शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
3
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
4
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
5
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
6
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
7
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
8
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
9
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
10
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
11
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
12
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
13
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
14
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
15
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
16
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
17
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
18
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
19
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
20
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!

यंदा खरीप हंगामावर वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:00 IST

नोटाबंदीनंतर आलेली अतिवृष्टी, त्यानंतर अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेला शेतकरी आर्थिक घडी सावरत असतानाच आता कोरोनाच्या महामारीमुळे चांगलाचा अडचणीत सापडला आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामातही शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी रबी हंगामात पिकांची लागवड केली.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये वेळेवर बियाणे मिळणे कठीण : रोहणीचा पेराही लांबण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीमुळे यंदाचा खरीप हंगामही धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शेतीकामांना शासनाने लॉकडाऊनमधून सूट दिली आहे. शासनस्तरावर नियोजनही केले जात आहे. मात्र इतर जिल्ह्यात लॉकडाऊन पुन्हा वाढल्यास खरीप हंगाम या ना त्या कारणामुळे लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. २५ मेपासून सुरू होणाऱ्या खरीप हंगामाच्या धूळवाफ पेरण्याही लांबणार आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.नोटाबंदीनंतर आलेली अतिवृष्टी, त्यानंतर अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेला शेतकरी आर्थिक घडी सावरत असतानाच आता कोरोनाच्या महामारीमुळे चांगलाचा अडचणीत सापडला आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामातही शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी रबी हंगामात पिकांची लागवड केली.काहींनी उन्हाळी धानपीक घेतले. मात्र आधी कोरोनाचे संकट आणि त्यात अवकाळी पाऊस यामुळे आलेले पीकदेखील हातून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उन्हाळी भुईमूग, भाजीपाला, कलिंगड पिकांना ग्राहक नसल्याने शेतात सडून जात आहे. अनेक शेतकºयांवर ही पिके मोफत वाटण्याची वेळ आली आहे. जनावरांना घालावी लागत आहेत. सध्या शेतकरी वर्गात कोरोनाची धास्ती वाढली आहे.यंदाचा खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २५ मेपासून खरीप हंगामातील भात पिकाच्या धूळवाफ पेरण्यांना सुरुवात केली जाते. तसेच पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी सोयाबीनची पेरणीही केली जाते. ही दोन्ही पिके चंद्रपूर जिल्ह्यात महत्त्वाची आहेत. तसेच त्यांना लागणारी खते आणि कीटकनाशकेदेखील गरजेची आहेत.मुख्य डिलर रेड झोनमध्येबियाणांच्या विविध कंपन्यांचे मुख्य डिलर इतर जिल्ह्यात मोठया प्रमाणात आहेत. या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रभाव वाढला आहे. अनेक जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे तेथून बियाण्याच्या गाडया सोडल्या जाणार काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यंदा शेतकऱ्यांनी पावसाची वाट न पाहता रोहिणी नक्षत्राचा मुहूर्त न पाहता गरज असलेल्या बियाणांची अगोदरच खरेदी करून सोशल डिस्टन्सिंग पाळत कामे करण्याची गरज आहे.बियाण्यांबाबत अडचणीपेरणीसाठी १५ एप्रिलदरम्यान भात, सोयाबीन पिकांच्या बियाणांसाठी विक्रेत्यांना कंपन्यांकडे आगाऊ नोंद करावी लागते, तशा नोंदी केल्या जात आहेत. शिल्लक बियाणे कंपन्या परत घेत नाहीत. त्यामुळे विक्रेते सध्या कोणत्याही प्रकारचा धोका स्वीकारायला तयार नाहीत. एप्रिलच्या शेवटच्या आठवडयापर्यंत बियाणे मुख्य डिलरकडून सबडिलरकडे येणे गरजेचे आहे; मात्र या सर्व प्रक्रिया कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनमुळे पूर्ण होण्याची शक्यता फारच कमी आहे.सीमाबंदीमुळे अडचणी वाढणार काय?बहुतांशी बियाणांच्या कंपन्या मध्यप्रदेश, इंदोर तसेच इतर राज्यात आहेत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बियाण्यांची वाहतूक करण्यासाठी विशेष परवाना द्यावा लागणार आहे. तसेच अनेक शेतकरी सोयाबीन आणि कापूस पिकाचे बियाणे खरेदी करण्यासाठी चिमूर, शेगाव, हिंगणघाट येथे येत असतात. मात्र, आता राज्याच्या व जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्यामुळे शेतकºयांच्या अडचणीत भरच पडली आहे.कोरोनामुळे सर्व उद्योग धंद्यांवर परिणाम झाला आहे. पण खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेती सेवा केंद्रांमध्ये वेळेवर बि-बियाणे, खते, कीटकनाशके या कृषी निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात.- प्रशांत कोल्हे,प्रगत शेतकरी, वाहानगाव, ता.चिमूर

टॅग्स :Farmerशेतकरीweatherहवामान