शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

बापरे ! २४३ कोटींच्या बांधकामात मुरमाऐवजी चक्क काळ्या मातीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 05:00 IST

राजुरा विधानसभा क्षेत्रातील कोरपना व राजुरा तालुक्यातील राज्य मार्गाचे विभाजन करून महामार्गात रूपांतर करण्यात आले. यात वनसडी-कवठाळा-पोवनी हा १४८ क्रमांकाचा ३१ किमीचा तर शिवनी-हडस्ती-कढोली-पोवनी-गोवरी-राजुरा हा ३७२ क्रमांकाचा ३६ किमीचा महामार्ग निर्माण करून या महामार्गाच्या बांधकामांकरिता शासनाने २४३ कोटींच्या निधीची तरतूद केली. त्यानुसार बांधकामही सुरू झाले.

नितीन मुसळेलोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : राजुरा तालुक्यातील वेकोली परिसरातून जाणाऱ्या राज्य मार्गाचे विभाजन करून महामार्गात रूपांतर करण्यात आले. कोट्यवधी रुपये खर्च करून सुरू असलेल्या महामार्गाच्या बांधकामात मुरुमाऐवजी शेतातील काळ्या मातीचा वापर होत असल्याने वाहतुकीस धोका निर्माण होणार आहे. या महामार्गाच्या बांधकामावर लोकप्रतिनिधी, शासन व प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.राजुरा विधानसभा क्षेत्रातील कोरपना व राजुरा तालुक्यातील राज्य मार्गाचे विभाजन करून महामार्गात रूपांतर करण्यात आले. यात वनसडी-कवठाळा-पोवनी हा १४८ क्रमांकाचा ३१ किमीचा तर शिवनी-हडस्ती-कढोली-पोवनी-गोवरी-राजुरा हा ३७२ क्रमांकाचा ३६ किमीचा महामार्ग निर्माण करून या महामार्गाच्या बांधकामांकरिता शासनाने २४३ कोटींच्या निधीची तरतूद केली. त्यानुसार बांधकामही सुरू झाले. परंतु मागील दोन वर्षांपासून या रस्त्याचे बांधकाम संथगतीने सुरू होते. काही दिवसांपूर्वीपासून कामात गती आली. परंतु बांधकामाच्या दर्जाकडे मात्र कमालीचे दुर्लक्ष केले जात असून याकडे शासन, प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.रस्ता बांधकामात पूर्वी वेकोलीच्या खोदकामातून निघणाऱ्या मातीचा वापर करण्यात आला. रस्ता बांधकामानंतर अनेक ठिकाणी उखडलेला दिसून येत आहे. रस्ता बांधकामानंतर रस्त्याच्या कडेला मुरूम टाकण्यात येतो. परंतु या महामार्गाच्या बांधकामात मात्र रस्त्याच्या कडेला शेतातील काळ्या मातीचा वापर केला जात आहे. या महामार्गाच्या गोवरी गावाजवळ तसेच माथरा गावाजवळ रस्त्याच्या कडेलाच नाली खोदून शेतातील काळी माती टाकली जात आहे. पावसाळा तोंडावर असताना ही काळी माती टाकल्यामुळे रस्त्याच्या कडेला चिखल होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. तर ही काळी माती पावसाच्या पाण्याने वाहून रस्त्यावर आल्याने दुचाकीस्वारांनाही कमालीची कसरत करावी लागेल.

बांधकामात त्रास; बांधकामानंतरही यातनाचमागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या रस्ता बांधकामामुळे परिसरातील जनता त्रस्त होतीच. परंतु बांधकाम झाल्यानंतरही त्यांच्या नरकयातना सुरूच राहणार आहेत. याकडे शासन व प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने आता संताप व्यक्त केला जात आहे. 

रस्त्याच्या कडेला मुरूम टाकणे गरजेचे असताना त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील काळी माती टाकल्याने चिखल निर्माण होऊन मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- भास्कर जुनघरी, सामाजिक कार्यकर्ता, गोवरी

 

टॅग्स :highwayमहामार्ग