शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

कपाशीने बदलला रंग; शेतकरी झाले हतबल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 13:15 IST

पिके पडली पिवळी : सूर्यनारायणाचे दर्शन दुर्लभ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : औद्योगिकसह धान उत्पादक जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. असे असले तरी जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकेही घेतली जाते. मात्र, मागील पंधरवड्यापासून रिमझिम पावसाने शेतकऱ्यांना चांगलेच हैराण केले. सततच्या पावसामुळे कपाशी, सोयाबीनचे पीक पिवळे पडले असून, काही ठिकाणी सडून खराब होत आहे. कुठे पिकांची वाढ खुंटली आहे, तर काही ठिकाणी पिकांवर विविध प्रकारची रोगराई वाढत आहे. परिणामी, यंदा उत्पन्नात मोठी घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लावलेला खर्चही निघेल की नाही, या विवंचनेत सध्या जिल्ह्यातील शेतकरी आहेत.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. सूर्यनारायणाचे दर्शनही होत नसल्याची स्थिती आहे. सतत रिमझिम पावसामुळे कपाशी पिकांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत. शेतकऱ्यांनी जूनमध्ये खरीप हंगामाची पेरणी केली. काहींनी धूळपेरणी केली. मात्र, पावसाने दगा दिला. त्यामुळे काही ठिकाणी दुबार पेरणीही करावी लागली.

कापूस उत्पादक तालुकेजिल्ह्याची ओळख धान उत्पादक अशी असली तरी काही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक घेतले जाते. यामध्ये राजुरा, कोरपना, वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, बल्लारपूर, गोंडपिपरी, चिमूर या तालुक्यांमध्ये कापूस उत्पादन तर ब्रह्मपुरी, सावली, सिदेवाही, मूल, पोंभुर्णा, नागभीड, गोंडपिपरी या तालुक्यांमध्ये धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. दरम्यान, धान, आणि कापूस हे दोन्ही पीक काही तालुक्यांमध्ये घेतल्या जाते.

शेतकरी म्हणतात...."मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे कपाशीवर रोगराई तसेच पिके पिवळी पडत आहे. त्यामुळे यावर्षी लावलेला खर्च निघणार की नाही, ही चिंता प्रत्येक शेतकऱ्याला आहे. शेतकरी पिकांची जोपासणा करण्यासाठी फवारणी करीत आहे. मात्र, पिकांची वाढ खुंटली आहे. सोयाबीनची हीच अवस्था आहे."- प्रमोद लांडे, शेतकरी, गोवरी

"सतत दोन आठवड्यांपासून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून, संपूर्ण पीक पिवळे पडले आहे. संबंधितांनी पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी."- विजय धोटे, शेतकरी, 

टॅग्स :CropपीकfloodपूरfarmingशेतीFarmerशेतकरी