शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
2
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
3
Shantanu Naidu : रतन टाटांचा तरुण सहकारी राहिलेल्या शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे फोटो आले समोर
4
टायगर श्रॉफनं मुंबईमध्ये ₹१५.६० कोटींना विकलं लक्झरी अपार्टमेंट, पाहा डिटेल्स; कितीला खरेदी केलेली प्रॉपर्टी?
5
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
6
"मराठी सिनेसृष्टीने दोन कलाकार गमावले", प्रिया मराठेसोबत लावला फोटो, मरणाची बातमी पाहून मराठी अभिनेता संतापला
7
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
8
Asia Cup 2025, AFG vs HK Head to Head Record : 'चमत्कारी' संघासमोर ते चमत्कार दाखवतील का?
9
"आई शप्पथ गळा कापेन...", अली गोनीचा ट्रोलर्सला इशारा; 'त्या' व्हिडीओवरुन झालेला वाद
10
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
11
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी
12
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
13
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
14
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
15
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
16
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
17
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
18
चार मुलं जन्माला घाला आणि टॅक्स वाचवा; सरकारकडून १६,५६३ कोटी रुपये पॅकेजची घोषणा!
19
तेजस्वी यादव यांची सरकारवर १२ प्रश्नांची सरबत्ती; बेरोजगारीवर मागितली थेट उत्तरे
20
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक

१६ गावातील कापूस मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST

दिवाळीत दरवर्षी शेतकरी कापसाची वेचणी करतात. परंतु यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. सोयाबीन, ज्वारी, धान पिके उद्ध्वस्त झाली. सोयाबीन विकून कशीबशी दिवाळी साजरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले. ऐन दिवाळीत परतीच्या पावसाने सोयाबीन पीक कापणी करता आली नाही. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी केली परंतु पावसाने होत्याचे नव्हते झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा तालुक्यातील १६ गावांमध्ये परतीच्या पावसाने कपाशीच्या बोंडे सडली. त्यामुळे पांढरे सोने मातीमोल होण्याच्या मार्गावर आहे. कापूस वेचणीला आला असताना दोन आठवड्यांपासून खंडित स्वरूपात परती पाऊस पडला. गोवरी, सास्ती, माथरा, गोयेगाव, अंतरगाव, आर्वी, खामोणा, चंदणवाही, पोवनी, वरोडा, धीडशी, चार्ली, नीर्ली, कढोली, मानोली व बबापूर परिसरातील कपाशीची बोंडे सडली.दिवाळीत दरवर्षी शेतकरी कापसाची वेचणी करतात. परंतु यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. सोयाबीन, ज्वारी, धान पिके उद्ध्वस्त झाली. सोयाबीन विकून कशीबशी दिवाळी साजरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले. ऐन दिवाळीत परतीच्या पावसाने सोयाबीन पीक कापणी करता आली नाही. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी केली परंतु पावसाने होत्याचे नव्हते झाले. संकटे शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. यंदा सहा एकर शेतात कपाशीची लागवड केली. परंतु परतीच्या पावसाने कपाशीची बोंडे सडली.उत्पन्नाची हमी राहिली नाही. लागवडीचा खर्च निघेल की नाही हा प्रश्नच आहे, अशी खंत आर्वी येथील शेतकरी जयपाल कपाळे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली.धान उत्पादकांचे बजेट कोलमडलेब्रह्मपुरी : यंदा धान शेतीसाठी समाधानकारक पाऊस आल्याने पिकाची जोमाने वाढ होऊन धानाचा निसवा व्यवस्थित झाला. समाधानकारक उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा असताना अकाली पावसाने धान उत्पादक शेतकऱ्यांची संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडली. गुरूवारच्या वादळी पावसाने धान पिकाचे प्रचंड नुकसान केल्याने शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात पावसामुळे धानाच्या कडपा पाण्यात सापडल्या. त्यामुळे धानाला आता अंकुर फुटत असल्याचे दिसून येत आहे. धान कापलेल्या बांधात पाणी साचले. शेतकऱ्यांना यंदा जादा उत्पादनाची अपेक्षा होती. हलक्या धानाची कापणी केल्यानंतर शेतकरी जड धान कापन्याच्या तयारी करत होते. दरम्यान, मुसळधार पावसामुळे धान पिकाला फटका बसला. भातशेती हेच तालुक्यातील मुख्य पीक आहे. शेतकऱ्यांचे पूर्ण वर्षभराचे आर्थिक बजेट धानपिकावर अवलंबून असते. परंतु अवकाळी पावसामुळे वर्षभराचे आर्थिक बजेट कोलमडले. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

टॅग्स :agricultureशेती