शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

यंदा खरीप हंगामावर वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:00 IST

नोटाबंदीनंतर आलेली अतिवृष्टी, त्यानंतर अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेला शेतकरी आर्थिक घडी सावरत असतानाच आता कोरोनाच्या महामारीमुळे चांगलाचा अडचणीत सापडला आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामातही शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी रबी हंगामात पिकांची लागवड केली.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये वेळेवर बियाणे मिळणे कठीण : रोहणीचा पेराही लांबण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीमुळे यंदाचा खरीप हंगामही धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शेतीकामांना शासनाने लॉकडाऊनमधून सूट दिली आहे. शासनस्तरावर नियोजनही केले जात आहे. मात्र इतर जिल्ह्यात लॉकडाऊन पुन्हा वाढल्यास खरीप हंगाम या ना त्या कारणामुळे लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. २५ मेपासून सुरू होणाऱ्या खरीप हंगामाच्या धूळवाफ पेरण्याही लांबणार आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.नोटाबंदीनंतर आलेली अतिवृष्टी, त्यानंतर अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेला शेतकरी आर्थिक घडी सावरत असतानाच आता कोरोनाच्या महामारीमुळे चांगलाचा अडचणीत सापडला आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामातही शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी रबी हंगामात पिकांची लागवड केली.काहींनी उन्हाळी धानपीक घेतले. मात्र आधी कोरोनाचे संकट आणि त्यात अवकाळी पाऊस यामुळे आलेले पीकदेखील हातून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उन्हाळी भुईमूग, भाजीपाला, कलिंगड पिकांना ग्राहक नसल्याने शेतात सडून जात आहे. अनेक शेतकºयांवर ही पिके मोफत वाटण्याची वेळ आली आहे. जनावरांना घालावी लागत आहेत. सध्या शेतकरी वर्गात कोरोनाची धास्ती वाढली आहे.यंदाचा खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २५ मेपासून खरीप हंगामातील भात पिकाच्या धूळवाफ पेरण्यांना सुरुवात केली जाते. तसेच पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी सोयाबीनची पेरणीही केली जाते. ही दोन्ही पिके चंद्रपूर जिल्ह्यात महत्त्वाची आहेत. तसेच त्यांना लागणारी खते आणि कीटकनाशकेदेखील गरजेची आहेत.मुख्य डिलर रेड झोनमध्येबियाणांच्या विविध कंपन्यांचे मुख्य डिलर इतर जिल्ह्यात मोठया प्रमाणात आहेत. या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रभाव वाढला आहे. अनेक जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे तेथून बियाण्याच्या गाडया सोडल्या जाणार काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यंदा शेतकऱ्यांनी पावसाची वाट न पाहता रोहिणी नक्षत्राचा मुहूर्त न पाहता गरज असलेल्या बियाणांची अगोदरच खरेदी करून सोशल डिस्टन्सिंग पाळत कामे करण्याची गरज आहे.बियाण्यांबाबत अडचणीपेरणीसाठी १५ एप्रिलदरम्यान भात, सोयाबीन पिकांच्या बियाणांसाठी विक्रेत्यांना कंपन्यांकडे आगाऊ नोंद करावी लागते, तशा नोंदी केल्या जात आहेत. शिल्लक बियाणे कंपन्या परत घेत नाहीत. त्यामुळे विक्रेते सध्या कोणत्याही प्रकारचा धोका स्वीकारायला तयार नाहीत. एप्रिलच्या शेवटच्या आठवडयापर्यंत बियाणे मुख्य डिलरकडून सबडिलरकडे येणे गरजेचे आहे; मात्र या सर्व प्रक्रिया कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनमुळे पूर्ण होण्याची शक्यता फारच कमी आहे.सीमाबंदीमुळे अडचणी वाढणार काय?बहुतांशी बियाणांच्या कंपन्या मध्यप्रदेश, इंदोर तसेच इतर राज्यात आहेत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बियाण्यांची वाहतूक करण्यासाठी विशेष परवाना द्यावा लागणार आहे. तसेच अनेक शेतकरी सोयाबीन आणि कापूस पिकाचे बियाणे खरेदी करण्यासाठी चिमूर, शेगाव, हिंगणघाट येथे येत असतात. मात्र, आता राज्याच्या व जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्यामुळे शेतकºयांच्या अडचणीत भरच पडली आहे.कोरोनामुळे सर्व उद्योग धंद्यांवर परिणाम झाला आहे. पण खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेती सेवा केंद्रांमध्ये वेळेवर बि-बियाणे, खते, कीटकनाशके या कृषी निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात.- प्रशांत कोल्हे,प्रगत शेतकरी, वाहानगाव, ता.चिमूर

टॅग्स :Farmerशेतकरीweatherहवामान