शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मनपाची पाणीपुरवठा योजना तब्बल सहा कोटींनी ताेट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 05:00 IST

शहरात आजघडीला ८५ हजार मालमत्ता असल्या, तरी केवळ ३५ हजार नळ जोडणी आहेत. इरई धरण तथा दाताळा मार्गावरील इरई नदी या दोन ठिकाणांतून शहराला पाणीपुरवठा होतो. त्यात या योजनेचे खासगीकरण करून कंपनीला ही योजना चालविण्यासाठी दिली होती. अगदी सुरुवातीला ठाकूर नावाच्या व्यक्तीच्या कंपनीला ही योजना संचालित करण्याचे काम दिले होते. त्यानंतर, चांडक यांच्या कंपनीच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना संचालित केली जात होती. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील पाणीपुरवठा योजनेवर महापालिका वर्षभरात ११ कोटींचा खर्च करते. मात्र, पाणी कराच्या माेबदल्यात केवळ ४ कोटी ९५ लाखांचे उत्पन्न होत आहे. त्यामुळे वर्षभरात तब्बल सहा कोटींचा फटका बसत असल्याचे वास्तव पुढे आले आहे.  चंद्रपुरात अमृत पाणीपुरवठा योजनेचे थाटात उद्घाटन झाले असले, तरी बऱ्याच प्रभागातील कामे अर्धवट तर कुठे सुरू आहेत. अजूनही अनेकांना अमृत योजनेचे पाणी मिळाले नाही. आगामी निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून उद्घाटन करण्यात आले, हे आता पुरते स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ज्या प्रभागात अमृत योजनेचे पाणी पोहोचले नाही, तेथील नागरिक मनपा पदाधिकाऱ्यांना प्रश्न विचारून जेरीस आणत आहेत. शहरात आजघडीला ८५ हजार मालमत्ता असल्या, तरी केवळ ३५ हजार नळ जोडणी आहेत. इरई धरण तथा दाताळा मार्गावरील इरई नदी या दोन ठिकाणांतून शहराला पाणीपुरवठा होतो. त्यात या योजनेचे खासगीकरण करून कंपनीला ही योजना चालविण्यासाठी दिली होती. अगदी सुरुवातीला ठाकूर नावाच्या व्यक्तीच्या कंपनीला ही योजना संचालित करण्याचे काम दिले होते. त्यानंतर, चांडक यांच्या कंपनीच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना संचालित केली जात होती. या दोन्ही कंपन्यांकडून काम काढून घेतल्यानंतर, समरित यांच्या कंपनीकडे शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी सोपविली होती. मात्र, या तिन्ही कंपन्यांमुळे मनपाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला, असा पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे.

खासगीकरण रद्द   होऊनही समस्या जैसे थेचंद्रपूरकरांना पाणी नियमित मिळावे, यासाठी मनपाच्या आमसभेत पाणीपुरवठा योजनेच्या खासगीकरणाचा निर्णय रद्द करून, योजना स्वत: चालविण्याचा निर्णय घेतला. या घटनेला दोन वर्षे झाले. आता मनपा स्वत:च पाणीपुरवठा योजना संचालित करीत आहे. मात्र, चंद्रपूरकरांची पाण्यासाठी भटकंती संपली नाही.

पाणीपुरवठा एक   दिवसाआड काही दिवसांपूर्वी दररोज दोनदा नळाला पाणी येत होते. आता तर एक दिवस आड पाणीपुरवठा केला जातो. तोही नियमित नसल्याने घरातील घागरी रिकाम्या असतात. इरई धरणातून चंद्रपूरकडे येणारा पाइपलाइन फुटल्याने तीन दिवस पाणीपुरवठा ठप्प होता.

तोटा भरून काढण्याकडे दुर्लक्ष- पाणीपुरवठा योजनेवरील खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी असल्याने वर्षाकाठी सहा कोटींचा तोटा होत आहे.  - हा तोटा भरून काढण्यासाठी मनपाने काही उपाययोजनाच  केल्या नाही. त्यामुळे ही समस्या कायम असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

 

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी