शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर सिटीपीएस कामगारांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 11:31 IST

चंद्रपूर वीज केंद्र परिसरात गेल्या दोन दिवसांत वाघ-बिबट्याने हल्ला करून दोन जणांना उचलून नेले. या घटनांमुळे पुन्हा एकदा मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न चर्चेला आला आहे.

चंद्रपूर : वीज केंद्र परिसरात वाघाने कामगाराचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री बिबट्याने एका अल्पवयीन मुलाला उचलून नेले. यानंतर, परिसरात भीतीचे वातावरण असून वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर सिटीपीएस कामगारांनी मोर्चा काढला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन भटारकर यांनी गुरुवारपासून दुर्गापूर परिसरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ वीज केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारावर कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. वनविभागाने वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी कामगारांनी केली आहे.

चंद्रपूरचे महाऔष्णिक वीज केंद्र ताडोबा अभयारण्याला लागूनच असल्याने या परिसरात जंगली श्वापदांचा नेहमीच वावर असतो. तर, गेल्या दोन दिवसांत वाघबिबट्याने दोन जणांना उचलून नेले आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास कामावरून सायकलने घरी परतत असलेल्या कामगाराला वाघाने हल्ला करत उचलून नेऊन ठार केले होते. त्यांच्या मृतदेह दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. तर, त्याच दिवशी रात्री एका १६ वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेले. त्या मुलाचा अद्याप पत्ता लागला नसून वनविभागाकडून शोधकार्य सुरुच आहे.

विशेष म्हणजे याआधीही जंगली श्वापदांच्या घटना उघडकीस आल्या असून मानव-वन्यजीव संघर्ष गंभीर होत चालला आहे. २ वर्षापूर्वी केंद्रातील निवासस्थान परिसरात एका पाचवर्षीय मुलीला बिबट्याने उचलून नेल्याची घटना घडली होती. त्यानंतर २०२१ ला वाघाने हल्ला करून एका व्यक्तीला जखमी केले होते. तर, आता सलग दोन दिवसांत दोन जणांवर वन्य श्वापदांनी हल्ला करून उचलून नेले असून परिसरातील नागरिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण आहे. 

टॅग्स :agitationआंदोलनleopardबिबट्याTigerवाघDeathमृत्यूforest departmentवनविभाग