शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

करोडोची दारू होणार नष्ट

By admin | Updated: July 1, 2015 01:23 IST

दारूबंदीनंतर अल्पकाळात पोलीस यंत्रणेने जिल्हाभरात कारवाया करून करोडो रुपयांचा दारूसाठा जप्त केला.

दिवस ठरला : राज्यातील पहिलीच कारवाई असल्याचा अंदाजरुपेश कोकावार बाबुपेठ (चंद्रपूर)दारूबंदीनंतर अल्पकाळात पोलीस यंत्रणेने जिल्हाभरात कारवाया करून करोडो रुपयांचा दारूसाठा जप्त केला. त्यामुळे पोलिसांच्या ताब्यातील मालखाने दारूच्या साठ्याने भरून गेले. कारवाया सुरूच आहेत. त्यामुळे जप्तीतील दारू ठेवायची कुठे, या प्रश्नाने चिंतेत असलेल्या पोलिसांना आता दिलासा मिळणार आहे. येत्या शुक्रवारी या दारूची विल्हेवाट लावण्याच्या हालचाली सुरू आहेत. दारुबंदीची अंमलबजावणी होताच, जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाया करत पोलिसांनी १ करोडहून अधिक रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त केला. परंतु या जप्त दारुसाठ्याने सर्वच मुख्य ठाण्यातील मालखाने हाऊसफुल्ल झाले. त्यातच दररोज होत असलेल्या पोलिसांच्या कारवाईतील जप्त दारु ठेवायची कुठे. असा प्रश्न पोलिसांना पडला होता. विषेश म्हणजे या दारु साठ्याला काही ठिकाणी वाळवी लागली होती, तर काही ठिकाणी उंदरांनी प्लॉस्टीकच्या बॉटल कातरल्याचे प्रकारही घडले होते. त्यामुळे संबंधित परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे या विभागात काम करणाऱ्या पोलिसांना अशाच परिस्थितीत काम करावे लागत होते. मात्र आता पोलिसांना मोठा दिलासा मिळणार आहे. पोलीस अधीक्षक संदीप दीवाण याच्या पाठपुराव्याने हा दारूसाठा नष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे करोडो रुपयांची दारू एकाच दिवशी नष्ट करण्यात येणार आहे. दारू नष्ट करण्याचा दिवसही ठरविण्यात आला असून ही दारू येत्या शुक्रवारी नष्ट करण्यात येणार असल्याची माहिती आहे. एकाच दिवशी ईतक्या मोठ्या प्रमाणात दारु नष्ट करण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच कारवाई असणार आहे.बंदीच्या काळातल्या मागील तीन महिन्यापासुून सुरु असलेल्या पोलीस कारवाईमध्ये दोन हजार २२२ अवैध दारूविरोधी कारवाया करण्यात आल्या असून त्यात पोलिसांनी एक करोड ८१ लाख ३७ हजार २४७ रुपयांचा दारु साठा जप्त केला आहे. त्यात दोन हजार ८७३ आरोपींना तुरूंगाची हवा खावी लागली, तर ४२ करोड ९७ लाख ३ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांच्या निर्देशावरुन मी सर्वच ठाण्यातील ठाणेदारांना सुप्रीम कोर्टाच्या १५ सायटेशनमधील मुद्दा क्रमांक १९ प्रमाणे दारूची विल्हवाट १५ दिवसांत करावी. त्याचा आधार घेऊन न्यायालयाशी पत्र व्यवहार करण्यास सांगितले होते. जवळपाच सर्वच ठाणेदारांनी पत्रव्यवहार करुन दारू नष्ट करण्याची परवानगी न्यायालयाकडून मिळवली आहे. येत्या शुक्रवारी हा दारु साठा नष्ट करण्यात येणार आहे.- प्रभाकर टिक्कस , ठाणेदार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर दारु नष्ट करायची कशी, पोलिसांपुढे मोठा पेचइतक्या मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेल्या दारुची विल्हेवाट कशी करायची, याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यात अद्यापही चर्चा सुरुच आहे. ही दारु नष्ट करताना पर्यावरणाला काही धोका निर्माण होणार नाही, याचीही काळजी पोलिसांना घ्यावी लागणार आहे. मोठा खड्डा करुन त्यात ही दारु ओतून नष्ट करण्यात येऊ शकते का, यावर वरिष्ठांमध्ये चर्चा सुरु आहे.कारवाईदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थितीपोलीस ठाण्यात जमा असलेली जप्तीतील दारू अगोदर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात एकत्र केली जाणार आहे. तेथून विल्हेवाट लाण्यासाठी नियोजित स्थळी नेली जाणार आहे. या कारवाईदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही उपस्थित राहतील.