शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

बापरे ! २४३ कोटींच्या बांधकामात मुरमाऐवजी चक्क काळ्या मातीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 05:00 IST

राजुरा विधानसभा क्षेत्रातील कोरपना व राजुरा तालुक्यातील राज्य मार्गाचे विभाजन करून महामार्गात रूपांतर करण्यात आले. यात वनसडी-कवठाळा-पोवनी हा १४८ क्रमांकाचा ३१ किमीचा तर शिवनी-हडस्ती-कढोली-पोवनी-गोवरी-राजुरा हा ३७२ क्रमांकाचा ३६ किमीचा महामार्ग निर्माण करून या महामार्गाच्या बांधकामांकरिता शासनाने २४३ कोटींच्या निधीची तरतूद केली. त्यानुसार बांधकामही सुरू झाले.

नितीन मुसळेलोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : राजुरा तालुक्यातील वेकोली परिसरातून जाणाऱ्या राज्य मार्गाचे विभाजन करून महामार्गात रूपांतर करण्यात आले. कोट्यवधी रुपये खर्च करून सुरू असलेल्या महामार्गाच्या बांधकामात मुरुमाऐवजी शेतातील काळ्या मातीचा वापर होत असल्याने वाहतुकीस धोका निर्माण होणार आहे. या महामार्गाच्या बांधकामावर लोकप्रतिनिधी, शासन व प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.राजुरा विधानसभा क्षेत्रातील कोरपना व राजुरा तालुक्यातील राज्य मार्गाचे विभाजन करून महामार्गात रूपांतर करण्यात आले. यात वनसडी-कवठाळा-पोवनी हा १४८ क्रमांकाचा ३१ किमीचा तर शिवनी-हडस्ती-कढोली-पोवनी-गोवरी-राजुरा हा ३७२ क्रमांकाचा ३६ किमीचा महामार्ग निर्माण करून या महामार्गाच्या बांधकामांकरिता शासनाने २४३ कोटींच्या निधीची तरतूद केली. त्यानुसार बांधकामही सुरू झाले. परंतु मागील दोन वर्षांपासून या रस्त्याचे बांधकाम संथगतीने सुरू होते. काही दिवसांपूर्वीपासून कामात गती आली. परंतु बांधकामाच्या दर्जाकडे मात्र कमालीचे दुर्लक्ष केले जात असून याकडे शासन, प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.रस्ता बांधकामात पूर्वी वेकोलीच्या खोदकामातून निघणाऱ्या मातीचा वापर करण्यात आला. रस्ता बांधकामानंतर अनेक ठिकाणी उखडलेला दिसून येत आहे. रस्ता बांधकामानंतर रस्त्याच्या कडेला मुरूम टाकण्यात येतो. परंतु या महामार्गाच्या बांधकामात मात्र रस्त्याच्या कडेला शेतातील काळ्या मातीचा वापर केला जात आहे. या महामार्गाच्या गोवरी गावाजवळ तसेच माथरा गावाजवळ रस्त्याच्या कडेलाच नाली खोदून शेतातील काळी माती टाकली जात आहे. पावसाळा तोंडावर असताना ही काळी माती टाकल्यामुळे रस्त्याच्या कडेला चिखल होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. तर ही काळी माती पावसाच्या पाण्याने वाहून रस्त्यावर आल्याने दुचाकीस्वारांनाही कमालीची कसरत करावी लागेल.

बांधकामात त्रास; बांधकामानंतरही यातनाचमागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या रस्ता बांधकामामुळे परिसरातील जनता त्रस्त होतीच. परंतु बांधकाम झाल्यानंतरही त्यांच्या नरकयातना सुरूच राहणार आहेत. याकडे शासन व प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने आता संताप व्यक्त केला जात आहे. 

रस्त्याच्या कडेला मुरूम टाकणे गरजेचे असताना त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील काळी माती टाकल्याने चिखल निर्माण होऊन मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- भास्कर जुनघरी, सामाजिक कार्यकर्ता, गोवरी

 

टॅग्स :highwayमहामार्ग