शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर सिटीपीएस कामगारांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 11:31 IST

चंद्रपूर वीज केंद्र परिसरात गेल्या दोन दिवसांत वाघ-बिबट्याने हल्ला करून दोन जणांना उचलून नेले. या घटनांमुळे पुन्हा एकदा मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न चर्चेला आला आहे.

चंद्रपूर : वीज केंद्र परिसरात वाघाने कामगाराचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री बिबट्याने एका अल्पवयीन मुलाला उचलून नेले. यानंतर, परिसरात भीतीचे वातावरण असून वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर सिटीपीएस कामगारांनी मोर्चा काढला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन भटारकर यांनी गुरुवारपासून दुर्गापूर परिसरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ वीज केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. वनविभागाने वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी कामगारांनी केली आहे.

चंद्रपूरचे महाऔष्णिक वीज केंद्र ताडोबा अभयारण्याला लागूनच असल्याने या परिसरात जंगली श्वापदांचा नेहमीच वावर असतो. तर, गेल्या दोन दिवसांत वाघबिबट्याने दोन जणांना उचलून नेले आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास कामावरून सायकलने घरी परतत असलेल्या कामगाराला वाघाने हल्ला करत उचलून नेऊन ठार केले होते. त्यांच्या मृतदेह दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. तर, त्याच दिवशी रात्री एका १६ वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेले. त्या मुलाचा अद्याप पत्ता लागला नसून वनविभागाकडून शोधकार्य सुरुच आहे.

विशेष म्हणजे याआधीही जंगली श्वापदांच्या घटना उघडकीस आल्या असून मानव-वन्यजीव संघर्ष गंभीर होत चालला आहे. २ वर्षापूर्वी केंद्रातील निवासस्थान परिसरात एका पाचवर्षीय मुलीला बिबट्याने उचलून नेल्याची घटना घडली होती. त्यानंतर २०२१ ला वाघाने हल्ला करून एका व्यक्तीला जखमी केले होते. तर, आता सलग दोन दिवसांत दोन जणांवर वन्य श्वापदांनी हल्ला करून उचलून नेले असून परिसरातील नागरिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण आहे. 

टॅग्स :agitationआंदोलनleopardबिबट्याTigerवाघDeathमृत्यूforest departmentवनविभाग