शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

इतिहास संशोधनातून पर्यटन रोजगार निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 22:39 IST

विदर्भाची भूमी ही ऐतिहासिक वारशाने समृद्ध आहे. ऐतिहासिक वैभव हा देशाचा सांस्कृतिक ठेवा असतो. विदर्भाचा इतिहास हा प्राचीन असून वैभवशाली आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याविषयी इतिहासाच्या संशोधकांनी विविध स्थळांकडे पर्यटन विकासाच्या दृष्टीने बघावे आणि रोजगाराच्या संधी कशा निर्माण होतील, यावर वस्तुनिष्ठ संशोधन करावे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी ५१ व्या इतिहास परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी केले.

ठळक मुद्देनामदेव कल्याणकर : गडचांदूर येथे इतिहास परिषदेचे ५१ वे अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : विदर्भाची भूमी ही ऐतिहासिक वारशाने समृद्ध आहे. ऐतिहासिक वैभव हा देशाचा सांस्कृतिक ठेवा असतो. विदर्भाचा इतिहास हा प्राचीन असून वैभवशाली आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याविषयी इतिहासाच्या संशोधकांनी विविध स्थळांकडे पर्यटन विकासाच्या दृष्टीने बघावे आणि रोजगाराच्या संधी कशा निर्माण होतील, यावर वस्तुनिष्ठ संशोधन करावे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी ५१ व्या इतिहास परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी केले.गडचांदूर येथील शरद पवार कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठाच्या पुढाकारात ही इतिहास परिषद पार पडली. दहशतवादी हल्ल्यातील शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले तर प्रमुख अतिथी डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, बिजभाषक डॉ. बी. आर. वाघमारे, परिषदेचे अध्यक्ष डॉ. व्ही. जी. बैस, प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह, परिषदेचे सचिव प्रा. डॉ. शरद सिंग, प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह, प्रा. डॉॅ. शरद बेलोरकर व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.प्राचार्य सिंह यांनी इतिहास परिषद आयोजनाची भूमिका विशद केली. डॉ. यांनी भारताच्या सांस्कृतिक विकासात इतिहासाचे योगदान कसे आहे, नव्या पिढीने यातून कोणती प्रेरणा घ्यावी, यावर भाष्य केले.डॉ. बी. आर. वाघमारे म्हणाले, १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात आदिवासींचे मोठे योगदान आहे. त्यांचा संघर्ष हा भारताच्या इतिहासामधील अमुल्य ठेवा आहे. विदर्भाचा गतकालीन इतिहास हा आदिवासींच्या क्रांतीचा तेजस्वी वारसा असून ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आदिवासींच्या योगदानाकडे कदापि दुर्लक्ष करता येत नाही, याकडे लक्ष वेधले. अध्यक्ष डॉ. व्ही. जी. बैस म्हणाले, अहिंसेच्या लढ्याने भारताचा स्वातंत्र्य संग्राम इतिहास जगात अजरामर झाला. महात्मा गांधींचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. यावेळी इतिहास परिषदेच्या ‘ शोध निबंध (खंड १९ )’ हा संशोधक ग्रंथ तसेच डॉ. प्रफुल्ल टाले लिखित ‘महाराष्टÑातील समाज सुधारक’ पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. ‘इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा’ या गीताने अतिथींचे स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवर सत्कार करण्यात आला. संचालन प्रा. डॉ. संजय गोरे यांनी केले. परिषदेचे सचिव प्रा. डॉ. शरद बेलोरकर यांनी आभार मानले.