शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

कोरोना निर्बंध उठले, मात्र विदर्भातील पॅसेंजर अद्यापही बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 13:47 IST

कोरोना संकटानंतर आता जनजीवन रुळावर आले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिक आपापल्या कामाला लागले असून परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. मात्र, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पॅसेंजर सुरूच केल्या नाही.

ठळक मुद्देप्रवाशांचे हालव्यावसायिकांचेही मोठे नुकसान

साईनाथ कुचनकार

चंद्रपूर : कोरोना संकटानंतर रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. संकट ओसरल्यामुळे केंद्र तसेच राज्य सरकारने निर्बंध उठविले आहेत. त्यामुळे आता सर्वच एक्स्प्रेस सुरू झाल्या आहेत. मात्र, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील काही पॅसेंजर अद्यापही बंदच असल्याने सामान्य नागरिकांना प्रवास करणे कठीण होत आहे. विशेष म्हणजे, लहान-मोठ्या व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून रोजगारही हिरावला आहे.

कोरोना संकटानंतर आता जनजीवन रुळावर आले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिक आपापल्या कामाला लागले असून परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. मात्र, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पॅसेंजर सुरूच केल्या नाही. विशेष म्हणजे, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी बंद आहे. अपवादाला काही एसटी सुरू आहे. मात्र, ग्रामीण भागात त्याचा फारसा उपयोग नाही. त्यातच पॅसेंजरही बंद असल्याने नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यामध्ये अतिरिक्त आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.

या पॅसेंजर अद्यापही बंद

अमरावती-वर्धा

वर्धा-नागपूर

काजिपेठ- अजलनी

भाग्यनगरी-सिकंदराबाद (बल्लारशा)

बल्लारपूर-गोंदिया

खासगी वाहन परवडेना

जवळपासच्या प्रवासासाठी पॅसेंजरने कमी खर्चात प्रवास होतो. त्यामुळे सामान्य कुटुंबातील नागरिक पॅसेंजरने प्रवास करण्याला पसंती देतात. मात्र, पॅसेंजर बंद असल्यामुळे प्रवास करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. कुटुंबातील एखाद्या नातेवाइकाचा मृत्यू झाल्या. त्याच्या घरापर्यंत जाण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. परिणामी, सामान्य कुटुंबातील सदस्य जाण्याचे टाळत आहेत.

कोरोना संकट आता ओसरले आहे. त्यामुळे फारशी भीती राहिली नाही. त्यातच केंद्र तसेच राज्य सरकारनेही कोरोना निर्बंध उठविले आहे. त्यामुळे पॅसेंजर बंद ठेवून गरिबांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. सामान्यांच्या सुलभ प्रवासासाठी बंद असलेल्या सर्व पॅसेंजर सुरू करणे गरजेचे आहे.

-श्रीनिवास सुंचुवार, झेडआरयूसीसी सदस्य, मध्य रेल्वे

टॅग्स :railwayरेल्वेpassengerप्रवासीVidarbhaविदर्भ