शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

मनपाची पाणीपुरवठा योजना तब्बल सहा कोटींनी ताेट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 05:00 IST

शहरात आजघडीला ८५ हजार मालमत्ता असल्या, तरी केवळ ३५ हजार नळ जोडणी आहेत. इरई धरण तथा दाताळा मार्गावरील इरई नदी या दोन ठिकाणांतून शहराला पाणीपुरवठा होतो. त्यात या योजनेचे खासगीकरण करून कंपनीला ही योजना चालविण्यासाठी दिली होती. अगदी सुरुवातीला ठाकूर नावाच्या व्यक्तीच्या कंपनीला ही योजना संचालित करण्याचे काम दिले होते. त्यानंतर, चांडक यांच्या कंपनीच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना संचालित केली जात होती. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील पाणीपुरवठा योजनेवर महापालिका वर्षभरात ११ कोटींचा खर्च करते. मात्र, पाणी कराच्या माेबदल्यात केवळ ४ कोटी ९५ लाखांचे उत्पन्न होत आहे. त्यामुळे वर्षभरात तब्बल सहा कोटींचा फटका बसत असल्याचे वास्तव पुढे आले आहे.  चंद्रपुरात अमृत पाणीपुरवठा योजनेचे थाटात उद्घाटन झाले असले, तरी बऱ्याच प्रभागातील कामे अर्धवट तर कुठे सुरू आहेत. अजूनही अनेकांना अमृत योजनेचे पाणी मिळाले नाही. आगामी निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून उद्घाटन करण्यात आले, हे आता पुरते स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ज्या प्रभागात अमृत योजनेचे पाणी पोहोचले नाही, तेथील नागरिक मनपा पदाधिकाऱ्यांना प्रश्न विचारून जेरीस आणत आहेत. शहरात आजघडीला ८५ हजार मालमत्ता असल्या, तरी केवळ ३५ हजार नळ जोडणी आहेत. इरई धरण तथा दाताळा मार्गावरील इरई नदी या दोन ठिकाणांतून शहराला पाणीपुरवठा होतो. त्यात या योजनेचे खासगीकरण करून कंपनीला ही योजना चालविण्यासाठी दिली होती. अगदी सुरुवातीला ठाकूर नावाच्या व्यक्तीच्या कंपनीला ही योजना संचालित करण्याचे काम दिले होते. त्यानंतर, चांडक यांच्या कंपनीच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना संचालित केली जात होती. या दोन्ही कंपन्यांकडून काम काढून घेतल्यानंतर, समरित यांच्या कंपनीकडे शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी सोपविली होती. मात्र, या तिन्ही कंपन्यांमुळे मनपाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला, असा पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे.

खासगीकरण रद्द   होऊनही समस्या जैसे थेचंद्रपूरकरांना पाणी नियमित मिळावे, यासाठी मनपाच्या आमसभेत पाणीपुरवठा योजनेच्या खासगीकरणाचा निर्णय रद्द करून, योजना स्वत: चालविण्याचा निर्णय घेतला. या घटनेला दोन वर्षे झाले. आता मनपा स्वत:च पाणीपुरवठा योजना संचालित करीत आहे. मात्र, चंद्रपूरकरांची पाण्यासाठी भटकंती संपली नाही.

पाणीपुरवठा एक   दिवसाआड काही दिवसांपूर्वी दररोज दोनदा नळाला पाणी येत होते. आता तर एक दिवस आड पाणीपुरवठा केला जातो. तोही नियमित नसल्याने घरातील घागरी रिकाम्या असतात. इरई धरणातून चंद्रपूरकडे येणारा पाइपलाइन फुटल्याने तीन दिवस पाणीपुरवठा ठप्प होता.

तोटा भरून काढण्याकडे दुर्लक्ष- पाणीपुरवठा योजनेवरील खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी असल्याने वर्षाकाठी सहा कोटींचा तोटा होत आहे.  - हा तोटा भरून काढण्यासाठी मनपाने काही उपाययोजनाच  केल्या नाही. त्यामुळे ही समस्या कायम असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

 

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी