शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

ध्येयवेडीच ! महिला सशक्तीकरणासाठी तिचा ९,१६५ किमीचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 15:53 IST

२४ वर्षीय आशा मालविया हिची थक्क करणारी भटकंती

राजेश माडुरवार

वढोली (चंद्रपूर) : कोण किती ध्येयवेडे असतात, त्याचा कोणीच अंदाज बांधू शकत नाही. पण समाजासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वत:ला झोकून देणारे ध्येयवेडे दुर्मिळच. अशीच एक ध्येयवेडी तरुणी सध्या महाराष्ट्रात फिरत चंद्रपूर जिल्ह्यात आली. आश्चर्य म्हणजे, महिला सशक्तीकरणासाठी तिने ९,१६५ किलोमीटरचा प्रवास चक्क सायकलवरून केला आहे.

केवळ महिला, युवतींमध्ये जनजागृती व महिला सशक्तीकरणासाठी ही ध्येयवेडी युवती एकेक राज्य पालथे घालत आहे. आशा मालविया (२४) असे या युवतीचे नाव असून, मध्य प्रदेश राज्यातील नटाराम गावची ता. खिलचीपूर, जि, राजगड येथील रहिवासी आहे. आशाने गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यात तिने सायकलने प्रवास केला असून, आता ती महाराष्ट्रात सायकलने भ्रमंती करीत गोंडपिंपरीत आली असून, महिला सशक्तीकरणासाचा संदेश देत आहे.

''सायकल यात्री'' म्हणून सध्या तिची ओळख झाली आहे. पदवीधर शिक्षण घेतलेली ही उच्चशिक्षित तरुणी. घरची परिस्थिती हलाकीची. वडिलांचे निधन झाल्याने कुटुंबात फक्त आई व बहिणीसोबत शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह हा दैनंदिन क्रम. पण सध्या देशात महिलांवर होत असलेले अत्याचार, महिलांवर होणारा अन्याय, युवतींपुढे असणाऱ्या समस्या असे अनेक प्रश्न तिला भेडसावत होते. त्यामुळे तिने सायकलने प्रवास करून आदिवासी, ग्रामीण, शहरी भागात जाणे, स्थानिक संस्था, शाळा, सरकारी यंत्रणेतील अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांना भेटणे व जनजागृती उद्देश ठेवून संवाद साधणे, परिस्थिती समजून घेणे मानसिकतेचा अभ्यास करणे आदी कामे ती करीत आहे. एकूण २८ राज्यात प्रवास करून १५ ऑगस्टला दिल्लीत ती आपल्या प्रवासाची सांगता करणार असल्याची माहिती तिनेच गोंडपिंपरीत सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिली.

मी कर्जबाजारी शेतकरी कुटुंबातील !

आशा मालविया सांगते की, मी कर्जबाजारी शेतकरी कुटुंबातील असून, हा प्रवास माझा व्यक्तिगत आहे. कुठल्याही शासकीय किंवा संस्थेच्या वतीने निघाली नाही. कोणाची प्रवासाला स्पॉन्सरशिप नाही. माझा प्रवास स्वजबाबदारीचा असून, लोकांकडे खाणे, राहणे असते. सोबत लोकच आर्थिक मदत करतात. महिला सन्मानाच्या बाता सर्वच करतात. मात्र उपदेश हा देण्या-घेण्यापुरताच राहिला आहे. अशावेळी कुणावर अवलंबून न राहता स्वयंस्फूर्तीने महिला जागृतीचा लढा उभारला आहे, अशी ती म्हणते. यावेळी तिचे गोंडपिंपरीत ठाणेदार जीवन राजगुरू यांनी स्वागत करत संवाद साधला.

टॅग्स :SocialसामाजिकWomenमहिलाchandrapur-acचंद्रपूर