शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

वनहक्क जमीनधारक शेतकऱ्यांसाठी पीक विमा दिवास्वप्न !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 15:20 IST

माहितीअभावी संभ्रम : सातबारा नसलेले शेतकरी वंचित राहण्याची शक्यता

चंद्रपूर : पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी सातबारा असलेल्या शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे; मात्र सातबारा नसलेल्या राज्यातील हजारो आदिवासी व पारंपरिक वननिवासी वनहक्क जमीनधारक शेतकऱ्यांना योग्य माहितीच मिळत नसल्याने यंदाचा खरीप पीक विमा दिवास्वप्न ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.

राज्यात खरीप पीक विमा योजनेत समावेशासाठी शेतकऱ्यांचा सातबारा उतारा व इतर अनुषंगिक कागदपत्रांच्या आधारे सहभाग नोंदविला जातो. काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना वनजमिनींचे वाटप झालेले असून, या जमिनींची नोंद वनखंड क्रमांकाच्या स्वरूपात आहे; परंतु अशा वनजमिनीबाबत सातबारा उतारे अजूनही जारी झाले नाहीत. परिणामी, अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ अंतर्गत वैयक्तिक वनहक्कधारक शेतकऱ्यांचे सातबारा उतारे निघत नाहीत. सातबाराच नसेल तर पीक विमा योजनेचा लाभ कसा घ्यायचा, असा प्रश्न आदिवासी व पारंपरिक वननिवासी शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला.

महसुली अभिलेखच नाही

पीक विमा योजनेंतर्गत सहभागासाठी शेतकऱ्यांना स्वतःचे नावे नमुना आठ अ आणि सातबारा महसूल-अभिलेख आवश्यक आहे. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ अंतर्गत वैयक्तिक वनहक्कधारकांची नावे सातबारा उताऱ्यात इतर हक्कामध्ये नोंदविण्यात येतात. त्यामुळे त्यांचे नावे स्वतंत्र आठ अ आणि सातबारा हे महसुली अभिलेख उपलब्ध होत नाहीत.

आदेश आला; पण तिढा सुटेना

वनहक्कधारक शेतकरी व सातबारा संगणकीकृत न झालेल्या गावातील शेतकऱ्यांच्या जमीनधारणा दस्तावेजांच्या मर्यादा लक्षात घेता योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच अधिनस्त तालुका कृषी अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून विमा हप्ता व आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी निवड करावी. त्यानंतर शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव बँकेकडून संकलित करून तहसीलदारांकडून तपासून प्राप्त करून घ्यावेत, अशा सूचना सरकारने दिल्या. वैयक्तिक वनहक्कधारक पात्र शेतकऱ्यांची प्रमाणित यादी जिल्हास्तरावरून घ्यावी व त्यानुसार पात्र शेतकऱ्यांची पडताळणी करून इच्छुक शेतकऱ्यांना योजनेत सहभागी करावे, असे निर्देश विमा कंपन्यांना देण्यात आले; परंतु यासंदर्भात विमा कंपन्यांकडून सकारात्मक हालचाली दिसत नाही.

चंद्रपूर जिल्ह्यात वनहक्क जमीनधारक शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा काढण्यासाठी कोणत्याही अडचणी नाहीत. सातबारा नसलेल्या जिवती तालुक्यातील काही वनहक्क जमीनधारक शेतकऱ्यांनाही लाभ घेता यावा, यासाठी ऑफलाईन प्रक्रियेच्या सूचना दिल्या. त्यामुळे एक रुपयात पीक विमा मोहिमेला जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

- विनय गौडा, जिल्हाधिकारी, चंद्रपूर

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रchandrapur-acचंद्रपूर