शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कपाशीने बदलला रंग; शेतकरी झाले हतबल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 13:15 IST

पिके पडली पिवळी : सूर्यनारायणाचे दर्शन दुर्लभ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : औद्योगिकसह धान उत्पादक जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. असे असले तरी जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकेही घेतली जाते. मात्र, मागील पंधरवड्यापासून रिमझिम पावसाने शेतकऱ्यांना चांगलेच हैराण केले. सततच्या पावसामुळे कपाशी, सोयाबीनचे पीक पिवळे पडले असून, काही ठिकाणी सडून खराब होत आहे. कुठे पिकांची वाढ खुंटली आहे, तर काही ठिकाणी पिकांवर विविध प्रकारची रोगराई वाढत आहे. परिणामी, यंदा उत्पन्नात मोठी घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लावलेला खर्चही निघेल की नाही, या विवंचनेत सध्या जिल्ह्यातील शेतकरी आहेत.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. सूर्यनारायणाचे दर्शनही होत नसल्याची स्थिती आहे. सतत रिमझिम पावसामुळे कपाशी पिकांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत. शेतकऱ्यांनी जूनमध्ये खरीप हंगामाची पेरणी केली. काहींनी धूळपेरणी केली. मात्र, पावसाने दगा दिला. त्यामुळे काही ठिकाणी दुबार पेरणीही करावी लागली.

कापूस उत्पादक तालुकेजिल्ह्याची ओळख धान उत्पादक अशी असली तरी काही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक घेतले जाते. यामध्ये राजुरा, कोरपना, वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, बल्लारपूर, गोंडपिपरी, चिमूर या तालुक्यांमध्ये कापूस उत्पादन तर ब्रह्मपुरी, सावली, सिदेवाही, मूल, पोंभुर्णा, नागभीड, गोंडपिपरी या तालुक्यांमध्ये धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. दरम्यान, धान, आणि कापूस हे दोन्ही पीक काही तालुक्यांमध्ये घेतल्या जाते.

शेतकरी म्हणतात...."मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे कपाशीवर रोगराई तसेच पिके पिवळी पडत आहे. त्यामुळे यावर्षी लावलेला खर्च निघणार की नाही, ही चिंता प्रत्येक शेतकऱ्याला आहे. शेतकरी पिकांची जोपासणा करण्यासाठी फवारणी करीत आहे. मात्र, पिकांची वाढ खुंटली आहे. सोयाबीनची हीच अवस्था आहे."- प्रमोद लांडे, शेतकरी, गोवरी

"सतत दोन आठवड्यांपासून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून, संपूर्ण पीक पिवळे पडले आहे. संबंधितांनी पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी."- विजय धोटे, शेतकरी, 

टॅग्स :CropपीकfloodपूरfarmingशेतीFarmerशेतकरी