शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

बापरे! मायनस ५ अंश सेल्सिअस तापमानात ‘ते’ युक्रेन बॉर्डरमध्ये उघड्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2022 05:00 IST

 युक्रेनमध्ये  वैद्यकीय शिक्षण स्वस्तात होत असल्याने व त्या शिक्षणाला भारतात मान्यता असल्याने हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये जातात; परंतु यावर्षी  रशिया-युक्रेनच्या युद्धात भारतीय विद्यार्थी होरपळले जात आहेत. रशिया युक्रेनवर बॉम्बचा हल्ला करीत आहे. अशा युद्धजन्य स्थितीत तेथील भारतीय विद्यार्थ्यांना रोमानिया, पोलंड  या देशाच्या सीमेवर पाठविले जात आहे.

अमोद गौरकरशंकरपूर : रशिया-युक्रेन  युद्धात भारतीय विद्यार्थी होरपळले जात असून मागील दोन दिवसांपासून मायनस पाच डिग्री सेल्सिअस थंडीमध्ये बिस्किटे खाऊन ते विद्यार्थी जीव मुठीत घेऊन रात्र काढत आहेत. त्या बॉर्डरवर भारतीय दूतावासाचा कोणताही अधिकारी उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांनी मोबाईलद्वारे या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता वारंवार उडवाउडवीची उत्तरेच विद्यार्थ्यांना मिळत आहेत. काही विद्यार्थ्यांनी तर अधिकाऱ्यांशी बोलतानाचा व्हिडिओ काढला. हा व्हिडिओही लोकमतकडे उपलब्ध आहे.  युक्रेनमध्ये  वैद्यकीय शिक्षण स्वस्तात होत असल्याने व त्या शिक्षणाला भारतात मान्यता असल्याने हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये जातात; परंतु यावर्षी  रशिया-युक्रेनच्या युद्धात भारतीय विद्यार्थी होरपळले जात आहेत. रशिया युक्रेनवर बॉम्बचा हल्ला करीत आहे. अशा युद्धजन्य स्थितीत तेथील भारतीय विद्यार्थ्यांना रोमानिया, पोलंड  या देशाच्या सीमेवर पाठविले जात आहे. या देशामध्ये जाण्यासाठी बरेच विद्यार्थी त्या मार्गाने गेले. या विद्यार्थ्यांना नेण्यासाठी भारतीय दूतावासाने पांढऱ्या रंगाची बसही दिली; परंतु त्या रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाल्यामुळे जवळपास ३५ ते ४० किलोमीटर विद्यार्थी पायी प्रवास करून पोलंड  देशाच्या सीमेपर्यंत पोहोचले; परंतु युक्रेनच्या सीमा रक्षकांनी त्यांना पोलंडच्या  सीमेवर जाण्यास बंदी घातली.  जोपर्यंत भारतीय दूतावासाकडून विस्तृत माहिती अथवा परवानगी येत नाही, तोपर्यंत पोलंडमध्ये जाऊ देत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना  एक दिवस आणि एक रात्र  काढावी लागत आहे. तापमान कमी  असल्याने त्रास अधिकरच वाढला आहे.

अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती ढासळली - युक्रेनच्या बॉर्डरवर ज्या ठिकाणी विद्यार्थी अडकले आहेत, तिथे उणे पाच डिग्री तापमान आहे. एवढ्या कडाक्याच्या थंडीची भारतीय विद्यार्थ्यांना सवय नसल्याने त्यांची प्रकृती ढासळत आहे. तेथे कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी हतबल होत आहे. भारतीय विद्यार्थी एकमेकाला आधार देत असले तरी मनाने ते खचत आहेत. 

 मोबाईलचे चार्जिंगही संपले  - विद्यार्थी उघड्यावरच राहत असल्याने त्यांच्या मोबाईलचे चार्जिंग होत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मोबाईल बंद पडले आहे. त्यामुळे बऱ्याच पालकांचा त्यांच्या मुलांशी संवाद होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एक योजना तयार करून दहाजणांचा ग्रुप तयार केला आणि त्यात दहाजणांच्या ग्रुपमध्ये प्रत्येक दिवशी एकाजणाचा मोबाईल सुरू ठेवण्यात येत असून ते नंबर त्यांनी पालकांना दिलेले आहेत. त्यामुळे त्यांचा कसाबसा तरी पालकांशी संपर्क होत आहे.

जवळचे खाद्यपदार्थही संपत आलेविद्यार्थ्यांजवळ असलेले बिस्कीटचे पाकीट व इतर खाद्य संपत आले आहे. तिथे पाण्याची कमतरता असून घोटभर पाण्यात ते आपली तहान भागवून दिवस पुढे ढकलत आहेत. अशा बिकट परिस्थितीत भारतीय विद्यार्थी त्या सीमेवर थांबून असल्याने इकडे पालकांना चिंता वाटू लागली आहे. जवळपास दोन हजार विद्यार्थी व लोक त्या सीमेवर अडकून असल्याची संपूर्ण माहिती तिथे असलेल्या ऐश्वर्या खोब्रागडे हिने आपल्या पालकांना दिली. तिचीही चिंता पाहून पालक प्रफुल्ल खोब्रागडे अतिशय चिंतेत आहेत.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीwarयुद्ध