शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोरोना निर्बंध उठले, मात्र विदर्भातील पॅसेंजर अद्यापही बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 13:47 IST

कोरोना संकटानंतर आता जनजीवन रुळावर आले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिक आपापल्या कामाला लागले असून परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. मात्र, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पॅसेंजर सुरूच केल्या नाही.

ठळक मुद्देप्रवाशांचे हालव्यावसायिकांचेही मोठे नुकसान

साईनाथ कुचनकार

चंद्रपूर : कोरोना संकटानंतर रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. संकट ओसरल्यामुळे केंद्र तसेच राज्य सरकारने निर्बंध उठविले आहेत. त्यामुळे आता सर्वच एक्स्प्रेस सुरू झाल्या आहेत. मात्र, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील काही पॅसेंजर अद्यापही बंदच असल्याने सामान्य नागरिकांना प्रवास करणे कठीण होत आहे. विशेष म्हणजे, लहान-मोठ्या व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून रोजगारही हिरावला आहे.

कोरोना संकटानंतर आता जनजीवन रुळावर आले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिक आपापल्या कामाला लागले असून परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. मात्र, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पॅसेंजर सुरूच केल्या नाही. विशेष म्हणजे, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी बंद आहे. अपवादाला काही एसटी सुरू आहे. मात्र, ग्रामीण भागात त्याचा फारसा उपयोग नाही. त्यातच पॅसेंजरही बंद असल्याने नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यामध्ये अतिरिक्त आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.

या पॅसेंजर अद्यापही बंद

अमरावती-वर्धा

वर्धा-नागपूर

काजिपेठ- अजलनी

भाग्यनगरी-सिकंदराबाद (बल्लारशा)

बल्लारपूर-गोंदिया

खासगी वाहन परवडेना

जवळपासच्या प्रवासासाठी पॅसेंजरने कमी खर्चात प्रवास होतो. त्यामुळे सामान्य कुटुंबातील नागरिक पॅसेंजरने प्रवास करण्याला पसंती देतात. मात्र, पॅसेंजर बंद असल्यामुळे प्रवास करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. कुटुंबातील एखाद्या नातेवाइकाचा मृत्यू झाल्या. त्याच्या घरापर्यंत जाण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. परिणामी, सामान्य कुटुंबातील सदस्य जाण्याचे टाळत आहेत.

कोरोना संकट आता ओसरले आहे. त्यामुळे फारशी भीती राहिली नाही. त्यातच केंद्र तसेच राज्य सरकारनेही कोरोना निर्बंध उठविले आहे. त्यामुळे पॅसेंजर बंद ठेवून गरिबांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. सामान्यांच्या सुलभ प्रवासासाठी बंद असलेल्या सर्व पॅसेंजर सुरू करणे गरजेचे आहे.

-श्रीनिवास सुंचुवार, झेडआरयूसीसी सदस्य, मध्य रेल्वे

टॅग्स :railwayरेल्वेpassengerप्रवासीVidarbhaविदर्भ