. पावसाळा तोंडावर असताना ही काळी माती टाकल्यामुळे रस्त्याच्या कडेला चिखल होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. तर ही काळी माती पावसाच्या पाण्याने वाहून रस्त्यावर आल्याने दुचाकीस्वारांनाही कमालीची कसरत करावी लागेल.

बांधकामात त्रास; बांधकामानंतरही यातनाचमागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या रस्ता बांधकामामुळे परिसरातील जनता त्रस्त होतीच. परंतु बांधकाम झाल्यानंतरही त्यांच्या नरकयातना सुरूच राहणार आहेत. याकडे शासन व प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने आता संताप व्यक्त केला जात आहे. 

रस्त्याच्या कडेला मुरूम टाकणे गरजेचे असताना त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील काळी माती टाकल्याने चिखल निर्माण होऊन मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- भास्कर जुनघरी, सामाजिक कार्यकर्ता, गोवरी

 

टॅग्स :highwayमहामार्ग