शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

इतिहास संशोधनातून पर्यटन रोजगार निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 22:39 IST

विदर्भाची भूमी ही ऐतिहासिक वारशाने समृद्ध आहे. ऐतिहासिक वैभव हा देशाचा सांस्कृतिक ठेवा असतो. विदर्भाचा इतिहास हा प्राचीन असून वैभवशाली आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याविषयी इतिहासाच्या संशोधकांनी विविध स्थळांकडे पर्यटन विकासाच्या दृष्टीने बघावे आणि रोजगाराच्या संधी कशा निर्माण होतील, यावर वस्तुनिष्ठ संशोधन करावे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी ५१ व्या इतिहास परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी केले.

ठळक मुद्देनामदेव कल्याणकर : गडचांदूर येथे इतिहास परिषदेचे ५१ वे अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : विदर्भाची भूमी ही ऐतिहासिक वारशाने समृद्ध आहे. ऐतिहासिक वैभव हा देशाचा सांस्कृतिक ठेवा असतो. विदर्भाचा इतिहास हा प्राचीन असून वैभवशाली आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याविषयी इतिहासाच्या संशोधकांनी विविध स्थळांकडे पर्यटन विकासाच्या दृष्टीने बघावे आणि रोजगाराच्या संधी कशा निर्माण होतील, यावर वस्तुनिष्ठ संशोधन करावे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी ५१ व्या इतिहास परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी केले.गडचांदूर येथील शरद पवार कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठाच्या पुढाकारात ही इतिहास परिषद पार पडली. दहशतवादी हल्ल्यातील शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले तर प्रमुख अतिथी डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, बिजभाषक डॉ. बी. आर. वाघमारे, परिषदेचे अध्यक्ष डॉ. व्ही. जी. बैस, प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह, परिषदेचे सचिव प्रा. डॉ. शरद सिंग, प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह, प्रा. डॉॅ. शरद बेलोरकर व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.प्राचार्य सिंह यांनी इतिहास परिषद आयोजनाची भूमिका विशद केली. डॉ. यांनी भारताच्या सांस्कृतिक विकासात इतिहासाचे योगदान कसे आहे, नव्या पिढीने यातून कोणती प्रेरणा घ्यावी, यावर भाष्य केले.डॉ. बी. आर. वाघमारे म्हणाले, १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात आदिवासींचे मोठे योगदान आहे. त्यांचा संघर्ष हा भारताच्या इतिहासामधील अमुल्य ठेवा आहे. विदर्भाचा गतकालीन इतिहास हा आदिवासींच्या क्रांतीचा तेजस्वी वारसा असून ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आदिवासींच्या योगदानाकडे कदापि दुर्लक्ष करता येत नाही, याकडे लक्ष वेधले. अध्यक्ष डॉ. व्ही. जी. बैस म्हणाले, अहिंसेच्या लढ्याने भारताचा स्वातंत्र्य संग्राम इतिहास जगात अजरामर झाला. महात्मा गांधींचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. यावेळी इतिहास परिषदेच्या ‘ शोध निबंध (खंड १९ )’ हा संशोधक ग्रंथ तसेच डॉ. प्रफुल्ल टाले लिखित ‘महाराष्टÑातील समाज सुधारक’ पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. ‘इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा’ या गीताने अतिथींचे स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवर सत्कार करण्यात आला. संचालन प्रा. डॉ. संजय गोरे यांनी केले. परिषदेचे सचिव प्रा. डॉ. शरद बेलोरकर यांनी आभार मानले.