शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

१६ गावातील कापूस मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST

दिवाळीत दरवर्षी शेतकरी कापसाची वेचणी करतात. परंतु यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. सोयाबीन, ज्वारी, धान पिके उद्ध्वस्त झाली. सोयाबीन विकून कशीबशी दिवाळी साजरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले. ऐन दिवाळीत परतीच्या पावसाने सोयाबीन पीक कापणी करता आली नाही. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी केली परंतु पावसाने होत्याचे नव्हते झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा तालुक्यातील १६ गावांमध्ये परतीच्या पावसाने कपाशीच्या बोंडे सडली. त्यामुळे पांढरे सोने मातीमोल होण्याच्या मार्गावर आहे. कापूस वेचणीला आला असताना दोन आठवड्यांपासून खंडित स्वरूपात परती पाऊस पडला. गोवरी, सास्ती, माथरा, गोयेगाव, अंतरगाव, आर्वी, खामोणा, चंदणवाही, पोवनी, वरोडा, धीडशी, चार्ली, नीर्ली, कढोली, मानोली व बबापूर परिसरातील कपाशीची बोंडे सडली.दिवाळीत दरवर्षी शेतकरी कापसाची वेचणी करतात. परंतु यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. सोयाबीन, ज्वारी, धान पिके उद्ध्वस्त झाली. सोयाबीन विकून कशीबशी दिवाळी साजरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले. ऐन दिवाळीत परतीच्या पावसाने सोयाबीन पीक कापणी करता आली नाही. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी केली परंतु पावसाने होत्याचे नव्हते झाले. संकटे शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. यंदा सहा एकर शेतात कपाशीची लागवड केली. परंतु परतीच्या पावसाने कपाशीची बोंडे सडली.उत्पन्नाची हमी राहिली नाही. लागवडीचा खर्च निघेल की नाही हा प्रश्नच आहे, अशी खंत आर्वी येथील शेतकरी जयपाल कपाळे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली.धान उत्पादकांचे बजेट कोलमडलेब्रह्मपुरी : यंदा धान शेतीसाठी समाधानकारक पाऊस आल्याने पिकाची जोमाने वाढ होऊन धानाचा निसवा व्यवस्थित झाला. समाधानकारक उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा असताना अकाली पावसाने धान उत्पादक शेतकऱ्यांची संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडली. गुरूवारच्या वादळी पावसाने धान पिकाचे प्रचंड नुकसान केल्याने शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात पावसामुळे धानाच्या कडपा पाण्यात सापडल्या. त्यामुळे धानाला आता अंकुर फुटत असल्याचे दिसून येत आहे. धान कापलेल्या बांधात पाणी साचले. शेतकऱ्यांना यंदा जादा उत्पादनाची अपेक्षा होती. हलक्या धानाची कापणी केल्यानंतर शेतकरी जड धान कापन्याच्या तयारी करत होते. दरम्यान, मुसळधार पावसामुळे धान पिकाला फटका बसला. भातशेती हेच तालुक्यातील मुख्य पीक आहे. शेतकऱ्यांचे पूर्ण वर्षभराचे आर्थिक बजेट धानपिकावर अवलंबून असते. परंतु अवकाळी पावसामुळे वर्षभराचे आर्थिक बजेट कोलमडले. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

टॅग्स :agricultureशेती