शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

पावसाअभावी कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना यंदाही संकटाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 05:00 IST

कोरोना महामारीने आर्थिक घडी विस्कटली असतानाच शेतकऱ्यांनी कर्ज काढून खरीप हंगामातील पिकांची लागवड केली. अधूनमधून पाऊस येत राहिल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. मात्र आता अचानक पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढत चालली आहे. कपाशी जमिनीतून बाहेर उमलण्यासाठी पावसाची आवश्यकता असते. आकाशात दररोज काळे ढग दाटून येतात.

ठळक मुद्देदमदार पावसाची प्रतीक्षा । दुबार पेरणीचे संकट, रात्रीचा पाऊस दिलासादायक

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : मृगाचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने खरीप हंगामातील कपाशीची लागवड केली. मात्र, त्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्यामुळे चिंता वाढली आहे. त्यामुळे पावसाअभावी कपाशी जमिनीतून उमलण्यापूर्वीच करपण्याचा धोका आहे. यंदाही अस्मानी संकटांनी शेतकरी भरडण्याची चिन्हे आहेत. शनिवारी रात्री आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.कोरोना महामारीने आर्थिक घडी विस्कटली असतानाच शेतकऱ्यांनी कर्ज काढून खरीप हंगामातील पिकांची लागवड केली. अधूनमधून पाऊस येत राहिल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. मात्र आता अचानक पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढत चालली आहे. कपाशी जमिनीतून बाहेर उमलण्यासाठी पावसाची आवश्यकता असते. आकाशात दररोज काळे ढग दाटून येतात. पुन्हा पाच दिवसात पाऊस आला नाही तर उसनवारी व कर्ज काढून पेरलेले महागडे बियाणे पुन्हा घ्यायला शेतकºयांकडे पैसा उरला नाही. राजुरा तालुक्यातील गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, चिंचोली, कढोली, मानोली, बाबापूर चार्ली, निर्ली, धिडशी, माथरा, गोयेगाव, अंतरगाव परिसरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात पाऊस झाल्यानंतर अचानक पावसाने हुलकावणी दिली. सध्या कपाशीचे बीज अंकुरण्याचा काळ असतानाच पाऊस गायब झाला. रात्रीला जिल्ह्याच्या काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या.कपाशी जमिनीतच करपण्याची भीतीकपाशी वाचविण्यासाठी पावसाची आवश्यकता आहे. मात्र पाऊस येण्याची कोणतीच चिन्ह दिसत नसल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. आता पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांचे काही खरे नाही. असा केविलवाणा सुर शेतकरी वर्गात उमटू लागला आहे. पावसाअभावी कपाशी जमिनीतून उमलण्यापूर्वीच करपण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे ‘काळ्या आईच्या कुशीत पेरलेले बीज उमलू दे’ एवढीच इच्छा शेतकरी व्यक्त करीत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती