शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

कोरोनातही गुन्हेगारीचा आलेख वाढताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:36 IST

चंद्रपूर : मागील वर्षीपासून जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. संचारबंदी, लॉकडाऊन असल्याने चौका-चौकांत दिवसरात्र पोलिसांचा पहारा सुरू आहे. मात्र, ...

चंद्रपूर : मागील वर्षीपासून जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. संचारबंदी, लॉकडाऊन असल्याने चौका-चौकांत दिवसरात्र पोलिसांचा पहारा सुरू आहे. मात्र, तरीसुद्धा गुन्हेगारच पोलिसांना वरचढ ठरत असून जिल्ह्याचा गुन्हेगारीचा आलेख वाढताच असल्याचे दैनंदिन गुन्हेगारीच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू करण्यात आले. घराबाहेर पडणाऱ्यांवर कठोर निर्बंध होते. चौकाचौकांत पोलिसांचा ताफा होता. प्रत्येकाची सखोल चौकशी करून त्याला सोडण्यात येत होते. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण घटणे अपेक्षित होते. मात्र, जिल्ह्याचे चित्र उलट दिसून येत आहे.

सन २०१९ मध्ये ७६४ चोरीच्या घटना घडल्या होत्या, तर २०२० मध्ये लॉकडाऊन असल्याने सर्व कुटुंब एकत्रित होते. बाहेर पोलिसांचा पहार होता. तरीसुद्धा ७१३ चोरीच्या घटना घडल्या, तर २०२१ मध्ये मार्च महिन्यापर्यंतच १७४ चोरीच्या घटनांची नोंद करण्यात आली. यासोबतच डकेतीच्या घटनाचीसुद्धा नोंद करण्यात आली. २०१९ मध्ये ५ डकेतीची नोंद होती, तर २०२० मध्ये दोन, तर २०२१ मध्ये केवळ मार्च महिन्यापर्यंत दोन डकेतीच्या गुन्ह्याच्या नोंद झाली. यासोबतच इतर गुन्ह्यांबाबतही असा प्रकार दिसून येतो. पोलिसांचा संपूर्ण ताफा हा कोरोनाच्या बंदोबस्तात गुंतले असल्याने वाढत्या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष तर झाले नसावे ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बॉक्स

तीन महिन्यांत ३२ बलात्कार ६१ विनयभंग

लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. सर्वांचेच घराबाहेर पडणे बंद आहे; परंतु महिला व मुलींवरील अत्याचार होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. २०१९ मध्ये बलात्कारांच्या ९५, तर विनयभंगाच्या २२७ घटनांची नोंद करण्यात आली. २०२० मध्ये लॉकडाऊन असतानाही यामध्ये बरीच वाढ होऊन ११५ बलात्कार, २५० विनयभंगाच्या घटनांची नोंद झाली, तर सन २०२१ मध्ये मार्च महिन्यापर्यंत ३१ बलात्कार, तर ६१ विनयभंग झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे अद्यापही महिला सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे.

बॉक्स

१२ खुनाच्या घटना

मागील दोन वर्षाच्या आकडेवारीचा विचार केल्यास जिल्ह्यात हत्येच्या घटना वाढतच आहेत. यामध्ये सराईत गुन्हेगाराच्या हत्येच्या घटना घडल्या आहेत, तर काही अवैध धंद्याच्या भांडणातून हत्येच्या घटना घडल्या आहेत. २०१९ मध्ये ३३ खून, २०२० मध्ये ५४, तर मार्च २०२१ मार्च महिन्यापर्यंत १२ खुनाच्या घटना, तर पाच खुनाचा प्रयत्न करण्याच्या घटना घडल्या आहेत.

कोट