शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

यंदा खरीप हंगामावर वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:00 IST

नोटाबंदीनंतर आलेली अतिवृष्टी, त्यानंतर अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेला शेतकरी आर्थिक घडी सावरत असतानाच आता कोरोनाच्या महामारीमुळे चांगलाचा अडचणीत सापडला आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामातही शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी रबी हंगामात पिकांची लागवड केली.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये वेळेवर बियाणे मिळणे कठीण : रोहणीचा पेराही लांबण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीमुळे यंदाचा खरीप हंगामही धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शेतीकामांना शासनाने लॉकडाऊनमधून सूट दिली आहे. शासनस्तरावर नियोजनही केले जात आहे. मात्र इतर जिल्ह्यात लॉकडाऊन पुन्हा वाढल्यास खरीप हंगाम या ना त्या कारणामुळे लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. २५ मेपासून सुरू होणाऱ्या खरीप हंगामाच्या धूळवाफ पेरण्याही लांबणार आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.नोटाबंदीनंतर आलेली अतिवृष्टी, त्यानंतर अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेला शेतकरी आर्थिक घडी सावरत असतानाच आता कोरोनाच्या महामारीमुळे चांगलाचा अडचणीत सापडला आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामातही शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी रबी हंगामात पिकांची लागवड केली.काहींनी उन्हाळी धानपीक घेतले. मात्र आधी कोरोनाचे संकट आणि त्यात अवकाळी पाऊस यामुळे आलेले पीकदेखील हातून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उन्हाळी भुईमूग, भाजीपाला, कलिंगड पिकांना ग्राहक नसल्याने शेतात सडून जात आहे. अनेक शेतकºयांवर ही पिके मोफत वाटण्याची वेळ आली आहे. जनावरांना घालावी लागत आहेत. सध्या शेतकरी वर्गात कोरोनाची धास्ती वाढली आहे.यंदाचा खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २५ मेपासून खरीप हंगामातील भात पिकाच्या धूळवाफ पेरण्यांना सुरुवात केली जाते. तसेच पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी सोयाबीनची पेरणीही केली जाते. ही दोन्ही पिके चंद्रपूर जिल्ह्यात महत्त्वाची आहेत. तसेच त्यांना लागणारी खते आणि कीटकनाशकेदेखील गरजेची आहेत.मुख्य डिलर रेड झोनमध्येबियाणांच्या विविध कंपन्यांचे मुख्य डिलर इतर जिल्ह्यात मोठया प्रमाणात आहेत. या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रभाव वाढला आहे. अनेक जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे तेथून बियाण्याच्या गाडया सोडल्या जाणार काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यंदा शेतकऱ्यांनी पावसाची वाट न पाहता रोहिणी नक्षत्राचा मुहूर्त न पाहता गरज असलेल्या बियाणांची अगोदरच खरेदी करून सोशल डिस्टन्सिंग पाळत कामे करण्याची गरज आहे.बियाण्यांबाबत अडचणीपेरणीसाठी १५ एप्रिलदरम्यान भात, सोयाबीन पिकांच्या बियाणांसाठी विक्रेत्यांना कंपन्यांकडे आगाऊ नोंद करावी लागते, तशा नोंदी केल्या जात आहेत. शिल्लक बियाणे कंपन्या परत घेत नाहीत. त्यामुळे विक्रेते सध्या कोणत्याही प्रकारचा धोका स्वीकारायला तयार नाहीत. एप्रिलच्या शेवटच्या आठवडयापर्यंत बियाणे मुख्य डिलरकडून सबडिलरकडे येणे गरजेचे आहे; मात्र या सर्व प्रक्रिया कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनमुळे पूर्ण होण्याची शक्यता फारच कमी आहे.सीमाबंदीमुळे अडचणी वाढणार काय?बहुतांशी बियाणांच्या कंपन्या मध्यप्रदेश, इंदोर तसेच इतर राज्यात आहेत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बियाण्यांची वाहतूक करण्यासाठी विशेष परवाना द्यावा लागणार आहे. तसेच अनेक शेतकरी सोयाबीन आणि कापूस पिकाचे बियाणे खरेदी करण्यासाठी चिमूर, शेगाव, हिंगणघाट येथे येत असतात. मात्र, आता राज्याच्या व जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्यामुळे शेतकºयांच्या अडचणीत भरच पडली आहे.कोरोनामुळे सर्व उद्योग धंद्यांवर परिणाम झाला आहे. पण खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेती सेवा केंद्रांमध्ये वेळेवर बि-बियाणे, खते, कीटकनाशके या कृषी निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात.- प्रशांत कोल्हे,प्रगत शेतकरी, वाहानगाव, ता.चिमूर

टॅग्स :Farmerशेतकरीweatherहवामान