शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
5
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
6
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
7
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
8
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
9
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
10
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
11
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
12
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
13
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
14
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
15
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
16
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
17
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
18
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
19
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
20
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
Daily Top 2Weekly Top 5

इतिहास संशोधनातून पर्यटन रोजगार निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 22:39 IST

विदर्भाची भूमी ही ऐतिहासिक वारशाने समृद्ध आहे. ऐतिहासिक वैभव हा देशाचा सांस्कृतिक ठेवा असतो. विदर्भाचा इतिहास हा प्राचीन असून वैभवशाली आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याविषयी इतिहासाच्या संशोधकांनी विविध स्थळांकडे पर्यटन विकासाच्या दृष्टीने बघावे आणि रोजगाराच्या संधी कशा निर्माण होतील, यावर वस्तुनिष्ठ संशोधन करावे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी ५१ व्या इतिहास परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी केले.

ठळक मुद्देनामदेव कल्याणकर : गडचांदूर येथे इतिहास परिषदेचे ५१ वे अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : विदर्भाची भूमी ही ऐतिहासिक वारशाने समृद्ध आहे. ऐतिहासिक वैभव हा देशाचा सांस्कृतिक ठेवा असतो. विदर्भाचा इतिहास हा प्राचीन असून वैभवशाली आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याविषयी इतिहासाच्या संशोधकांनी विविध स्थळांकडे पर्यटन विकासाच्या दृष्टीने बघावे आणि रोजगाराच्या संधी कशा निर्माण होतील, यावर वस्तुनिष्ठ संशोधन करावे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी ५१ व्या इतिहास परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी केले.गडचांदूर येथील शरद पवार कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठाच्या पुढाकारात ही इतिहास परिषद पार पडली. दहशतवादी हल्ल्यातील शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले तर प्रमुख अतिथी डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, बिजभाषक डॉ. बी. आर. वाघमारे, परिषदेचे अध्यक्ष डॉ. व्ही. जी. बैस, प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह, परिषदेचे सचिव प्रा. डॉ. शरद सिंग, प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह, प्रा. डॉॅ. शरद बेलोरकर व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.प्राचार्य सिंह यांनी इतिहास परिषद आयोजनाची भूमिका विशद केली. डॉ. यांनी भारताच्या सांस्कृतिक विकासात इतिहासाचे योगदान कसे आहे, नव्या पिढीने यातून कोणती प्रेरणा घ्यावी, यावर भाष्य केले.डॉ. बी. आर. वाघमारे म्हणाले, १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात आदिवासींचे मोठे योगदान आहे. त्यांचा संघर्ष हा भारताच्या इतिहासामधील अमुल्य ठेवा आहे. विदर्भाचा गतकालीन इतिहास हा आदिवासींच्या क्रांतीचा तेजस्वी वारसा असून ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आदिवासींच्या योगदानाकडे कदापि दुर्लक्ष करता येत नाही, याकडे लक्ष वेधले. अध्यक्ष डॉ. व्ही. जी. बैस म्हणाले, अहिंसेच्या लढ्याने भारताचा स्वातंत्र्य संग्राम इतिहास जगात अजरामर झाला. महात्मा गांधींचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. यावेळी इतिहास परिषदेच्या ‘ शोध निबंध (खंड १९ )’ हा संशोधक ग्रंथ तसेच डॉ. प्रफुल्ल टाले लिखित ‘महाराष्टÑातील समाज सुधारक’ पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. ‘इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा’ या गीताने अतिथींचे स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवर सत्कार करण्यात आला. संचालन प्रा. डॉ. संजय गोरे यांनी केले. परिषदेचे सचिव प्रा. डॉ. शरद बेलोरकर यांनी आभार मानले.