शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
6
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
7
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
8
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
9
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
10
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
11
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
12
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
13
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
14
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
15
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
16
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
17
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
18
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
19
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?
20
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?

मनपाची पाणीपुरवठा योजना तब्बल सहा कोटींनी ताेट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 05:00 IST

शहरात आजघडीला ८५ हजार मालमत्ता असल्या, तरी केवळ ३५ हजार नळ जोडणी आहेत. इरई धरण तथा दाताळा मार्गावरील इरई नदी या दोन ठिकाणांतून शहराला पाणीपुरवठा होतो. त्यात या योजनेचे खासगीकरण करून कंपनीला ही योजना चालविण्यासाठी दिली होती. अगदी सुरुवातीला ठाकूर नावाच्या व्यक्तीच्या कंपनीला ही योजना संचालित करण्याचे काम दिले होते. त्यानंतर, चांडक यांच्या कंपनीच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना संचालित केली जात होती. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील पाणीपुरवठा योजनेवर महापालिका वर्षभरात ११ कोटींचा खर्च करते. मात्र, पाणी कराच्या माेबदल्यात केवळ ४ कोटी ९५ लाखांचे उत्पन्न होत आहे. त्यामुळे वर्षभरात तब्बल सहा कोटींचा फटका बसत असल्याचे वास्तव पुढे आले आहे.  चंद्रपुरात अमृत पाणीपुरवठा योजनेचे थाटात उद्घाटन झाले असले, तरी बऱ्याच प्रभागातील कामे अर्धवट तर कुठे सुरू आहेत. अजूनही अनेकांना अमृत योजनेचे पाणी मिळाले नाही. आगामी निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून उद्घाटन करण्यात आले, हे आता पुरते स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ज्या प्रभागात अमृत योजनेचे पाणी पोहोचले नाही, तेथील नागरिक मनपा पदाधिकाऱ्यांना प्रश्न विचारून जेरीस आणत आहेत. शहरात आजघडीला ८५ हजार मालमत्ता असल्या, तरी केवळ ३५ हजार नळ जोडणी आहेत. इरई धरण तथा दाताळा मार्गावरील इरई नदी या दोन ठिकाणांतून शहराला पाणीपुरवठा होतो. त्यात या योजनेचे खासगीकरण करून कंपनीला ही योजना चालविण्यासाठी दिली होती. अगदी सुरुवातीला ठाकूर नावाच्या व्यक्तीच्या कंपनीला ही योजना संचालित करण्याचे काम दिले होते. त्यानंतर, चांडक यांच्या कंपनीच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना संचालित केली जात होती. या दोन्ही कंपन्यांकडून काम काढून घेतल्यानंतर, समरित यांच्या कंपनीकडे शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी सोपविली होती. मात्र, या तिन्ही कंपन्यांमुळे मनपाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला, असा पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे.

खासगीकरण रद्द   होऊनही समस्या जैसे थेचंद्रपूरकरांना पाणी नियमित मिळावे, यासाठी मनपाच्या आमसभेत पाणीपुरवठा योजनेच्या खासगीकरणाचा निर्णय रद्द करून, योजना स्वत: चालविण्याचा निर्णय घेतला. या घटनेला दोन वर्षे झाले. आता मनपा स्वत:च पाणीपुरवठा योजना संचालित करीत आहे. मात्र, चंद्रपूरकरांची पाण्यासाठी भटकंती संपली नाही.

पाणीपुरवठा एक   दिवसाआड काही दिवसांपूर्वी दररोज दोनदा नळाला पाणी येत होते. आता तर एक दिवस आड पाणीपुरवठा केला जातो. तोही नियमित नसल्याने घरातील घागरी रिकाम्या असतात. इरई धरणातून चंद्रपूरकडे येणारा पाइपलाइन फुटल्याने तीन दिवस पाणीपुरवठा ठप्प होता.

तोटा भरून काढण्याकडे दुर्लक्ष- पाणीपुरवठा योजनेवरील खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी असल्याने वर्षाकाठी सहा कोटींचा तोटा होत आहे.  - हा तोटा भरून काढण्यासाठी मनपाने काही उपाययोजनाच  केल्या नाही. त्यामुळे ही समस्या कायम असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

 

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी