शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कोरोना निर्बंध उठले, मात्र विदर्भातील पॅसेंजर अद्यापही बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 13:47 IST

कोरोना संकटानंतर आता जनजीवन रुळावर आले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिक आपापल्या कामाला लागले असून परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. मात्र, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पॅसेंजर सुरूच केल्या नाही.

ठळक मुद्देप्रवाशांचे हालव्यावसायिकांचेही मोठे नुकसान

साईनाथ कुचनकार

चंद्रपूर : कोरोना संकटानंतर रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. संकट ओसरल्यामुळे केंद्र तसेच राज्य सरकारने निर्बंध उठविले आहेत. त्यामुळे आता सर्वच एक्स्प्रेस सुरू झाल्या आहेत. मात्र, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील काही पॅसेंजर अद्यापही बंदच असल्याने सामान्य नागरिकांना प्रवास करणे कठीण होत आहे. विशेष म्हणजे, लहान-मोठ्या व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून रोजगारही हिरावला आहे.

कोरोना संकटानंतर आता जनजीवन रुळावर आले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिक आपापल्या कामाला लागले असून परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. मात्र, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पॅसेंजर सुरूच केल्या नाही. विशेष म्हणजे, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी बंद आहे. अपवादाला काही एसटी सुरू आहे. मात्र, ग्रामीण भागात त्याचा फारसा उपयोग नाही. त्यातच पॅसेंजरही बंद असल्याने नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यामध्ये अतिरिक्त आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.

या पॅसेंजर अद्यापही बंद

अमरावती-वर्धा

वर्धा-नागपूर

काजिपेठ- अजलनी

भाग्यनगरी-सिकंदराबाद (बल्लारशा)

बल्लारपूर-गोंदिया

खासगी वाहन परवडेना

जवळपासच्या प्रवासासाठी पॅसेंजरने कमी खर्चात प्रवास होतो. त्यामुळे सामान्य कुटुंबातील नागरिक पॅसेंजरने प्रवास करण्याला पसंती देतात. मात्र, पॅसेंजर बंद असल्यामुळे प्रवास करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. कुटुंबातील एखाद्या नातेवाइकाचा मृत्यू झाल्या. त्याच्या घरापर्यंत जाण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. परिणामी, सामान्य कुटुंबातील सदस्य जाण्याचे टाळत आहेत.

कोरोना संकट आता ओसरले आहे. त्यामुळे फारशी भीती राहिली नाही. त्यातच केंद्र तसेच राज्य सरकारनेही कोरोना निर्बंध उठविले आहे. त्यामुळे पॅसेंजर बंद ठेवून गरिबांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. सामान्यांच्या सुलभ प्रवासासाठी बंद असलेल्या सर्व पॅसेंजर सुरू करणे गरजेचे आहे.

-श्रीनिवास सुंचुवार, झेडआरयूसीसी सदस्य, मध्य रेल्वे

टॅग्स :railwayरेल्वेpassengerप्रवासीVidarbhaविदर्भ